शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

नेरी नाका स्मशानभूमीत एकाच दिवशी १४ जणांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असून, आता गेल्या काही दिवसांत मृतांची संख्यादेखील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असून, आता गेल्या काही दिवसांत मृतांची संख्यादेखील वाढू लागली आहे. शनिवारी शहरातील नेरी नाका स्मशानभूमी येथे एकाच दिवशी तब्बल १४ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. एकापाठोपाठ एक मृतदेह स्मशानभूमीत येत असल्याने ओटेदेखील कमी पडू लागले आहेत. यामुळे अनेक मृतदेहांवरील अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना काही काळ प्रतीक्षादेखील करावी लागत असल्याचे चित्र नेरीनाका स्मशानभूमीत पाहायला मिळत आहे. रविवारीदेखील स्मशानभूमीत एकाच वेळी सात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जुलै ते सप्टेंबरदरम्यानदेखील शहरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या वाढत गेली होती. यामुळे नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यानंतर मनपा प्रशासनाने नेरी नाका स्मशानभूमीवर केवळ कोरोनामुळे मृत्यू झाल्यावरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सद्य:स्थितीत नेरी नाका स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांसह इतर कारणांमुळे मृत्यू झालेल्यांवरदेखील अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. यामुळे एकाच ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जळगाव शहरात जिल्हाभरातील रुग्णांवर खाजगी व सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे काही मृतांवर जळगावमध्येच अंत्यसंस्कार करावे लागतात. अशा परिस्थितीत महापालिकेच्या नेरी नाका स्मशानभूमीवर अंत्यसंस्कारासाठी अनेकांना वाट पाहावी लागत आहे.

गॅस दाहिनीमुळे काही प्रमाणात मिळाला दिलासा

नेरी नाका स्मशानभूमीत केशव स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने अत्याधुनिक गॅस दाहिनी बसविण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यापासून ही दाहिनी बसविण्यात आली असून, यामुळे स्मशानभूमीत ऐनवेळी येणाऱ्या मृतदेहांवर वेळीच अंत्यसंस्कार करता येत आहेत. मात्र, तरीही मृतदेहांची संख्या वाढत असल्याने अनेक अडचणी या ठिकाणी निर्माण होताना दिसून येत आहेत. तरी गॅस दाहिनीमुळे अनेक नागरिकांची होणारी गैरसोय टाळता येत आहे. गॅस दाहिनीवर दिवसातून चार ते पाच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

खाजगी रुग्णालयातील मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येताहेत अडचणी

नेरी नाका स्मशानभूमीत खाजगी रुग्णालयातील मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी काही अडचणी येत आहेत. खाजगी रुग्णालयात एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह थेट स्मशानभूमीत आणला जात आहे, तसेच मृताचे नातेवाईक अनेक वेळा बाहेरगावाचे असल्याने या ठिकाणांची प्रक्रिया पूर्ण करण्यास संबंधितांना अडचणी येत आहेत, तसेच स्मशानभूमीमधील मनपा कर्मचाऱ्यांनादेखील याबाबत कोणतीही पूर्वसूचना मिळत नसल्याने अनेकदा नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान, मृतांची संख्या वाढू लागल्यास या ठिकाणी ओटे वाढविण्याबाबतदेखील मनपा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे, तसेच पूर्वीप्रमाणे नेरी नाका स्मशानभूमीवर केवळ कोरोनामुळे मृत पावलेल्यांवरच अंत्यसंस्कार करण्याबाबतचा निर्णयदेखील मनपा प्रशासनाकडून लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.