शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
3
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
4
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
5
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
6
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
7
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
8
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
9
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
10
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
11
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
12
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
13
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
14
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
15
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
16
Vastu Tips: तिजोरीत स्थिर लक्ष्मी हवी? घरात करा हे ६ बदल, पैसा टिकेल आणि वाढेलही!
17
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
18
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
19
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीचा पंचनामा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:40 IST

पंचायत राज समितीने जालना जिल्हा परिषदेने केलेल्या कामांचा खरोखरच पंचनामा केला आहे. तीन दिवसात येऊन त्यांच्या हाती काय लागणार ही चर्चा यामुळे बाजूला पडली

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या आठवड्यात पंचायत राज समिती दौऱ्यावर येणार म्हणून अधिकारी, कर्मचारी धास्तावले होते. आता ही समिती गेल्यावर समितीने केलेल्या चिरफाडीचे कवित्व आणि वेगवेगळे किस्से चर्चिले जात आहेत. ही बाब जरी खरी असली तरी, एका अर्थाने पंचायत राज समितीने जालना जिल्हा परिषदेने केलेल्या कामांचा खरोखरच पंचनामा केला आहे. तीन दिवसात येऊन त्यांच्या हाती काय लागणार ही चर्चा यामुळे बाजूला पडली असून, या समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांच्या रौद्ररूपामुळे तत्कालीन आणि विद्यमान अधिकारी चांगलेच हवालदिल झाले आहेत. जलसंधारणाच्या कामात किती भयावह अनियमितता आहे, हे आ. पारवे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. या जलसंधारणाच्या कामात सर्वपक्षीय राजकीय पाणी किती खोलवर मुरले आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. यापूर्वी जिल्हा परिषदेतील सिंचन घोटाळा राज्यभर गाजला होता. आजही अनेक जलसंधारण तलाव तसेच पाझर तलाव हे सिंचन आणि बांधकाम खात्याला शोधूनही सापडणार नाहीत. ही कामे करून याच्या संचिकाच गायब होण्याचे प्रकारही नवीन नाहीत. या पूर्वी म्हणजेच २०१४ मध्ये पंचायत राज समितीच्या दौºयातही स्थानिक स्तर विभागाच्या जलसंधारणाच्या कामांची तक्रार होऊन तत्कालीन कार्यकारी अभियंता यादव यांच्यावर कारवाईचा बडगा या समितीने उगारला होता. या स्थानिक स्तरच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे मंजूर झालेल्या तलावामुळे सिंचन कमी आणि राजकीय नेते, पदाधिकाºयांच्या तिजोºयाच जास्त भरल्या आहेत, हे नाकारून चालणार नाही. ही समिती जिल्हा दौºयावर येऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी जे प्रयत्न केले त्याचीही चर्चा समिती अध्यक्षांपर्यंत पोहचली होती. तसेच समितीची बडदास्त राखताना अर्थपूर्ण व्यवहार करू नये म्हणून ज्या सूचना जि. प. कर्मचाºयांच्या व्हाटस्अप ग्रुपवर फिरल्या त्या समिती सदस्यांपर्यंतही पोहचल्या होत्या. त्यामुळे तर अध्यक्ष पारवे यांनी अत्यंत कडक शिस्तीने एकेका लेखा आक्षेपांची झाडाझडती घेतली. आरोग्य व शिक्षण विभागाचाही खरा चेहरा या निमित्ताने जनतेसमोर आला. सत्तेचा केंद्रबिंदू असलेल्या जालना जिल्ह्यात शासकीय निधीची कशी पध्दतशीर सर्वपक्षीय लूट सुरू आहे. हेच यावरून दिसून येते. रोजगार हमी योजनेतील सिंचन विहिरींचा मुद्दाही या समितीच्या नजरेतून सुटलेला नाही. या समितीचे अध्यक्ष आ. पारवे यांनी तर जिल्हा परिषदेचा साधा चहाही घेतला नसल्याचे त्यांनी जाहीर केले. असे असले तरी बदनापूर तालुक्यातील एका शाळेतील गणिताच्या प्रश्नावरून जो धुरळा उठला होता, ते गणित चुटकीसरशी कसे सुटले यावरही अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या समितीच्या निरीक्षणामुळे जिल्हा परिषदेतील वरून कीर्तन आतून गोंधळाचे वास्तव सर्वसामान्यांच्या नजरेस आले. अनेक उच्चपदस्थ अधिकारी कशी वेळ मारून जबाबदारीतून दूर जातात हे देखील या निमित्ताने समोर आले. एकूणच पंचायत राज समितीने जिल्हा परिषदेतील गोंधळाचा पंचनामा करून पंचाईत केली, असेच म्हणावे लागेल.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदGovernmentसरकार