शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
2
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
3
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
4
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
5
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
6
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
7
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
8
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
9
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
10
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
11
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
12
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
13
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
14
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
15
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
16
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
17
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
18
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
19
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
20
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 

कजगाव परिसरात बादलीभर पाण्यासाठी १ कि.मी. पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:55 IST

वाढत्या उन्हासोबत टंचाईच्या झळा तीव्र

कजगाव, ता. भडगाव : ऊन्हाची तीव्रता जसजशी वाढत आहे तसतसे तितूर नदी काठावरील गावात पाणी टंचाईचेही चटके तीव्र होऊ लागले आहेत. मळगाव, तांदुळवाडी, पासर्डी या गावामध्ये शोधून देखील पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. बादलीभर पाण्यासाठी एक कि.मी. पायपीट करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. त्यामुळे या गावांमध्ये तत्काळ टँकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.पावसाळ््यापासून नदी पात्र कोरडेठाकगेल्या वर्षी कमी पावसामुळे तितूर नदी जेमतेम वाहिली. त्यात चाळीसगाव तालुक्याच्या सीमेपर्यंत तितूर नदीवर सिमेंटचे पक्के बंधारे (विना दरवाजाचे) बांधण्यात आले आहे. त्या मुळे या बंधाऱ्यातून पाणी पुढे आलेच नाही व या नदीची पाण्याची बारीक धारदेखील भडगाव तालुक्यातील सहा गावात व पाचोरा तालुक्यातील दोन गावात पोहचलीच नाही.त्यामुळे या आठ गावातील तितूर नदीचे पात्र चक्क पावसाळ्यातदेखील कोरडेच होते. या मुळे या भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.पासर्डी येथे २० दिवसाआड पाणीपुरवठाकजगावपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पासर्डी, ता भडगाव येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. येथे वीस दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. १९९८ मध्ये लोकवर्गणीतून खोदलेल्या विहिरीवरून गावास पाणी पुरवठा केला जातो. मात्र याच विहिरीने तळ गाठल्याने पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. गावकऱ्यांना सकाळी लवकर उठून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.एक किलोमीटर अंतरावरील सार्वजनिक विहिरीवरून बादली-बादली पाणी तोलून काढायचे, नंतर ते एक किलोमीटर डोक्यावर घेत घर गाठावे लागत आहे. यात घरातील सर्वच सदस्यांचा आता दिनक्रम झाला आहे. यात लहान मुली, मुलं हे सारेच पाण्यासाठी एक किलोमीटरची पायपीट करीत आहे. यावर तोडगा म्हणून पासर्डी ग्रामपंचायतकडून विहीर अधिग्रहित करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र अद्याप विहीर अधिग्रहित न झाल्याने पाणी समस्या कठीण झाली आहे.जमिनीत पाणीच नसल्याने विहिरी कोरड्यातितूर नदीच पूर्ण पावसाळ्यात कोरडी ठाक होती. या मुळे जमिनीतील जलपातळी खोल गेल्यामुळे बहुतांष विहिरी कोरड्या पडल्या आहेत तर काही प्रमाणात बागायती शेतीतील विहिरींना गुरांचा पाणी प्रश्न सुटेल एवढे पाणी आहे.दिवसभर शोध घेतल्यानंतर मिळते गुरांना पाणीमाणसांनाच पिण्यासाठी पाणी नाही तर पशुधनास पाणी आणाव कोठून या विवंचनेत पशूपालक असल्याचे चित्र आहे. दिवसभर शोध मोहीम राबवत पाण्याचा शोध घेतल्यानंतर त्या शेत मालकाच्या विनवण्या करत गुरांना पाणी मिळत आहे. मात्र या साठी गावकऱ्यांना दिवसभर पाणी शोध मोहीम राबवावी लागत आहे.कजगाव, पासर्डी, तांदुळवाडी, मळगाव, उमरखेड, भोरटेक या भडगाव तालुक्यातील सहा गाव व पिंप्री, घुसर्डी या पाचोरा तालुक्यातील दोन गावांत केवळ तितूर नदी हीच अमृतधारा आहे. मात्र तिच्या अमृत धारेचेच हरण झाल्याने तूर्त तरी तांदुळवाडी, पासर्डी व मळगाव या तीन गावात गिरणा नदी वरून टँकरने पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे, अशी मागणी होऊ लागली आहे. परिसरातील बºयाच विहिरी कोरड्या पडल्या आहेत तर अनेक विहिरींनी तळ गाठला आहे त्यामुळे कितीही विहिरी अधिग्रहित केल्या तरी त्याचा काही उपयोग होणार नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे गिरणेवरून टँकरने पाणी पुरवठा करणे हेच सोयीचे होईल व पाणी प्रश्न काही प्रमाणात मिटेल, एवढी आशा आता केली जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव