शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिली ९४५ कोटी देणगी?
2
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
3
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
4
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
5
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
6
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
7
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
8
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
9
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
10
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
11
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
12
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
13
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
15
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
16
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
17
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
18
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
19
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
20
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे

जळगाव जिल्ह्यातील 145 कि.मी. रस्त्यांवर खड्डे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 12:34 IST

ग्रामीण भागातील रस्त्यांची दैना कायम

ठळक मुद्दे 4 कोटींचा खर्चनिविदांमधील कामे बाकी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 17-  खड्डेमुक्त रस्ते करण्याची मुदत 15 डिसेंबर रोजी संपली असली तरी अद्यापही जळगाव जिल्ह्यातील  145 कि.मी. लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम अपूर्ण आहे.  आतार्पयत झालेल्या कामावर  जिल्ह्यात 4 कोटी रुपये खर्च झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली. फक्त 145 कि.मी. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम अपूर्ण असल्याचा दावा भलेही सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेला असला तरी जळगाव तालुक्यासह अनेक तालुक्यांमधील अनेक रस्त्यांची दैना कायम आहे.

राज्य तसेच प्रमुख जिल्हा मार्गावर खड्डे पडून त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात गेल्या महिन्यात सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 15 डिसेंबर्पयत खड्डेमुक्त रस्ते करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार जिलत कामांना सुरुवात झाली मात्र अद्यापही ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची दैना कायम आहे. 

निविदांमधील कामे बाकीनिविदांतर्गत करण्यात येणारी कामे अद्याप अपूर्ण आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जिल्ह्यातील राज्य तसेच प्रमुख जिल्हा मार्ग मिळून एकूण साडेचार हजार कि.मी. लांबीचे रस्ते असून त्यापैकी 2000 कि.मी. रस्त्यांवरील खड्डे याअंतर्गत बुजवायचे होते.  13 डिसेंबर्पयत या 2000 कि.मी. लांबीच्या रस्त्यांपैकी 1750 कि.मी. लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येऊन साधारण 90 टक्के काम झाले होते. त्यानंतर दोन दिवसात उर्वरित काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र खड्डेमुक्त मोहिमेपूर्वी काही रस्त्यांचे काम निविदा काढून त्यांचा ठेका देण्यात आलेला होता. त्यामुळे हे काम अद्यापही सुरूच आहे. यामध्ये 145 कि.मी. लांबीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविणे बाकी आहे. या संदर्भात ठेकेदारांना हे कामे लवकर मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली. 

पावसामुळे पुन्हा कामखड्डेमुक्तीची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यात या कामास सुरुवात झाली. मात्र त्यानंतर पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी खड्डे पुन्हा उघडे पडले. यात एकटय़ा चाळीसगाव तालुक्यात 10 कि.मी. लांबीच्या रस्त्यांवरील खडय़ांचे काम पुन्हा करावे लागले, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे.

खड्डेमुक्तीसाठी 4 कोटींचा खर्चखड्डेमुक्ती मोहिमेसाठी जिल्ह्यात करण्यात आलेल्या कामांसाठी चार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. खड्डेमुक्ती हा दोन वर्षाचा कार्यक्रम मंजूर असून एका वर्षात तीन टप्प्यात हे काम होणार आहे. त्यानुसार या मोहिमेंतर्गत पहिल्याच टप्प्यात 4 कोटींचा खर्च झालेला आहे. 

 खड्डेमुक्तीच्या कामांतर्गत  बुजविण्यात येणा:यासर्व खड्डय़ांचे काम पूर्ण झाले असून यापूर्वी दिलेल्या निविदांमधील कामे होणे बाकी आहे. यासाठी संबंधित ठेकेदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. पावसामुळे खराब झालेल्या खड्डय़ांचीही कामे पूर्ण झाली आहेत. - व्ही.बी. पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.