शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

  उसाच्या १०००१ रोपाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 22:55 IST

 सावखेडासीम (ता. यावल) येथील शेतकरी संतोष अनिल बडगुजर यांनी १०००१ उसाच्या वाणाचे रोप तयार करून विक्री सुरू केली.

ठळक मुद्देशेतीसह सुरू झाला जोडधंदादौºयातून मिळाला रोजगार सावखेडासीम येथील शेतकºयाचा यशस्वी प्रयोग

आॅनलाईन लोकमत, दि़- २० जळगाव : सांगली येथील राजाराम बापू साखर कारखान्यात उसाच्या रोपनिर्मितीचा प्रयोग सावखेडासीम (ता. यावल) येथील शेतकरी संतोष अनिल बडगुजर यांनी शिकला आणि तोच जळगावातही सुरू केला़ १०००१ उसाच्या वाणाचे रोप त्यांनी तयार करून विक्री सुरू केली आहे़ यातून त्यांना शेतीसह जोडधंदा मिळाला आहे़ दिवसाला तीन हजार खांडवे तयार करून चांगल्या उसाच्या रोपनिर्मितीचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला आहे. संतोष बडगुजर हे गेल्या अनेक वर्षांपासून शेती करीत आहेत. त्यात त्यांना वडील अनिल बडगुजर यांचे मार्गदर्शन व साथ मिळत आहे़ बडगुजर यांनी टिश्यूकल्चर केळी रोपाप्रमाणे चॉप कटर मशीन आणले आहे़ त्यातून रोज तीन हजार उसाचे खाळंबे तयार केले जातात़ त्यातील डोळे काढून चुन्याच्या निवळीत टाकून व तयार केलेल्या मेलाथिआॅन व बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून रोपांना ट्रेमध्ये टाकले जाते़ यातून चांगल्या गुणवत्तेच्या रोपांची निर्मिती होते आहे़कार्बेनडिझमचा वापरया रोपाच्या निर्मिती दरम्यान जमिनीतून तयार होणाºया बुरशीजन्य रोगाची बाधा होण्याची शक्यता असते. यासाठी तसेच चांगली उगवण होण्यासाठी उसाची बेणे प्रक्रिया केली जाते़ त्यासाठी कार्बेनडिझम या बुरशीनाशकाचा वापर केला जातो़ तीन वर्षांपूर्वी मधुकर साखर कारखान्याच्या वतीने काही शेतकरी पश्चिम महाराष्टÑात अभ्यास दौºयावर गेले होते. सांगली येथील राजाराम बापू साखर कारखान्यात उसाच्या रोपनिर्मितीचा प्रयोग त्यांनी पाहिला. त्यानंतर त्यांनी या रोपाची निर्मिती स्वत: सुरू केली.४० हजार रोपांची मागणीनिरोगी आणि चांगले उत्पन्न देणाºया या वाणाच्या रोपांची ४० हजार यावल तालुक्यातील शेतकºयांनी मागणी केली आहे. सध्या अडीच रुपये प्रती रोपाप्रमाणे उसाच्या रोपाची विक्री करण्यात येत आहे. मेलाथिआॅन ५० ई़सी़ ३०० एम.एल. अधिक कार्बेनडिझम १०० ग्रॅम १०० लीटर पाण्यात मिसळून १० ते १५ मिनिट बुडवून ते ट्रे मध्ये टाकले जातात. त्यामुळे रोप निरोगी निघते. या रोपाची लागवड साडेचार फूट अंतरावर करावी. त्यामुळे एका रोपाला किमान २५ ते ३० फुटवे निघून एकरी १०० टनप्रमाणे उसाचा उतारा निघतो. या तंत्राचा वापर केल्यास ऊस लागवड शेतकºयासाठी फायदेशीर ठरत असते. बडगुजर यांनी त्याचा प्रत्यक्षात प्रयोग करून अनुभव घेतला आहे़

१०००१ ऊस वाणानंतर सेंद्रिय भाजीपाला उत्पादन करण्याचा मानस आहे. सुरुवातीला परिवारासाठी नंतर अन्य शेतकºयांना ते विक्री करण्यात येणार आहे. सध्या १०००१ ऊस वाणाच्या रोप निर्मितीकडे लक्ष आहे. टिश्यूकल्चर केळी बियाण्याप्रमाणेच या रोपासही प्रतिसाद मिळत आहे.- संतोष अनिल बडगुजर, सावखेडासीम ता. यावल, जि. जळगाव.