शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

‘गझल’चा वारसा तरूण पिढी समर्थपणे जपतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:34 IST

तरूण पिढी ताकदीचे गझल लेखन करून गझल वारसा समर्थपणे जपत आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध गझलकार दास पाटील यांनी मंगळवारी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कवी सुरेश भटानंतर शिथिलता आलेल्या ‘गझल’ची सोशल मीडियामुळे व्यापकता वाढली असून, तरूण पिढी ताकदीचे गझल लेखन करून गझल वारसा समर्थपणे जपत आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध गझलकार दास पाटील यांनी मंगळवारी केले.मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मंगळवारी भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद शाखा जालना आणि जेईएस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गझल कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ‘ते’ बोलत होते.यावेळी उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ. जवाहर काबरा हे उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राव साहेब ढवळे, प्रसिद्ध गझलकार मसूद पटेल, चित्रपट कथा लेखक चेतन सैंदाने, डॉ. राज रणधीर, डॉ. पंडित रानोमाळ, डॉ. के. जी. सोनकांबळे आदींची उपस्थिती होती.पाटील म्हणाले, गझल, काव्यातून क्रांती घडवून आणली जाते, हे इतिहास दर्शवितो. गझल ही आपल्या जीवनाशी निगडित असते. गझलमुळे जीवन व्यापक होते. व्याकरण आणि तंत्र सांभाळून गझल लेखन करायला पाहिजे, शिवाय गझल लेखन करताना आशय, अचूकता व प्रभावीरीत्या विषयाची मांडणी करणे गरजेचे आहे. सोशल मीडियामुळे गझल लोकप्रिय होत आहे. नवीन पिढीतील गझलकार ताकदीचे गझल लेखन करताना दिसत आहेत. इंद्रजित उगले, अजय त्रिभुवन, सुरेश यलगुडे, सांबरे आदी गझलकार ताकदीचे गझल लेखन करीत आहेत.गझलकार मसूद पटेल यांनी गझल ही अर्थपूर्ण आणि प्रभावी असावी, असे सांगून गझलचा वारसा समर्थपणे जपण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे, असे आवाहन केले.प्रारंभी प्राचार्य डॉ. जवाहर काबरा यांच्या हस्ते वृक्ष जलदान करून या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. संशोधन परिषद शाखेचे सचिव डॉ. पंडित रानमाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

टॅग्स :literatureसाहित्यSocial Mediaसोशल मीडिया