शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

जिल्हा परिषद प्रशासन, खासगी संस्था चालकांमध्ये जुंपली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 01:03 IST

जिल्हा परिषदेने नियम बाह्य सुरु केलेले पाचवी व आठवीचे वर्ग प्रशासनाने बंद करावे, अशी मागणी खासगी शिक्षकांनी केली आहे. परंतु, शासनाने सुरु केलेले वर्ग प्रशासनास बंद करता येत नसल्याने प्रशासन व खासगी संस्था चालकांमध्ये वाद सुरु आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेने नियम बाह्य सुरु केलेले पाचवी व आठवीचे वर्ग प्रशासनाने बंद करावे, अशी मागणी खासगी शिक्षकांनी केली आहे. परंतु, शासनाने सुरु केलेले वर्ग प्रशासनास बंद करता येत नसल्याने प्रशासन व खासगी संस्था चालकांमध्ये वाद सुरु आहे.राज्यातील प्राथमिक शाळांना पाचवी व आठवीचा वर्ग शासनस्तरावरून मान्य करण्यात आला होता. त्यानुसार जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका आदी शाळांमध्ये या वर्गांना जोडण्याची मान्यता देण्यात आली. मात्र खासगी संस्था व प्रशासन यांच्यामध्ये वर्ग उघडण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. बहुतांश विद्यार्थी ५ वी ते ८ वी पर्यंत जिल्हा परिषद शाळेतच शिक्षण घेत असल्याने संस्थेकडे प्रवेश घेण्याचा कल कमी झाला आहे. यामुळे संस्थेतील शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे हा वाद अधिकच वाढला आहे.१ किलोमीटरच्या आत ५ वीचा वर्ग व ३ किलोमीटरच्या आत आठवीचा वर्ग नसावा, असा नियम आहे. असे असतानाही शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ५ वी व ८ वीचे वर्ग नियम बाह्य सुरु केले आहे. याचा परिणाम खाजगी संस्थांमधील विद्यार्थ्यांवर होत आहे. विद्यार्थी खाजगी संस्थांमधील प्रवेश काढुन जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेत आहे.याबाबत प्रशासनाला आतापर्यंत २३ तक्रारी प्राप्त झाल्या आहे. जिल्हा परिषद शाळेचे ५ वी व आठवीचे वर्ग बंद करण्याची मागणी खाजगी शाळेच्या शिक्षकांनी केली आहे.यासाठी काही दिवसांपूर्वीच जि.प.समोर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची प्रशासनाकडून अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासन व संस्था चालकांमध्ये चांगली जुपली आहे.५ वी, ८ वीचे वर्ग सुरु करण्यावर निर्बंधशालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ५ वी व आठवीचे वर्ग सुरु करण्यासाठी निर्बंध घातले आहे. जिल्हा परिषद अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत ५ वी व ८ वी वर्ग करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना राहणार आहे. पूर्वीप्रमाणे या वर्गांना सरसकट मान्यता देता येणार नाही. त्यासाठी विविध बाबींची पूर्तता करावी लागणार आहे.जि.प. किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत ५ वी किंवा ८ वी वर्गासाठी पटसंख्येचे निर्बंध घालण्यात आले आहेत. ५ वी वर्गासाठी किमान ३० व ८ वीसाठी किमान ३५ पटसंख्या आवश्यक आहे. तरच ५ वी व ८ वीचे वर्ग सुरु करण्यास मंजुरी देण्यात येईल. तसेज वर्ग मान्यता देण्यासाठी वर्गखोली उपलब्ध असण्याची भौतिक अट, आठवीचा वर्ग सुरू करण्यासाठी विज्ञान प्रयोगशाळा असणे गरजेचे आहे, आदी अटी घालण्यात आल्या आहेत.काय सांगतो नियम१ किलोमीटरच्या आत ५ वीचा वर्ग व ३ किलोमीटरच्या आत आठवीचा वर्ग नसावा, असा नियम आहे. परंतु, तरीही शासनाने जिल्हा परिषद शाळांमध्ये ५ वी व ८ वीचे वर्ग दिले आहेत.

टॅग्स :SchoolशाळाJalna z pजालना जिल्हा परिषदEducation Sectorशिक्षण क्षेत्र