शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेत जिल्ह्याचे काम पथदर्शी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:15 IST

जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बालरक्षकांच्या माध्यमातून साडेतीन हजार शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केलेले कार्य, इतर जिल्ह्यांसाठी पथदर्शी असल्याचे प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी केले.

जालना : जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बालरक्षकांच्या माध्यमातून साडेतीन हजार शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केलेले कार्य, इतर जिल्ह्यांसाठी पथदर्शी असल्याचे प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी केले.शनिवारी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बालरक्षक आणि क्षेत्रिय अधिकाºयांच्या सहविचार सभेत ते बोलत होते.या वेळी उपसंचालक सुभाष कांबळे, सहसंचालक बाबर, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे सिद्धेश्वर वाडेकर, श्याम मकरंदपुरे, क्षीरसागर, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.दोन सत्रांत झालेल्या या सभेत पहिल्या सत्रात शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी बालरक्षकांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामाचा नंदकुमार यांनी आढावा घेतला. या वेळी जिल्हाभरातून आलेल्या बालरक्षकांनी आपले अनुभव सांगितले. ऊसतोड कामगार, व मोलमजुरीसाठी स्थलांतरित होणा-या कुटुंबातील मुलांचे शिक्षण अर्धवट सुटणार नाही, यासाठी शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम अधिक व्यापक करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. दुपारच्या सत्रात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची त्यांनी शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडून माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षकांनी काय करायला हवे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना प्रत्येक संकल्पना अधिक सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यासाठी ई-लर्निंग शिक्षण पद्धतीवर भर देण्याच्या सूचना त्यांनी या वेळी संबंधित अधिका-यांना दिल्या. या वेळी शिक्षणाधिकारी पांडुरंग कवाणे, एम. के. देशमुख, कैलास दातखीळ, डायटचे प्राचार्य जयराम भटकर, नागेश मापारी यांच्यासह गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, बालसंरक्षक आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.