शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

१२ शेतकऱ्यांनी रक्ताने स्वाक्षऱ्या करून दिले निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पावसाअभावी तिबार पेरणी करूनही भीषण नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पावसाअभावी तिबार पेरणी करूनही भीषण नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी तालुक्यातील १२ शेतकऱ्यांनी त्यांच्या रक्ताने स्वाक्षऱ्या केलेले निवेदन तहसीलदारांना दिले. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हे शेतकरी जळालेली पिके घेऊन तहसील कार्यालयात दाखल झाले होते.

जळगाव तालुक्यातील सुजदे, भोलाणे या भागातील शेतकऱ्यांनी हे निवेदन दिले आहे. तहसील कार्यालयात आल्यानंतर या शेतकऱ्यांनी एका छोट्या बाटलीत इंजेक्शनद्वारे रक्त काढून घेतले होते. १२ शेतकऱ्यांनी काढलेले या रक्ताने निवेदानावर नावापुढे माचिसच्या काडीने एक एक करून स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर हे निवेदन व पाऊसपाण्याअभावी जळालेली पिके घेऊन त्यांनी तहसीलदारांना दिले.

शासनाला जागे करण्यासाठी रक्ताचा वापर

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कधी अवकाळी पावसाने तर कधी पावसाअभावी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात पीकविम्याची रक्कम मिळतच नसल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. अखेर शासनाला जाग येण्यासाठी त्यांना व्यथा कळण्यासाठी आम्ही आता रक्तानेच सह्या करून निवेदन देत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. प्रशासनाने तातडीने मदत जाहीर करावी व जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

यांनी केल्या स्वाक्षऱ्या

संभाजी सोनवणे, दिनेश सोनवणे, मोहन सोनवणे, जगदीश सोनवणे, महारू सोनवणे, जनार्दन सोनवणे, अर्जुन सोनवणे, डिगंबर सोनवणे, सुक्राम सोनवणे, गोकुळ सोनवणे, जितेंद्र सोनवणे, गणेश सोनवणे या शेतकऱ्यांनी नावे लिहून रक्ताने स्वाक्षऱ्या केल्या.