शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

‘गझल’चा वारसा तरूण पिढी समर्थपणे जपतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:34 IST

तरूण पिढी ताकदीचे गझल लेखन करून गझल वारसा समर्थपणे जपत आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध गझलकार दास पाटील यांनी मंगळवारी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कवी सुरेश भटानंतर शिथिलता आलेल्या ‘गझल’ची सोशल मीडियामुळे व्यापकता वाढली असून, तरूण पिढी ताकदीचे गझल लेखन करून गझल वारसा समर्थपणे जपत आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध गझलकार दास पाटील यांनी मंगळवारी केले.मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मंगळवारी भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद शाखा जालना आणि जेईएस महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गझल कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ‘ते’ बोलत होते.यावेळी उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ. जवाहर काबरा हे उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राव साहेब ढवळे, प्रसिद्ध गझलकार मसूद पटेल, चित्रपट कथा लेखक चेतन सैंदाने, डॉ. राज रणधीर, डॉ. पंडित रानोमाळ, डॉ. के. जी. सोनकांबळे आदींची उपस्थिती होती.पाटील म्हणाले, गझल, काव्यातून क्रांती घडवून आणली जाते, हे इतिहास दर्शवितो. गझल ही आपल्या जीवनाशी निगडित असते. गझलमुळे जीवन व्यापक होते. व्याकरण आणि तंत्र सांभाळून गझल लेखन करायला पाहिजे, शिवाय गझल लेखन करताना आशय, अचूकता व प्रभावीरीत्या विषयाची मांडणी करणे गरजेचे आहे. सोशल मीडियामुळे गझल लोकप्रिय होत आहे. नवीन पिढीतील गझलकार ताकदीचे गझल लेखन करताना दिसत आहेत. इंद्रजित उगले, अजय त्रिभुवन, सुरेश यलगुडे, सांबरे आदी गझलकार ताकदीचे गझल लेखन करीत आहेत.गझलकार मसूद पटेल यांनी गझल ही अर्थपूर्ण आणि प्रभावी असावी, असे सांगून गझलचा वारसा समर्थपणे जपण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे, असे आवाहन केले.प्रारंभी प्राचार्य डॉ. जवाहर काबरा यांच्या हस्ते वृक्ष जलदान करून या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. संशोधन परिषद शाखेचे सचिव डॉ. पंडित रानमाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

टॅग्स :literatureसाहित्यSocial Mediaसोशल मीडिया