शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

बीड जिल्ह्यातील तरुणाला शहागड येथे जिवंत जाळले; आर्थिक व्यवहारात घातपात झाल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 12:45 IST

बीड जिल्ह्य़ातील सामनापुर येथील तरुणाचे तारेने हात-पाय बांधून जिवंत जाळल्याची घटना रविवारी मध्यरात्रीनंतर 2 वाजेच्या दरम्यान शहागड पासून जवळ असलेल्या पाथरवाला रस्त्यावर कुरण फाट्यावर घडली. अनंत श्रीकांत इंगोले  (27, रा. सामनापुर. ता. जि. बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे.

ठळक मुद्देअनंत श्रीकांत इंगोले  (27, रा. सामनापुर. ता. जि. बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे.अनंत हा वासनवाडी  (ता.जि. बीड) च्या ग्रामपंचायत कार्यालयात ऑपरेटर म्हणून काम करत असे.

शहागड ( जालना ) : बीड जिल्ह्य़ातील सामनापुर येथील तरुणाचे तारेने हात-पाय बांधून जिवंत जाळल्याची घटना रविवारी मध्यरात्रीनंतर 2 वाजेच्या दरम्यान  शहागड पासून जवळ असलेल्या पाथरवाला रस्त्यावर कुरण फाट्यावर घडली. अनंत श्रीकांत इंगोले  (27, रा. सामनापुर. ता. जि. बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे.

अनंत हा वासनवाडी  (ता.जि. बीड) च्या ग्रामपंचायत कार्यालयात ऑपरेटर म्हणून काम करत असे. तसेच खाजगीत तो पॅन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड आदी तो काढून देण्याचे काम करायचा.  काही दिवसांपूर्वी त्याने पार्टनरशिप मध्ये हायवा ट्रक घेतला होता, आणि तो मुंबईत चालवण्यासाठी दिला होता. यासोबतच त्याने बँकींग ची परिक्षा देण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी औरंगाबादला खासगी क्लाॅस लावला होता. यासाठी तो औरंगाबाद येथेच भाड्याच्या घरात राहत होता.

मध्यरात्री घडली घटना शहागड जवळील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना च्या वाॅचमनने गोंदी पोलिसांना मध्यरात्री १.३० च्या दरम्यान एक मृतदेह येथील रस्तावर जळत असल्याची माहिती दिली. यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश सोनुने यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. यावेळी मृतदेह जळत होता, तो विझवण्याचा पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, उपनिरीक्षक विकास कोकाटे, सहाय्यक फौजदार सय्यद नासेर यांच्या सहकार्याने प्रयत्न केले मात्र ते व्यर्थ ठरले.तसेच मृताचे हात पाय तारेने बांधलेले होते अशी माहिती सोनुने यांनी दिली. मृतदेहाजवळ अर्धवट जळालेले पाॅकेट, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, एटीएम कार्ड, काही पैसे व अन्य कागदपत्रे आढळून आले.  

घातपात बाबत दिली होती मित्राला कल्पनारविवारी औरंगाबादहून बीडकडे येत असताना रात्री १२ वाजेच्या दरम्यान मित्र नवनाथ चव्हाण याने त्याला काॅल केला होता. तेव्हा आम्ही पाचोड जवळच्या ढाब्यावर जेवत आहोत, आणि माझ्या जिवाला धोका आहे, असे म्हटल्यााचे नवनाथ याने सांगितले.

भावास रात्री १२.४५ ला केला एसएमएसअनंत ने घटना घडण्यापूर्वी पुणे येथे इंजिनिअर असलेल्या गोविंद इंगोले ला मोठ्या भावास एसएमएस केला होता. यात धुमाळ व अन्य एक माझ्या सोबत आहेत, आणि 21 लाख रुपये मला येणे आहे, असे एसएमएस मध्ये नमूद केले होते.