शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वाकडी प्रकरण : तक्रार मागे घेण्यासाठी १२ तास ठेवले ओलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 12:40 IST

जामनेर व जळगाव येथे आणले न्यायालयात

ठळक मुद्देगाव पुढाऱ्यांनी आणला दबावचारचाकीत बसविले अन् जामनेरात आणले

विकास पाटीलजळगाव : विहिरीत पोहले म्हणून आमच्या दोन मुलांना बेदम मारहाण केली, नागडे करुन त्यांची धिंड काढली. विनवण्या करुनही त्यांची सुटका केली नाही, याबाबत पोलिसात दिलेली तक्रार मागे घ्यावी यासाठी आमच्यावर प्रचंड दबाव आणला. आम्हाला १२ तास ओलीस ठेवले, अशी धक्कादायक माहिती पीडित मुलांच्या कुटुंबीयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.जामनेर तालुक्यातील वाकडी येथील ईश्वर बळवंत जोशी यांच्या शेतात मातंग समाजाचे मुले पोहले म्हणून त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली व त्यांची धिंड काढल्याची घटना १० जून रोजी घडली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार करुनही त्यांनी १३ रोजी गुन्हा दाखल केला. पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी काही गाव पुढाºयांनी पीडित मुलांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर प्रचंड दबाव आणला. १४ रोजी तब्बल १२ तास या कुटुंबीयांना ओलीस ठेवण्यात आल्याची थरारक माहिती या कुटुंबीयांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीला दिली.तक्रार मागे घेण्यासाठी खूप दबावकुटुंबीय म्हणाले, आमच्या दोन मुलांना अमानुषपणे मारहाण केल्याची घटना आम्हाला आधी मुलांनी सांगितली नाही. या घटनेचा गावात व्हिडिओ व्हायरल झाला. तो काही लोकांनी आम्हाला दाखविला. त्यात आपली मुले खूप मारखात असल्याचे आम्हाला दिसले. त्याबाबत मुलांना विचारले असता त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्याबाबत तक्रार देण्यासाठी आम्ही पहूर पोलीस स्टेशनला गेलो. तेथे तक्रार दिली. मात्र तुम्ही फत्तेपूरला जा असे पोलिसांनी सांगितले...आम्ही फत्तेपूरला गेलो. तेथून पुन्हा पहूरला पाठविले. तक्रार करण्याच्या आधी विचार करा, असे आम्हाला बजावले. आम्ही तक्रार देण्यावर ठाम होतो. तक्रार देवून आम्ही घरी आलो. ती मागे घेण्यासाठी काही मंडळींनी आमच्यावर खूप दबाव आणला.चारचाकीत बसविले अन् जामनेरात आणलेआम्ही तक्रार मागे घेत नसल्याने काही मंडळी गुरुवार, १४ रोजी सकाळीच आमच्या घरी आले. त्यांनी आमच्या सोबत चला म्हणून आग्रह केला. एका मोठ्या चार चाकीत आम्हाला (पीडित मुले व दोन्ही कुटुंबांना) बसविले. जामनेर येथे आणले. तेथे न्यायालयापुढे हे प्रकरण आणून मिटवून टाकू असे आम्हाला सांगितले.त्यासाठी न्यायालय आवारात आणले. वकीलांनी आमची समजूत घातली. आमच्या हातांचे ठसेही घेतले. त्यानंतर मोठ्या कोर्टात (जळगावात आणले) जळगावात आणल्यानंतर न्यायालयाच्या आवारात आम्हाला नेण्यात आले. तेथे काही वकील आले. त्यांनीही आमची समजूत घातली. ईश्वर जोशी यांच्या शेतातून चोरी केली म्हणून आपल्यावरही गुन्हा दाखल होईल म्हणून व गाव पुढाºयांनी आपल्यावर प्रचंड दबाव आणल्याने आणि आपल्याला यापुढे गावातच राहावयाचे असल्याने तक्रार मागे घेण्यास तयार झालो. त्यासाठी काही कागदांवर ठसेही घेण्यात आले. त्यानंतर आम्हाला पुन्हा जामनेरला आणण्यात आले.रात्र झाल्याने गुरुवारी एका खोलीत आम्ही मुक्काम केला. शुक्रवार, १५ रोजी वाकडी गावात आम्हाला सोडण्यात आले, असे कुटुंबीयांनी ‘लोकमत’ला सांगितले.चोरीचा गुन्हा दाखल करण्याची जोशीची धमकीईश्वर जोशीने तर शेतातील पाच पानबुड्या व ठिबकच्या नळ्यांचे बंडल तुम्ही चोरी केल्या अशी तक्रार तुमच्याविरुद्ध देण्यात येईल, अशी धमकी दिली होती. तर काही लोक आमच्या घरी आले व तक्रार मागे घेण्याची विनंती करु लागले. जे झाले ते विसरुन जा. तुम्हाला काय हवे ते आम्हाला सांगा तुम्हाला ते देवू असे म्हणू लागले. मात्र आम्ही ऐकले नाही. तक्रारीवर ठाम होतो.वाकडी प्रकरणातील चौघे कारागृहातजामनेर तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत पोहण्यासाठी गेले म्हणून दोन मुलांना नग्न करून मारहाण केल्या प्रकरणातील संशयित आरोपी ईश्वर बळवंत जोशी, प्रल्हाद कैलास लोहार, अजिज कासम तडवी, शकनुर सरदार तडवी (सर्व रा़ वाकडी़ ता़ जामनेर) यांना जळगावात न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.क्रमश:

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव