शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

एकाच दिवसात आढळले १४ रुग्ण, आता इतरांच्या शोधासाठी मोहीम!

By अमित महाबळ | Updated: October 2, 2023 19:48 IST

३ ते १३ ऑक्टोबर : क्षयरुग्ण शोध मोहीम

जळगाव : केंद्र सरकारची महत्वाकांक्षी मोहीम असलेल्या ‘आयुष्मान भव’अंतर्गत गेल्या शनिवारी, जळगाव जिल्ह्यात झालेल्या तपासणीत क्षयरोगाचे १४ रुग्ण आढळून आले आहेत. प्राथमिक टप्प्यावरच या आजाराचे निदान झाल्यास सहा महिन्यात रुग्ण बरा होतो. दरम्यान, दि. ३ ते १३ ऑक्टोबरपर्यंत क्षयरुग्ण शोध मोहीम राबिलली जाणार आहे. या आजारावर सरकारी केंद्रात मोफत उपचार उपलब्ध आहेत.

क्षयरोगाची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांनी न घाबरता, स्वत:हून सरकारी दवाखान्यात तपासणी करावी. खासगी डॉक्टरांनीही या रुग्णांची माहिती जिल्हा क्षयरोग केंद्राला कळवावी. जिल्ह्यात १ जानेवारी ते ३० सप्टेंबरअखेर २७१० क्षयरोगी आहेत. गेल्या शनिवारी, १४ रुग्ण आढळले. त्यावेळी एका दिवसात ४ हजार ४०९ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी १०५२ जणांच्या थुंकीची तपासणी केली असता, नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

क्षयरोगाची लक्षणेदोन आठवड्यांहून अधिक दिवस असलेला ताप व खोकला, रात्रीच्या वेळेस येणारा ताप, भूक न लागणे किंवा वजनात घट, थुंकीवाटे रक्त, मानेवर गाठी येणे.

हे आहेत उपचारयाआधी इंजेक्शनद्वारे औषध दिले जायचे. त्यामध्ये आजार बरा होण्यास वेळ लागायचा. आता गोळ्या देतात. आजाराच्या पहिल्या टप्प्यावरच निदान झाल्यास रुग्ण ६ महिन्यात बरा होतो. शासकीय आरोग्य केंद्रात क्षयरोगाच्या निदानासाठी थुंकी तपासणी, सीबीनॅट, एक्स-रे तपासणी व उपचार मोफत आहेत. रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना क्षयरोग प्रतिबंधक उपचार मोफत केला जातो.

कोणाला संसर्गाची भीतीक्षयरोगीच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती, एचआयव्ही, मधुमेह, कर्करोग व किडनी विकार असलेले रुग्ण, सतत मद्यपान व धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती यांना क्षयरोगाच्या संसर्गाची शक्यता अधिक असते.

काय काळजी घ्यालगर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा. अतिजोखीमग्रस्त व्यक्तींनी गर्दीत जाणे टाळावे. लहान मुलांची काळजी घ्यावी. त्यांच्यात प्रतिकारशक्ती कमी असते. हा आजार कोणत्याही वयोगटात होऊ शकतो. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.

३ ते १३ ऑक्टोबर : क्षयरुग्ण शोध मोहीमझोपडपट्टी, दाट वस्तीचा भाग, क्षयरोगींचे प्रमाण जास्त असलेल्या गावात आरोग्य पथकांद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. क्षयरुग्णांचे लवकर निदान व उपचार हा उद्देश यामागे आहे.

मोफत औषधोपचाररुग्णांचे निदान लवकर करून त्यांच्यावर मोफत औषधोपचार केले जात आहेत. गेल्या शनिवारी एकाच दिवसांत १४ रुग्णांचे निदान झाले आहे. उद्यापासून पुढील १० दिवस रुग्ण शोध मोहीम आहे. २०२५ पर्यंत जळगाव जिल्हा क्षयरोग मुक्त करायचा आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये यांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव