शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस सरकारच्या काळातील १२० कोटींचा निधी पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 12:36 IST

दैव देते अन् कर्म नेते : ४२ कोटींचे काम तीन वर्षांपासून अद्यापही सुरू होईना, गटबाजी व श्रेयवादामुळे पदाधिकारी हतबल

जळगाव : महापालिकेत भाजपची सत्ता येऊन आता दोन वर्षांचा कालावधी होत आहे. मात्र, या दोन वर्षात सत्ताधाऱ्यांना एकही ठोस काम अद्याप करता आलेले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळात मनपाला १६२ कोटी रुपयांचा निधी विविध योजनांव्दारे दिला. मात्र, यापैकी १२० कोटींचा निधी मनपाला तीन ते चार वर्षातही खर्च करता आलेला नाही. गटबाजी, श्रेयवाद या कारणांमुळे निधीतून कामांचे नियोजन सत्ताधाऱ्यांना करता आलेले नाही. तर त्यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या योजनांचे कामदेखील संथगतीने सुरू आहे. त्यामुळे दैव देते आणि कर्म नेते.... अशीच स्थिती निर्माण झाली आहे.राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गुरुवारी शहरात येणार आहेत. फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीच्या वेळेस जळगाव शहराला राज्य शासन कोणताही निधी अपूर्ण पडू देणार नाही असे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर १५ दिवसातच म्हणजेच १६ आॅगस्ट २०१८ रोजी मनपाला नगरोत्थातंर्गत १०० कोटींचा निधी जाहीर केला होता.मात्र, गटबाजीमध्ये अडकलेल्या सत्ताधाºयांना तब्बल दोन वर्षात १०० कोटींचा निधीतून होणाºया कामांचे नियोजनदेखील करता आले नाही. त्यामुळे यानिधीतून अद्याप एक रुपयाही खर्च करता आलेला नाही.इतर योजनाही अपूर्णावस्थेतचकें द्र व राज्य शासनाकडून जळगाव शहरासाठी अमृत अंतर्गत पाणी पुरवठा व भुयारी गटार योजना मंजूर झाली. दोन वर्षात पाणी पुरवठा योजनेचे ५० टक्के काम झाले आहे.भुयारी गटार योजना तब्बल दोन वर्ष केवळ निविदेच्या फेºयात अडकल्याने सहा महिन्यापूर्वी कामाला सुरुवात झाली आहे. सध्या भुयारी गटार योजनेचे केवळ १७ टक्के काम झाले आहे.घनकचराप्रकल्पांतर्र्गत ३२ कोटींचा डीपीआर मनपाला मार्च २०१८ मध्ये मंजूर झाला होता. त्यातून घनकचरा प्रकल्पाच्या कामाला अद्याप सुरुवात झाली नाही.साडे सात कोटींच्या निधीतून शहरासाठी एलईडी लाईट लावण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, निकृष्ट प्रकारचे लाईट लावल्याने सत्ताधाºयांनी हा मक्ता रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवला. अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही.विविध विकासकामांसाठी नगरोत्थानांतर्गत ५ कोटींचा निधी २०१८ मध्ये मिळाला होता. त्यातूनही कामांचे नियोजन मनपाला करता आलेले नाही.३ आॅगस्ट २०१८ रोजी वर्षभरात शहराचा चेहरा-मोहरा बदलवून दाखवून या आश्वासनावर मनपात सत्तांतर होऊन, पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली. मात्र, २५ कोटींचे घबाड कायम राहिले. भाजपाची सत्ता येऊन आता दोन वर्ष झाले आहेत. २५ कोटींपैकी केवळ १० कोटींचा खर्च सत्ताधाºयांना करता आला. तीन वेळा मुुदतवाढ देऊनही सत्ताधाºयांना हा निधी खर्च करता आला नाही. आता अखर्चित १५ कोटींचा निधी शासनाने परत मागविलाा आहे. १०० कोटींच्या कामांचे नियोजन करण्यात गेले १० महिने १६ आॅगस्ट २०१८ रोजी नगरोत्थानांतर्गत मनपाला १०० कोटी रुपयांचा निधी मिळाला. तब्बल १० महिने सत्ताधाºयांना कामांचे नियोजन करता आले नाही.-निधी मिळाल्यानंतर तब्बल १० महिन्यांनंतर निधीतून होणाºया कामांना महासभेची मंजुरी मिळाली. ८ डिसेंबर २०१९ रोजी राज्यातील नव्या शासनाने या निधीला स्थगिती दिल्यामुळे संपूर्ण नियोजनच बिघडले. धुळे महापालिकेलाही फडणवीस सरकारच्या कार्यकाळात १०० कोटींचा निधी मिळाला होता. त्याठिकाणी कामे होत असताना जळगाव महापालिकेत मात्र हा निधी अजूनही अखर्चितच आहे.-नाशिक येथे बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना काळात खरेदीसाठी टेंडरची गरज नसल्याचे जाहीर केले होते. जळगावसाठी त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी दिलेला निधी आता टेंडरच्या फेºयात अडकला आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला जणू छेद दिला जात असल्याचे म्हटले जात आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव