शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेत जिल्ह्याचे काम पथदर्शी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:15 IST

जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बालरक्षकांच्या माध्यमातून साडेतीन हजार शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केलेले कार्य, इतर जिल्ह्यांसाठी पथदर्शी असल्याचे प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी केले.

जालना : जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बालरक्षकांच्या माध्यमातून साडेतीन हजार शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केलेले कार्य, इतर जिल्ह्यांसाठी पथदर्शी असल्याचे प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी केले.शनिवारी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बालरक्षक आणि क्षेत्रिय अधिकाºयांच्या सहविचार सभेत ते बोलत होते.या वेळी उपसंचालक सुभाष कांबळे, सहसंचालक बाबर, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे सिद्धेश्वर वाडेकर, श्याम मकरंदपुरे, क्षीरसागर, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.दोन सत्रांत झालेल्या या सभेत पहिल्या सत्रात शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी बालरक्षकांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामाचा नंदकुमार यांनी आढावा घेतला. या वेळी जिल्हाभरातून आलेल्या बालरक्षकांनी आपले अनुभव सांगितले. ऊसतोड कामगार, व मोलमजुरीसाठी स्थलांतरित होणा-या कुटुंबातील मुलांचे शिक्षण अर्धवट सुटणार नाही, यासाठी शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम अधिक व्यापक करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. दुपारच्या सत्रात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची त्यांनी शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडून माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षकांनी काय करायला हवे, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना प्रत्येक संकल्पना अधिक सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यासाठी ई-लर्निंग शिक्षण पद्धतीवर भर देण्याच्या सूचना त्यांनी या वेळी संबंधित अधिका-यांना दिल्या. या वेळी शिक्षणाधिकारी पांडुरंग कवाणे, एम. के. देशमुख, कैलास दातखीळ, डायटचे प्राचार्य जयराम भटकर, नागेश मापारी यांच्यासह गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, बालसंरक्षक आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.