शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवसात आढळले १४ रुग्ण, आता इतरांच्या शोधासाठी मोहीम!

By अमित महाबळ | Updated: October 2, 2023 19:48 IST

३ ते १३ ऑक्टोबर : क्षयरुग्ण शोध मोहीम

जळगाव : केंद्र सरकारची महत्वाकांक्षी मोहीम असलेल्या ‘आयुष्मान भव’अंतर्गत गेल्या शनिवारी, जळगाव जिल्ह्यात झालेल्या तपासणीत क्षयरोगाचे १४ रुग्ण आढळून आले आहेत. प्राथमिक टप्प्यावरच या आजाराचे निदान झाल्यास सहा महिन्यात रुग्ण बरा होतो. दरम्यान, दि. ३ ते १३ ऑक्टोबरपर्यंत क्षयरुग्ण शोध मोहीम राबिलली जाणार आहे. या आजारावर सरकारी केंद्रात मोफत उपचार उपलब्ध आहेत.

क्षयरोगाची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांनी न घाबरता, स्वत:हून सरकारी दवाखान्यात तपासणी करावी. खासगी डॉक्टरांनीही या रुग्णांची माहिती जिल्हा क्षयरोग केंद्राला कळवावी. जिल्ह्यात १ जानेवारी ते ३० सप्टेंबरअखेर २७१० क्षयरोगी आहेत. गेल्या शनिवारी, १४ रुग्ण आढळले. त्यावेळी एका दिवसात ४ हजार ४०९ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी १०५२ जणांच्या थुंकीची तपासणी केली असता, नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

क्षयरोगाची लक्षणेदोन आठवड्यांहून अधिक दिवस असलेला ताप व खोकला, रात्रीच्या वेळेस येणारा ताप, भूक न लागणे किंवा वजनात घट, थुंकीवाटे रक्त, मानेवर गाठी येणे.

हे आहेत उपचारयाआधी इंजेक्शनद्वारे औषध दिले जायचे. त्यामध्ये आजार बरा होण्यास वेळ लागायचा. आता गोळ्या देतात. आजाराच्या पहिल्या टप्प्यावरच निदान झाल्यास रुग्ण ६ महिन्यात बरा होतो. शासकीय आरोग्य केंद्रात क्षयरोगाच्या निदानासाठी थुंकी तपासणी, सीबीनॅट, एक्स-रे तपासणी व उपचार मोफत आहेत. रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना क्षयरोग प्रतिबंधक उपचार मोफत केला जातो.

कोणाला संसर्गाची भीतीक्षयरोगीच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती, एचआयव्ही, मधुमेह, कर्करोग व किडनी विकार असलेले रुग्ण, सतत मद्यपान व धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती यांना क्षयरोगाच्या संसर्गाची शक्यता अधिक असते.

काय काळजी घ्यालगर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा. अतिजोखीमग्रस्त व्यक्तींनी गर्दीत जाणे टाळावे. लहान मुलांची काळजी घ्यावी. त्यांच्यात प्रतिकारशक्ती कमी असते. हा आजार कोणत्याही वयोगटात होऊ शकतो. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.

३ ते १३ ऑक्टोबर : क्षयरुग्ण शोध मोहीमझोपडपट्टी, दाट वस्तीचा भाग, क्षयरोगींचे प्रमाण जास्त असलेल्या गावात आरोग्य पथकांद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. क्षयरुग्णांचे लवकर निदान व उपचार हा उद्देश यामागे आहे.

मोफत औषधोपचाररुग्णांचे निदान लवकर करून त्यांच्यावर मोफत औषधोपचार केले जात आहेत. गेल्या शनिवारी एकाच दिवसांत १४ रुग्णांचे निदान झाले आहे. उद्यापासून पुढील १० दिवस रुग्ण शोध मोहीम आहे. २०२५ पर्यंत जळगाव जिल्हा क्षयरोग मुक्त करायचा आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये यांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव