शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
2
आजपासून नेमके काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? पीएफच्या नियमांत मोठे बदल!
3
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
4
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
5
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
6
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
7
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
8
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
9
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
10
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
11
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
12
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
13
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
14
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
15
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
16
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
17
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
18
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
19
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
20
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
Daily Top 2Weekly Top 5

१२ शेतकऱ्यांनी रक्ताने स्वाक्षऱ्या करून दिले निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पावसाअभावी तिबार पेरणी करूनही भीषण नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पावसाअभावी तिबार पेरणी करूनही भीषण नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी तालुक्यातील १२ शेतकऱ्यांनी त्यांच्या रक्ताने स्वाक्षऱ्या केलेले निवेदन तहसीलदारांना दिले. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हे शेतकरी जळालेली पिके घेऊन तहसील कार्यालयात दाखल झाले होते.

जळगाव तालुक्यातील सुजदे, भोलाणे या भागातील शेतकऱ्यांनी हे निवेदन दिले आहे. तहसील कार्यालयात आल्यानंतर या शेतकऱ्यांनी एका छोट्या बाटलीत इंजेक्शनद्वारे रक्त काढून घेतले होते. १२ शेतकऱ्यांनी काढलेले या रक्ताने निवेदानावर नावापुढे माचिसच्या काडीने एक एक करून स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर हे निवेदन व पाऊसपाण्याअभावी जळालेली पिके घेऊन त्यांनी तहसीलदारांना दिले.

शासनाला जागे करण्यासाठी रक्ताचा वापर

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कधी अवकाळी पावसाने तर कधी पावसाअभावी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात पीकविम्याची रक्कम मिळतच नसल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. अखेर शासनाला जाग येण्यासाठी त्यांना व्यथा कळण्यासाठी आम्ही आता रक्तानेच सह्या करून निवेदन देत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. प्रशासनाने तातडीने मदत जाहीर करावी व जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

यांनी केल्या स्वाक्षऱ्या

संभाजी सोनवणे, दिनेश सोनवणे, मोहन सोनवणे, जगदीश सोनवणे, महारू सोनवणे, जनार्दन सोनवणे, अर्जुन सोनवणे, डिगंबर सोनवणे, सुक्राम सोनवणे, गोकुळ सोनवणे, जितेंद्र सोनवणे, गणेश सोनवणे या शेतकऱ्यांनी नावे लिहून रक्ताने स्वाक्षऱ्या केल्या.