शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

दहावी फेरपरीक्षेत तब्बल १ हजार ९६८ विद्यार्थी ‘नापास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 14:36 IST

महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी फेरपरीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये जिल्ह्याचा निकाल ३३.४५ टक्के इतका लागला आहे. तर तब्बल १ हजार ९६८ विद्यार्थी परीक्षेत नापास झाले आहेत. 

ठळक मुद्दे३ हजार विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा जिल्ह्याचा ३३.४५ टक्के निकालउत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार अकरावीला प्रवेश

आॅनलाईन लोकमत,

जळगाव-दि.२९,-महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी फेरपरीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये जिल्ह्याचा निकाल ३३.४५ टक्के इतका लागला आहे. तर तब्बल १ हजार ९६८ विद्यार्थी परीक्षेत नापास झाले आहेत. 

मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी जुलै महिन्यात फेर परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार गेल्या दोन वर्षांपासून ही परीक्षा घेण्यात येते. जिल्ह्यातुन २ हजार ९८४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यापैकी २ हजार ९५७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी केवळ ९८९ विद्यार्थी उत्तीर्ण होवू शकले आहेत. 

उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेशअकरावी प्रवेश प्रक्रिया जरी संपली असली तरी दहावी फेर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश मिळणार आहे. शिक्षण विभागाकडून महाविद्यालयांना अतिरीक्त जागांसाठी सूचना पाठविली जाणार आहे. तसेच  या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही त्या दृष्टीने विज्ञान शाखेत सुध्दा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शिक्षण विभागाकडून महाविद्यालयांना बुधवारी पत्र  पाठविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी दिली.