शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

एकाच दिवसात आढळले १४ रुग्ण, आता इतरांच्या शोधासाठी मोहीम!

By अमित महाबळ | Updated: October 2, 2023 19:48 IST

३ ते १३ ऑक्टोबर : क्षयरुग्ण शोध मोहीम

जळगाव : केंद्र सरकारची महत्वाकांक्षी मोहीम असलेल्या ‘आयुष्मान भव’अंतर्गत गेल्या शनिवारी, जळगाव जिल्ह्यात झालेल्या तपासणीत क्षयरोगाचे १४ रुग्ण आढळून आले आहेत. प्राथमिक टप्प्यावरच या आजाराचे निदान झाल्यास सहा महिन्यात रुग्ण बरा होतो. दरम्यान, दि. ३ ते १३ ऑक्टोबरपर्यंत क्षयरुग्ण शोध मोहीम राबिलली जाणार आहे. या आजारावर सरकारी केंद्रात मोफत उपचार उपलब्ध आहेत.

क्षयरोगाची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांनी न घाबरता, स्वत:हून सरकारी दवाखान्यात तपासणी करावी. खासगी डॉक्टरांनीही या रुग्णांची माहिती जिल्हा क्षयरोग केंद्राला कळवावी. जिल्ह्यात १ जानेवारी ते ३० सप्टेंबरअखेर २७१० क्षयरोगी आहेत. गेल्या शनिवारी, १४ रुग्ण आढळले. त्यावेळी एका दिवसात ४ हजार ४०९ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी १०५२ जणांच्या थुंकीची तपासणी केली असता, नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

क्षयरोगाची लक्षणेदोन आठवड्यांहून अधिक दिवस असलेला ताप व खोकला, रात्रीच्या वेळेस येणारा ताप, भूक न लागणे किंवा वजनात घट, थुंकीवाटे रक्त, मानेवर गाठी येणे.

हे आहेत उपचारयाआधी इंजेक्शनद्वारे औषध दिले जायचे. त्यामध्ये आजार बरा होण्यास वेळ लागायचा. आता गोळ्या देतात. आजाराच्या पहिल्या टप्प्यावरच निदान झाल्यास रुग्ण ६ महिन्यात बरा होतो. शासकीय आरोग्य केंद्रात क्षयरोगाच्या निदानासाठी थुंकी तपासणी, सीबीनॅट, एक्स-रे तपासणी व उपचार मोफत आहेत. रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना क्षयरोग प्रतिबंधक उपचार मोफत केला जातो.

कोणाला संसर्गाची भीतीक्षयरोगीच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती, एचआयव्ही, मधुमेह, कर्करोग व किडनी विकार असलेले रुग्ण, सतत मद्यपान व धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती यांना क्षयरोगाच्या संसर्गाची शक्यता अधिक असते.

काय काळजी घ्यालगर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा. अतिजोखीमग्रस्त व्यक्तींनी गर्दीत जाणे टाळावे. लहान मुलांची काळजी घ्यावी. त्यांच्यात प्रतिकारशक्ती कमी असते. हा आजार कोणत्याही वयोगटात होऊ शकतो. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.

३ ते १३ ऑक्टोबर : क्षयरुग्ण शोध मोहीमझोपडपट्टी, दाट वस्तीचा भाग, क्षयरोगींचे प्रमाण जास्त असलेल्या गावात आरोग्य पथकांद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. क्षयरुग्णांचे लवकर निदान व उपचार हा उद्देश यामागे आहे.

मोफत औषधोपचाररुग्णांचे निदान लवकर करून त्यांच्यावर मोफत औषधोपचार केले जात आहेत. गेल्या शनिवारी एकाच दिवसांत १४ रुग्णांचे निदान झाले आहे. उद्यापासून पुढील १० दिवस रुग्ण शोध मोहीम आहे. २०२५ पर्यंत जळगाव जिल्हा क्षयरोग मुक्त करायचा आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये यांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव