शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

नेरी नाका स्मशानभूमीत एकाच दिवशी १४ जणांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असून, आता गेल्या काही दिवसांत मृतांची संख्यादेखील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असून, आता गेल्या काही दिवसांत मृतांची संख्यादेखील वाढू लागली आहे. शनिवारी शहरातील नेरी नाका स्मशानभूमी येथे एकाच दिवशी तब्बल १४ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. एकापाठोपाठ एक मृतदेह स्मशानभूमीत येत असल्याने ओटेदेखील कमी पडू लागले आहेत. यामुळे अनेक मृतदेहांवरील अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना काही काळ प्रतीक्षादेखील करावी लागत असल्याचे चित्र नेरीनाका स्मशानभूमीत पाहायला मिळत आहे. रविवारीदेखील स्मशानभूमीत एकाच वेळी सात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जुलै ते सप्टेंबरदरम्यानदेखील शहरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या वाढत गेली होती. यामुळे नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यानंतर मनपा प्रशासनाने नेरी नाका स्मशानभूमीवर केवळ कोरोनामुळे मृत्यू झाल्यावरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सद्य:स्थितीत नेरी नाका स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांसह इतर कारणांमुळे मृत्यू झालेल्यांवरदेखील अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. यामुळे एकाच ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जळगाव शहरात जिल्हाभरातील रुग्णांवर खाजगी व सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे काही मृतांवर जळगावमध्येच अंत्यसंस्कार करावे लागतात. अशा परिस्थितीत महापालिकेच्या नेरी नाका स्मशानभूमीवर अंत्यसंस्कारासाठी अनेकांना वाट पाहावी लागत आहे.

गॅस दाहिनीमुळे काही प्रमाणात मिळाला दिलासा

नेरी नाका स्मशानभूमीत केशव स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने अत्याधुनिक गॅस दाहिनी बसविण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यापासून ही दाहिनी बसविण्यात आली असून, यामुळे स्मशानभूमीत ऐनवेळी येणाऱ्या मृतदेहांवर वेळीच अंत्यसंस्कार करता येत आहेत. मात्र, तरीही मृतदेहांची संख्या वाढत असल्याने अनेक अडचणी या ठिकाणी निर्माण होताना दिसून येत आहेत. तरी गॅस दाहिनीमुळे अनेक नागरिकांची होणारी गैरसोय टाळता येत आहे. गॅस दाहिनीवर दिवसातून चार ते पाच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

खाजगी रुग्णालयातील मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येताहेत अडचणी

नेरी नाका स्मशानभूमीत खाजगी रुग्णालयातील मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी काही अडचणी येत आहेत. खाजगी रुग्णालयात एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह थेट स्मशानभूमीत आणला जात आहे, तसेच मृताचे नातेवाईक अनेक वेळा बाहेरगावाचे असल्याने या ठिकाणांची प्रक्रिया पूर्ण करण्यास संबंधितांना अडचणी येत आहेत, तसेच स्मशानभूमीमधील मनपा कर्मचाऱ्यांनादेखील याबाबत कोणतीही पूर्वसूचना मिळत नसल्याने अनेकदा नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान, मृतांची संख्या वाढू लागल्यास या ठिकाणी ओटे वाढविण्याबाबतदेखील मनपा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे, तसेच पूर्वीप्रमाणे नेरी नाका स्मशानभूमीवर केवळ कोरोनामुळे मृत पावलेल्यांवरच अंत्यसंस्कार करण्याबाबतचा निर्णयदेखील मनपा प्रशासनाकडून लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.