शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

१२ शेतकऱ्यांनी रक्ताने स्वाक्षऱ्या करून दिले निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पावसाअभावी तिबार पेरणी करूनही भीषण नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पावसाअभावी तिबार पेरणी करूनही भीषण नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी तालुक्यातील १२ शेतकऱ्यांनी त्यांच्या रक्ताने स्वाक्षऱ्या केलेले निवेदन तहसीलदारांना दिले. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हे शेतकरी जळालेली पिके घेऊन तहसील कार्यालयात दाखल झाले होते.

जळगाव तालुक्यातील सुजदे, भोलाणे या भागातील शेतकऱ्यांनी हे निवेदन दिले आहे. तहसील कार्यालयात आल्यानंतर या शेतकऱ्यांनी एका छोट्या बाटलीत इंजेक्शनद्वारे रक्त काढून घेतले होते. १२ शेतकऱ्यांनी काढलेले या रक्ताने निवेदानावर नावापुढे माचिसच्या काडीने एक एक करून स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर हे निवेदन व पाऊसपाण्याअभावी जळालेली पिके घेऊन त्यांनी तहसीलदारांना दिले.

शासनाला जागे करण्यासाठी रक्ताचा वापर

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कधी अवकाळी पावसाने तर कधी पावसाअभावी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात पीकविम्याची रक्कम मिळतच नसल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. अखेर शासनाला जाग येण्यासाठी त्यांना व्यथा कळण्यासाठी आम्ही आता रक्तानेच सह्या करून निवेदन देत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. प्रशासनाने तातडीने मदत जाहीर करावी व जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

यांनी केल्या स्वाक्षऱ्या

संभाजी सोनवणे, दिनेश सोनवणे, मोहन सोनवणे, जगदीश सोनवणे, महारू सोनवणे, जनार्दन सोनवणे, अर्जुन सोनवणे, डिगंबर सोनवणे, सुक्राम सोनवणे, गोकुळ सोनवणे, जितेंद्र सोनवणे, गणेश सोनवणे या शेतकऱ्यांनी नावे लिहून रक्ताने स्वाक्षऱ्या केल्या.