शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बीड जिल्ह्यातील तरुणाला शहागड येथे जिवंत जाळले; आर्थिक व्यवहारात घातपात झाल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 12:45 IST

बीड जिल्ह्य़ातील सामनापुर येथील तरुणाचे तारेने हात-पाय बांधून जिवंत जाळल्याची घटना रविवारी मध्यरात्रीनंतर 2 वाजेच्या दरम्यान शहागड पासून जवळ असलेल्या पाथरवाला रस्त्यावर कुरण फाट्यावर घडली. अनंत श्रीकांत इंगोले  (27, रा. सामनापुर. ता. जि. बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे.

ठळक मुद्देअनंत श्रीकांत इंगोले  (27, रा. सामनापुर. ता. जि. बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे.अनंत हा वासनवाडी  (ता.जि. बीड) च्या ग्रामपंचायत कार्यालयात ऑपरेटर म्हणून काम करत असे.

शहागड ( जालना ) : बीड जिल्ह्य़ातील सामनापुर येथील तरुणाचे तारेने हात-पाय बांधून जिवंत जाळल्याची घटना रविवारी मध्यरात्रीनंतर 2 वाजेच्या दरम्यान  शहागड पासून जवळ असलेल्या पाथरवाला रस्त्यावर कुरण फाट्यावर घडली. अनंत श्रीकांत इंगोले  (27, रा. सामनापुर. ता. जि. बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे.

अनंत हा वासनवाडी  (ता.जि. बीड) च्या ग्रामपंचायत कार्यालयात ऑपरेटर म्हणून काम करत असे. तसेच खाजगीत तो पॅन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड आदी तो काढून देण्याचे काम करायचा.  काही दिवसांपूर्वी त्याने पार्टनरशिप मध्ये हायवा ट्रक घेतला होता, आणि तो मुंबईत चालवण्यासाठी दिला होता. यासोबतच त्याने बँकींग ची परिक्षा देण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी औरंगाबादला खासगी क्लाॅस लावला होता. यासाठी तो औरंगाबाद येथेच भाड्याच्या घरात राहत होता.

मध्यरात्री घडली घटना शहागड जवळील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना च्या वाॅचमनने गोंदी पोलिसांना मध्यरात्री १.३० च्या दरम्यान एक मृतदेह येथील रस्तावर जळत असल्याची माहिती दिली. यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनुने यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. यावेळी मृतदेह जळत होता, तो विझवण्याचा पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, उपनिरीक्षक विकास कोकाटे, सहाय्यक फौजदार सय्यद नासेर यांच्या सहकार्याने प्रयत्न केले मात्र ते व्यर्थ ठरले.तसेच मृताचे हात पाय तारेने बांधलेले होते अशी माहिती सोनुने यांनी दिली. मृतदेहाजवळ अर्धवट जळालेले पाॅकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, एटीएम कार्ड, काही पैसे व अन्य कागदपत्रे आढळून आले.  

घातपात बाबत दिली होती मित्राला कल्पनारविवारी औरंगाबादहून बीडकडे येत असताना रात्री १२ वाजेच्या दरम्यान मित्र नवनाथ चव्हाण याने त्याला काॅल केला होता. तेव्हा आम्ही पाचोड जवळच्या ढाब्यावर जेवत आहोत, आणि माझ्या जिवाला धोका आहे, असे म्हटल्यााचे नवनाथ याने सांगितले.

भावास रात्री १२.४५ ला केला एसएमएसअनंत ने घटना घडण्यापूर्वी पुणे येथे इंजिनिअर असलेल्या गोविंद इंगोले ला मोठ्या भावास एसएमएस केला होता. यात धुमाळ व अन्य एक माझ्या सोबत आहेत, आणि 21 लाख रुपये मला येणे आहे, असे एसएमएस मध्ये नमूद केले होते.