शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

जळगाव जिल्ह्यात वर्षभरात १४१ शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 11:51 IST

कर्जमाफीनंतरही समस्या कायम

जळगाव : जिल्ह्यात सुमारे ९०० कोटींची कर्जमाफी झाल्याचा दावा शासनाकडून केला जात असताना वर्षभरात तब्बल १४१ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. प्रशासनाच्या कमिटीने मात्र त्यापैकी ५१ प्रकरणातच कर्जबाजारीपणाने आत्महत्या केल्याचे मान्य केले आहे.शासनाकडून जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ९९८ कोटींची कर्जमाफी दिल्याचा दावा केला जात असला तरीही बहुतांश शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालेला नाही. त्यामुळे त्यांना खरीपासाठी कर्जच मिळू शकले नाही. त्या शेतकºयांना नाईलाजाने सावकारांच्या दारी जाण्याची वेळ आली आहे. शेतकºयांना बँक, सोसायट्यांकडून हंगामात व वैयक्तिक कारणासाठी कर्ज न मिळाल्यास त्यांना नाईलाजाने सावकाराकडे हात पसरावा लागतो. बहुतांश शेतकरी गावातीलच अवैध सावकारी करणाºयांकडून कर्ज घेतो.५१ प्रकरणेच प्रशासनाकडून मान्यया शेतकरी आत्महत्येच्या १४१ प्रकरणांची जिल्हाधिकाºयांच्या अ ध्यक्षतेखालील समितीने तपासणी करून त्यापैकी केवळ ५१ प्रकरणांमध्ये शेतकºयांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचे मान्य करून त्यांच्या वारसांना प्रत्येकी १ लाखाची मदत मंजूर केली आहे. तर ५८ प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविली आहत. ३१ प्रकरणे अद्याप प्रलंबित असून केवळ १ प्रकरणाची फेरचौकशी होणार आहे.सप्टेंबर व नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक आत्महत्याजिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०१८ या कालावधीत एकूण १४१ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे घडली असून त्यापैकी सप्टेंबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांमध्ये सर्वाधिक प्रत्येकी १८ आत्महत्यांच्या घटना घडल्या आहेत. जानेवारीत १२, फेब्रुवारी १२, मार्च ११, एप्रिल ७, मे १३, जून १४, जुलै ४, आॅगस्ट १३, आॅक्टोबर १०, डिसेंबर महिन्यात ९ आत्महत्येच्या घटना घडल्या.

टॅग्स :Suicideआत्महत्याJalgaonजळगाव