शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपतींच्या स्वराज्यातील मावळ्यांप्रमाणे तरुणांनी जगणे स्वीकारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:27 IST

भोकरदन : छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य हे अठरापगड जातींना बरोबर घेऊन चालणारे आहे. परस्त्री ही मातेसमान असल्याचे संस्कार ...

भोकरदन : छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य हे अठरापगड जातींना बरोबर घेऊन चालणारे आहे. परस्त्री ही मातेसमान असल्याचे संस्कार देणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या स्वराज्यात आपण जगत आहोत. या राज्यात या ठिकाणी राहणाऱ्या प्रत्येक तरुणाने छत्रपतींच्या स्वराज्यातील मावळ्यांप्रमाणे ताठ मानेने जगणे स्वीकारावे, असे प्रतिपादन शिवव्याख्याता, कीर्तनकार शिवलीला पाटील बार्शीकर यांनी केले.

भोकरदन तालुक्यातील बाभुळगाव येथे शिवजयंतीनिमित्त अखिल भारतीय महिला वारकरी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यअध्यक्षा कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजय देवरे, गजानन गाढे, विशाल गाढे यांची प्रमुख उपस्थिती होती. आजचे तरुण हे दिशाहीन होत चालले आहे. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील तरुण हा व्यसनाकडे वळाला आहे. केवळ शिवजयंतीच्या कार्यक्रमातून शिवाजी महाराजांवरील प्रेम न दाखवता त्यांच्या स्वप्नातील स्वराज्य घडवण्यासाठी युवकांनी एक आदर्श नागरिक तयार होणे काळाजी गरज आहे. छत्रपतींचे स्वराज्य हे अख्ख्या जगात आदर्श आहे. मग त्या राज्यातील मावळा हा सर्वच संस्कृतीसाठी वरचढ आहे. असे असताना पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब करून छत्रपतींच्या स्वराज्याला बदनाम करू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी टाळकरी सेवेसाठी ज्ञानेश्वर माऊली लिंगेवाडीकर, प्रकाश महाराज लिंगेवाडीकर, नितीन महाराज शिंदे बेल्होरा, प्रकाश महाराज शिंदे लिंगेवाडीकर, अर्जुन महाराज देवरे, शंकर महाराज राऊत, प्रमोद महाराज सहाणे निमगांव, सांडू पाटील राऊत, प्रल्हाद बनसोडे, चोपदार राजू महाराज शिरसाठ यांनी साथ दिली. कार्यक्रमासाठी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हादी चाऊस, उपाध्यक्ष समाधान काळे यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थानी परिश्रम घेतले.

चौकट

महिलांनी मालिकांवर नव्हे तर मुलांवर लक्ष द्यावे

आजच्या महिला या मालिका अन् चित्रपटाकडे वळाल्या असून, बालकांवर करावयाचे संस्कार ही बाब विसरुन गेल्या आहेत. महिलांनी मालिका न बघता आजचा मुलगा हा भविष्यातील चांगला नागरिक कसा होईल ? यासाठी काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.