शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बीएचआरच्या १४ आरोपींवर ठेवला गैरव्यवहाराचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:40 IST

जळगाव : बीएचआर संस्थेच्या संचालकांनी ठेवीदारांच्या ठेवींचा अपहार व फसवणूक केल्याच्या राज्यातील पाच गुन्ह्यांमध्ये सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रानंतर खटला ...

जळगाव : बीएचआर संस्थेच्या संचालकांनी ठेवीदारांच्या ठेवींचा अपहार व फसवणूक केल्याच्या राज्यातील पाच गुन्ह्यांमध्ये सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रानंतर खटला सुरू होण्यासाठी मंगळवारी न्यायालयाने १४ संचालकांवर गैरव्यवहार व अपहाराचे आरोप ठेवले.

पुण्यातील राजगुरुनगर, शिवाजीनगर, इंदापूर व तळेगाव दाभाडे, तर जिल्ह्यातील पाचोरा या पाच पोलीस ठाण्यांत दाखल गुन्ह्यांचा खटला सुरू झाला आहे. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके बाजू मांडत आहेत. बीएचआर संस्थेकडून फसवणूक व अपहार प्रकरणात राज्यातील २२ जिल्ह्यांत ८१ गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांचे खटले जळगाव न्यायालयात चालविले जाणार आहेत. याआधी ८ डिसेंबर रोजी सात गुन्ह्यांमधील दोषारोपपत्र न्या. आर. एन. हिवसे यांच्या न्यायालयात दाखल झाले आहे. आताही या पाच गुन्ह्यांचा खटला न्या. हिवसे यांच्याच न्यायालयात सुरू झाला आहे. या सर्व गुन्ह्यांत जळगावचेच १४ आरोपी असून, त्यात संस्थापक- चेअरमन प्रमोद रायसोनी याच्यासह १२ संचालक व एक व्यवस्थापक अशा १४ जणांचा सहभाग आहे. सर्व आरोपी जळगाव कारागृहात आहेत.

खटल्याची सुनावणी करताना न्या. आर. एन. हिवसे यांनी कारागृहातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर झालेल्या १४ संशयित आरोपींना तुमच्यावर कट रचणे, फसवणूक, अपहार व एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हे दाखल असून, त्या आधारावर दोषारोप ठेवण्यात येत असल्याचे सांगून, त्यावर तुमचे काय म्हणणे आहे, गुन्हा कबुल आहे का? अशी विचारणा केली. त्यावर सर्वच संचालकांनी आम्हाला गुन्हा नाकबूल असल्याचे सांगितले.

यांच्यावर ठेवले आरोप

यात संस्थेचे संस्थापक प्रमोद भाईचंद रायसोनी ( वय ५५, रा. बळीराम पेठ, जळगाव), दिलीप कांतिलाल चोरडीया (५१), सूरजमल भबुतमल जैन (५०), दादा रामचंद्र पाटील (६६), भागवत संपत माळी (६३), राजाराम काशिनाथ कोळी (४७), भगवान हिरामण वाघ (६०), यशवंत ओंकार जिरी (६०), शेख रमजान शेख, अब्दुल नबी मन्यार (५५), सुकलाल शहादू माळी (४५), ललिताबाई ऊर्फ लता राजू सोनवणे (३९, सर्व रा. तळेगाव, ता. जामनेर, मोतीलाल ओंकार जीरी (५०, रा. शेळगाव, ता. जामनेर), डॉ. हितेंद्र यशवंत महाजन (५२, रा. बेंडाळेनगर, प्रेमनगर, जळगाव) व इंद्रकुमार आत्माराम ललवाणी (४०, रा. महाबळ, जळगाव) आदी.

असे आहेत पोलीस स्टेशननिहाय बीएचआरचे गैरव्यवहार

राजगुरुनगर,पुणे : २, ३०,००,०००

शिवाजीनगर, पुणे : ०७,०५,०६,६७०

इंदापूर, पुणे : ४,७७,९३,३९४

तळेगाव दाभाडे : ४०,५७,३००

पाचोरा : ८९,१८,३३८

या कलमान्वये ठेवले आरोप

कलम व्याख्या

१२० ब : कट रचणे

४२० : फसवणूक

४०६ : अपहार

४०८ : (व्यवस्थापक असताना अपहार केला)

हे कलम फक्त सुखलाल माळी याला लागू आहे.

४०९ : जबाबदारी टाळून गुन्हेगारी कट

(हे कलम व्यवस्थापक वगळता सर्वांना लागू)

२०१ : पुरावा नष्ट करणे, कागदपत्रे गहाळ करणे

एमपीआयडी ३ : महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण तसेच ठेवींची व्याजासह परतफेड केली नाही.