शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

भुसावळातील १२५ कि.मी. रस्त्याचे भाग्य कधी उजाडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 21:59 IST

भुसावळ शहरातील रस्त्यांची गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अतिशय दैनावस्था झाली आहे.

ठळक मुद्देसंततधार पावसामुळे रस्त्यावरून चालणे झाले मुश्किलपालिकेचे रस्त्याच्या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष शहरवासीय संतत्प

उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : शहरातील रस्त्यांची गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अतिशय दैनावस्था झाली आहे. गेल्या आठवड्यापासून संततधार पाऊस असल्यामुळे या रस्त्यावरून चालणे जिकिरीचे झाले आहे. शहरातील १२५ किलोमीटर रस्त्यांचे भाग्य कधी उघडणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.शहरात अमृत योजनेचे काम सुरू आहे. मात्र हे काम अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. अमृत योजनेचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यांची कामे करू नये, असा आदेश शासनाने पालिकेला दिला आहे. ह्या आदेशाचे कारण पुढे करून पालिका रस्त्यांच्या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. शहरातील यावल-जळगाव व वरणगाव रस्ता सोडला तर एकाही रस्त्याची स्थिती चांगली राहिली नाही. यावल-जळगाव रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे, तर वरणगाव रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वीच करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन रस्त्यांची स्थिती सोडली तर तब्बल ११५ किलोमीटर रस्ते उद्ध््वस्त झाले आहेत. जामनेर रस्ता मुख्य रस्ता म्हणून गणला जातो. मात्र या रस्त्याची अवस्था तर अतिशय बिकट झाली आहे.जे काम झाले तेही निकृष्टदरम्यान, पालिकेतर्फे गेल्यावर्षी मामाजी टॉकीज ते पांडुरंग टॉकीजपर्यंतच्या रस्त्याचे काम करण्यात आले होते. ट्रीमिक्स पद्धतीने बनविण्यात आलेला हा रस्ता आहे. रस्त्याचे काम होताच त्यावेळी महिनाभरात उद्ध्वस्त झाला होता. अतिशय निकृष्ट दर्जाचे काम म्हणून या रस्त्याची गणना झाली होती. पालिकेने संबंधित ठेकेदाराला नोटीस देऊन या रस्त्याचे काम पुन्हा करून घेतले होते.शहरात १२५ किलोमीटर रस्तेशहरात सुमारे १२५ किलोमीटर थांब रस्त्ये असल्याचा अंदाज आहे. यातील यावल - जळगाव हा पाच ते सात किलोमीटर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्त केला आहे. तर भुसावळ आगारापासून राष्ट्रीय महामार्गापर्यंतचा तीन किलोमीटर लांबीचा वरणगाव रस्ता पालिकेने केला आहे. अवघे १० किलोमीटर रस्ते वगळले तर सर्वच रस्त्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे.१५ लाखांचा मुरुम गेला खड्ड्यातगेल्या वर्षी या रस्त्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात येत होत्या. त्यामुळे पालिकेने तक्रारीचा फायदा घेऊन १५ ते २० लाख रुपयांचा मुरूम टाकून खड्डे बुजवण्याचा देखावा निर्माण केला होता. त्यावेळी 'डांबरी रस्त्याला, मुरमाचे ठिगळ' लावल्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालवणे अधिकच कठीण झाले होते.माजी आमदारांनीही केला होता रस्ता रोकोदरम्यान, माजी आमदार संतोष चौधरी यांनी ८ जानेवारी रोजी यावल-जळगाव रस्त्यावर महात्मा गांधी पुतळ्याजवळ रस्त्यांच्या कामांसाठी रस्ता रोको आंदोलन केले होते. तब्बल ४३ मिनिटे हे आंदोलन चालले होते. यावेळी सात दिवसात रस्त्यांची कामे करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली होती, तर तहसीलदार महेंद्र देवरे यांना तेरा मागण्यांचे निवेदन दिले होते. मात्र तरीही पालिकेने दुर्लक्ष केले.पावसाळा संपताच रस्त्यांची कामे सुरू होणार -नगराध्यक्षअमृत योजनेमुळे रस्त्यांची कामे सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली होती. मात्र आता अमृत योजनेचे काम बºयाच प्रमाणात झाले आहे. त्यामुळे पावसाळा संपताच शहरातील काही रस्त्यांची कामे सुरू करण्यात येतील, अशी माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली आहे. यासाठी पाच कोटी रुपये मंजूर असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षBhusawalभुसावळ