शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

नेरी नाका स्मशानभूमीत एकाच दिवशी १४ जणांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असून, आता गेल्या काही दिवसांत मृतांची संख्यादेखील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असून, आता गेल्या काही दिवसांत मृतांची संख्यादेखील वाढू लागली आहे. शनिवारी शहरातील नेरी नाका स्मशानभूमी येथे एकाच दिवशी तब्बल १४ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. एकापाठोपाठ एक मृतदेह स्मशानभूमीत येत असल्याने ओटेदेखील कमी पडू लागले आहेत. यामुळे अनेक मृतदेहांवरील अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना काही काळ प्रतीक्षादेखील करावी लागत असल्याचे चित्र नेरीनाका स्मशानभूमीत पाहायला मिळत आहे. रविवारीदेखील स्मशानभूमीत एकाच वेळी सात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जुलै ते सप्टेंबरदरम्यानदेखील शहरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या वाढत गेली होती. यामुळे नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यानंतर मनपा प्रशासनाने नेरी नाका स्मशानभूमीवर केवळ कोरोनामुळे मृत्यू झाल्यावरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सद्य:स्थितीत नेरी नाका स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांसह इतर कारणांमुळे मृत्यू झालेल्यांवरदेखील अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. यामुळे एकाच ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जळगाव शहरात जिल्हाभरातील रुग्णांवर खाजगी व सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे काही मृतांवर जळगावमध्येच अंत्यसंस्कार करावे लागतात. अशा परिस्थितीत महापालिकेच्या नेरी नाका स्मशानभूमीवर अंत्यसंस्कारासाठी अनेकांना वाट पाहावी लागत आहे.

गॅस दाहिनीमुळे काही प्रमाणात मिळाला दिलासा

नेरी नाका स्मशानभूमीत केशव स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने अत्याधुनिक गॅस दाहिनी बसविण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यापासून ही दाहिनी बसविण्यात आली असून, यामुळे स्मशानभूमीत ऐनवेळी येणाऱ्या मृतदेहांवर वेळीच अंत्यसंस्कार करता येत आहेत. मात्र, तरीही मृतदेहांची संख्या वाढत असल्याने अनेक अडचणी या ठिकाणी निर्माण होताना दिसून येत आहेत. तरी गॅस दाहिनीमुळे अनेक नागरिकांची होणारी गैरसोय टाळता येत आहे. गॅस दाहिनीवर दिवसातून चार ते पाच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

खाजगी रुग्णालयातील मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येताहेत अडचणी

नेरी नाका स्मशानभूमीत खाजगी रुग्णालयातील मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी काही अडचणी येत आहेत. खाजगी रुग्णालयात एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह थेट स्मशानभूमीत आणला जात आहे, तसेच मृताचे नातेवाईक अनेक वेळा बाहेरगावाचे असल्याने या ठिकाणांची प्रक्रिया पूर्ण करण्यास संबंधितांना अडचणी येत आहेत, तसेच स्मशानभूमीमधील मनपा कर्मचाऱ्यांनादेखील याबाबत कोणतीही पूर्वसूचना मिळत नसल्याने अनेकदा नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान, मृतांची संख्या वाढू लागल्यास या ठिकाणी ओटे वाढविण्याबाबतदेखील मनपा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे, तसेच पूर्वीप्रमाणे नेरी नाका स्मशानभूमीवर केवळ कोरोनामुळे मृत पावलेल्यांवरच अंत्यसंस्कार करण्याबाबतचा निर्णयदेखील मनपा प्रशासनाकडून लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे.