शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

भुसावळातील १२५ कि.मी. रस्त्याचे भाग्य कधी उजाडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 21:59 IST

भुसावळ शहरातील रस्त्यांची गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अतिशय दैनावस्था झाली आहे.

ठळक मुद्देसंततधार पावसामुळे रस्त्यावरून चालणे झाले मुश्किलपालिकेचे रस्त्याच्या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष शहरवासीय संतत्प

उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : शहरातील रस्त्यांची गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अतिशय दैनावस्था झाली आहे. गेल्या आठवड्यापासून संततधार पाऊस असल्यामुळे या रस्त्यावरून चालणे जिकिरीचे झाले आहे. शहरातील १२५ किलोमीटर रस्त्यांचे भाग्य कधी उघडणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.शहरात अमृत योजनेचे काम सुरू आहे. मात्र हे काम अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. अमृत योजनेचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यांची कामे करू नये, असा आदेश शासनाने पालिकेला दिला आहे. ह्या आदेशाचे कारण पुढे करून पालिका रस्त्यांच्या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. शहरातील यावल-जळगाव व वरणगाव रस्ता सोडला तर एकाही रस्त्याची स्थिती चांगली राहिली नाही. यावल-जळगाव रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे, तर वरणगाव रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वीच करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन रस्त्यांची स्थिती सोडली तर तब्बल ११५ किलोमीटर रस्ते उद्ध््वस्त झाले आहेत. जामनेर रस्ता मुख्य रस्ता म्हणून गणला जातो. मात्र या रस्त्याची अवस्था तर अतिशय बिकट झाली आहे.जे काम झाले तेही निकृष्टदरम्यान, पालिकेतर्फे गेल्यावर्षी मामाजी टॉकीज ते पांडुरंग टॉकीजपर्यंतच्या रस्त्याचे काम करण्यात आले होते. ट्रीमिक्स पद्धतीने बनविण्यात आलेला हा रस्ता आहे. रस्त्याचे काम होताच त्यावेळी महिनाभरात उद्ध्वस्त झाला होता. अतिशय निकृष्ट दर्जाचे काम म्हणून या रस्त्याची गणना झाली होती. पालिकेने संबंधित ठेकेदाराला नोटीस देऊन या रस्त्याचे काम पुन्हा करून घेतले होते.शहरात १२५ किलोमीटर रस्तेशहरात सुमारे १२५ किलोमीटर थांब रस्त्ये असल्याचा अंदाज आहे. यातील यावल - जळगाव हा पाच ते सात किलोमीटर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्त केला आहे. तर भुसावळ आगारापासून राष्ट्रीय महामार्गापर्यंतचा तीन किलोमीटर लांबीचा वरणगाव रस्ता पालिकेने केला आहे. अवघे १० किलोमीटर रस्ते वगळले तर सर्वच रस्त्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे.१५ लाखांचा मुरुम गेला खड्ड्यातगेल्या वर्षी या रस्त्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात येत होत्या. त्यामुळे पालिकेने तक्रारीचा फायदा घेऊन १५ ते २० लाख रुपयांचा मुरूम टाकून खड्डे बुजवण्याचा देखावा निर्माण केला होता. त्यावेळी 'डांबरी रस्त्याला, मुरमाचे ठिगळ' लावल्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालवणे अधिकच कठीण झाले होते.माजी आमदारांनीही केला होता रस्ता रोकोदरम्यान, माजी आमदार संतोष चौधरी यांनी ८ जानेवारी रोजी यावल-जळगाव रस्त्यावर महात्मा गांधी पुतळ्याजवळ रस्त्यांच्या कामांसाठी रस्ता रोको आंदोलन केले होते. तब्बल ४३ मिनिटे हे आंदोलन चालले होते. यावेळी सात दिवसात रस्त्यांची कामे करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली होती, तर तहसीलदार महेंद्र देवरे यांना तेरा मागण्यांचे निवेदन दिले होते. मात्र तरीही पालिकेने दुर्लक्ष केले.पावसाळा संपताच रस्त्यांची कामे सुरू होणार -नगराध्यक्षअमृत योजनेमुळे रस्त्यांची कामे सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली होती. मात्र आता अमृत योजनेचे काम बºयाच प्रमाणात झाले आहे. त्यामुळे पावसाळा संपताच शहरातील काही रस्त्यांची कामे सुरू करण्यात येतील, अशी माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली आहे. यासाठी पाच कोटी रुपये मंजूर असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षBhusawalभुसावळ