शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

जळगाव जिल्ह्यात वर्षभरात १४१ शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 11:51 IST

कर्जमाफीनंतरही समस्या कायम

जळगाव : जिल्ह्यात सुमारे ९०० कोटींची कर्जमाफी झाल्याचा दावा शासनाकडून केला जात असताना वर्षभरात तब्बल १४१ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. प्रशासनाच्या कमिटीने मात्र त्यापैकी ५१ प्रकरणातच कर्जबाजारीपणाने आत्महत्या केल्याचे मान्य केले आहे.शासनाकडून जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ९९८ कोटींची कर्जमाफी दिल्याचा दावा केला जात असला तरीही बहुतांश शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालेला नाही. त्यामुळे त्यांना खरीपासाठी कर्जच मिळू शकले नाही. त्या शेतकºयांना नाईलाजाने सावकारांच्या दारी जाण्याची वेळ आली आहे. शेतकºयांना बँक, सोसायट्यांकडून हंगामात व वैयक्तिक कारणासाठी कर्ज न मिळाल्यास त्यांना नाईलाजाने सावकाराकडे हात पसरावा लागतो. बहुतांश शेतकरी गावातीलच अवैध सावकारी करणाºयांकडून कर्ज घेतो.५१ प्रकरणेच प्रशासनाकडून मान्यया शेतकरी आत्महत्येच्या १४१ प्रकरणांची जिल्हाधिकाºयांच्या अ ध्यक्षतेखालील समितीने तपासणी करून त्यापैकी केवळ ५१ प्रकरणांमध्ये शेतकºयांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचे मान्य करून त्यांच्या वारसांना प्रत्येकी १ लाखाची मदत मंजूर केली आहे. तर ५८ प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविली आहत. ३१ प्रकरणे अद्याप प्रलंबित असून केवळ १ प्रकरणाची फेरचौकशी होणार आहे.सप्टेंबर व नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक आत्महत्याजिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०१८ या कालावधीत एकूण १४१ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे घडली असून त्यापैकी सप्टेंबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांमध्ये सर्वाधिक प्रत्येकी १८ आत्महत्यांच्या घटना घडल्या आहेत. जानेवारीत १२, फेब्रुवारी १२, मार्च ११, एप्रिल ७, मे १३, जून १४, जुलै ४, आॅगस्ट १३, आॅक्टोबर १०, डिसेंबर महिन्यात ९ आत्महत्येच्या घटना घडल्या.

टॅग्स :Suicideआत्महत्याJalgaonजळगाव