शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

जळगाव जिल्ह्यातील 145 कि.मी. रस्त्यांवर खड्डे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 12:34 IST

ग्रामीण भागातील रस्त्यांची दैना कायम

ठळक मुद्दे 4 कोटींचा खर्चनिविदांमधील कामे बाकी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 17-  खड्डेमुक्त रस्ते करण्याची मुदत 15 डिसेंबर रोजी संपली असली तरी अद्यापही जळगाव जिल्ह्यातील  145 कि.मी. लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम अपूर्ण आहे.  आतार्पयत झालेल्या कामावर  जिल्ह्यात 4 कोटी रुपये खर्च झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली. फक्त 145 कि.मी. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम अपूर्ण असल्याचा दावा भलेही सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेला असला तरी जळगाव तालुक्यासह अनेक तालुक्यांमधील अनेक रस्त्यांची दैना कायम आहे.

राज्य तसेच प्रमुख जिल्हा मार्गावर खड्डे पडून त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात गेल्या महिन्यात सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 15 डिसेंबर्पयत खड्डेमुक्त रस्ते करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार जिलत कामांना सुरुवात झाली मात्र अद्यापही ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची दैना कायम आहे. 

निविदांमधील कामे बाकीनिविदांतर्गत करण्यात येणारी कामे अद्याप अपूर्ण आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जिल्ह्यातील राज्य तसेच प्रमुख जिल्हा मार्ग मिळून एकूण साडेचार हजार कि.मी. लांबीचे रस्ते असून त्यापैकी 2000 कि.मी. रस्त्यांवरील खड्डे याअंतर्गत बुजवायचे होते.  13 डिसेंबर्पयत या 2000 कि.मी. लांबीच्या रस्त्यांपैकी 1750 कि.मी. लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येऊन साधारण 90 टक्के काम झाले होते. त्यानंतर दोन दिवसात उर्वरित काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र खड्डेमुक्त मोहिमेपूर्वी काही रस्त्यांचे काम निविदा काढून त्यांचा ठेका देण्यात आलेला होता. त्यामुळे हे काम अद्यापही सुरूच आहे. यामध्ये 145 कि.मी. लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविणे बाकी आहे. या संदर्भात ठेकेदारांना हे कामे लवकर मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली. 

पावसामुळे पुन्हा कामखड्डेमुक्तीची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यात या कामास सुरुवात झाली. मात्र त्यानंतर पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी खड्डे पुन्हा उघडे पडले. यात एकटय़ा चाळीसगाव तालुक्यात 10 कि.मी. लांबीच्या रस्त्यांवरील खडय़ांचे काम पुन्हा करावे लागले, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे.

खड्डेमुक्तीसाठी 4 कोटींचा खर्चखड्डेमुक्ती मोहिमेसाठी जिल्ह्यात करण्यात आलेल्या कामांसाठी चार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. खड्डेमुक्ती हा दोन वर्षाचा कार्यक्रम मंजूर असून एका वर्षात तीन टप्प्यात हे काम होणार आहे. त्यानुसार या मोहिमेंतर्गत पहिल्याच टप्प्यात 4 कोटींचा खर्च झालेला आहे. 

 खड्डेमुक्तीच्या कामांतर्गत  बुजविण्यात येणा:यासर्व खड्डय़ांचे काम पूर्ण झाले असून यापूर्वी दिलेल्या निविदांमधील कामे होणे बाकी आहे. यासाठी संबंधित ठेकेदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. पावसामुळे खराब झालेल्या खड्डय़ांचीही कामे पूर्ण झाली आहेत. - व्ही.बी. पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.