शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

जिल्हा परिषद प्रशासन, खासगी संस्था चालकांमध्ये जुंपली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 01:03 IST

जिल्हा परिषदेने नियम बाह्य सुरु केलेले पाचवी व आठवीचे वर्ग प्रशासनाने बंद करावे, अशी मागणी खासगी शिक्षकांनी केली आहे. परंतु, शासनाने सुरु केलेले वर्ग प्रशासनास बंद करता येत नसल्याने प्रशासन व खासगी संस्था चालकांमध्ये वाद सुरु आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेने नियम बाह्य सुरु केलेले पाचवी व आठवीचे वर्ग प्रशासनाने बंद करावे, अशी मागणी खासगी शिक्षकांनी केली आहे. परंतु, शासनाने सुरु केलेले वर्ग प्रशासनास बंद करता येत नसल्याने प्रशासन व खासगी संस्था चालकांमध्ये वाद सुरु आहे.राज्यातील प्राथमिक शाळांना पाचवी व आठवीचा वर्ग शासनस्तरावरून मान्य करण्यात आला होता. त्यानुसार जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका आदी शाळांमध्ये या वर्गांना जोडण्याची मान्यता देण्यात आली. मात्र खासगी संस्था व प्रशासन यांच्यामध्ये वर्ग उघडण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. बहुतांश विद्यार्थी ५ वी ते ८ वी पर्यंत जिल्हा परिषद शाळेतच शिक्षण घेत असल्याने संस्थेकडे प्रवेश घेण्याचा कल कमी झाला आहे. यामुळे संस्थेतील शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे हा वाद अधिकच वाढला आहे.१ किलोमीटरच्या आत ५ वीचा वर्ग व ३ किलोमीटरच्या आत आठवीचा वर्ग नसावा, असा नियम आहे. असे असतानाही शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ५ वी व ८ वीचे वर्ग नियम बाह्य सुरु केले आहे. याचा परिणाम खाजगी संस्थांमधील विद्यार्थ्यांवर होत आहे. विद्यार्थी खाजगी संस्थांमधील प्रवेश काढुन जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेत आहे.याबाबत प्रशासनाला आतापर्यंत २३ तक्रारी प्राप्त झाल्या आहे. जिल्हा परिषद शाळेचे ५ वी व आठवीचे वर्ग बंद करण्याची मागणी खाजगी शाळेच्या शिक्षकांनी केली आहे.यासाठी काही दिवसांपूर्वीच जि.प.समोर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची प्रशासनाकडून अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासन व संस्था चालकांमध्ये चांगली जुपली आहे.५ वी, ८ वीचे वर्ग सुरु करण्यावर निर्बंधशालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ५ वी व आठवीचे वर्ग सुरु करण्यासाठी निर्बंध घातले आहे. जिल्हा परिषद अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत ५ वी व ८ वी वर्ग करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना राहणार आहे. पूर्वीप्रमाणे या वर्गांना सरसकट मान्यता देता येणार नाही. त्यासाठी विविध बाबींची पूर्तता करावी लागणार आहे.जि.प. किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत ५ वी किंवा ८ वी वर्गासाठी पटसंख्येचे निर्बंध घालण्यात आले आहेत. ५ वी वर्गासाठी किमान ३० व ८ वीसाठी किमान ३५ पटसंख्या आवश्यक आहे. तरच ५ वी व ८ वीचे वर्ग सुरु करण्यास मंजुरी देण्यात येईल. तसेज वर्ग मान्यता देण्यासाठी वर्गखोली उपलब्ध असण्याची भौतिक अट, आठवीचा वर्ग सुरू करण्यासाठी विज्ञान प्रयोगशाळा असणे गरजेचे आहे, आदी अटी घालण्यात आल्या आहेत.काय सांगतो नियम१ किलोमीटरच्या आत ५ वीचा वर्ग व ३ किलोमीटरच्या आत आठवीचा वर्ग नसावा, असा नियम आहे. परंतु, तरीही शासनाने जिल्हा परिषद शाळांमध्ये ५ वी व ८ वीचे वर्ग दिले आहेत.

टॅग्स :SchoolशाळाJalna z pजालना जिल्हा परिषदEducation Sectorशिक्षण क्षेत्र