शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
3
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
4
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
5
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
6
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
7
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
9
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
10
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
11
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
12
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
13
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
14
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
15
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
16
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
17
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
18
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
19
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
20
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा

दहा सुट्यांमुळे कामकाज ढेपाळले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:31 IST

या एका महिन्यात दहा सुट्यांमुळे प्रशासकीय कामकजावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास ही एक प्रचलित म्हण आहे, त्याचा अनुभव सध्या सर्व जनता अनुभवत आहे. आता तुम्ही म्हणाल, संस्कृतीने घालून दिलेले सणवारही साजरे करू नयेत का ? तर तो मुद्दा निराळा आहे. या एका महिन्यात दहा सुट्यांमुळे प्रशासकीय कामकजावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे.जालना जिल्ह्यातील जवळपास सर्वच शासकीय कार्यालये ही रेल्वे वेळापत्रकानुसार चालात. जालन्यातील नागरी सुविधांचा बोलबाला, मनोरंजनाच्या साधनाचा अभाव शैक्षणिक मागासलेपण यामुळे जालन्यात अधिकारी आणि कर्मचारी वर्ग थांबण्यास तयार नसतो. जालना जिल्ह्यातील बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी एक तर औरंगाबाद किंवा परभणी येथून अप-डाऊन करतात. त्याचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर होत आहे. कुठल्याही कार्यालयात गेल्यास चार वाजेनंतर कर्मचाऱ्यांना रेल्वेचे वेध लागतात. हे कर्मचारी सकाळी किमान ११.३० वाजेच्या सुमारास कार्यालयात येतात. आणि लगेचच रेल्वेचे लोकेशन मोबाईलवर तपासून त्यानुसार कामकाजाच्या वेळा ठरतात.पंधरा दिवसांपूर्वी तर ज्या रेल्वेने सर्व कर्मचारी येतात ती रेल्वे मुळातच औरंगाााद रेल्वे स्थानकावर चक्क दहा वाजता आणि नंतर दीड तास म्हणजे ही रेल्वे जालना रेल्वेस्थानकात पावणे बाराच्या सुमारास आली होती. त्यावरून शासकीय कार्यालयात हे कर्मचारी कधी पोहोचले असतील याचा विचार न केलेलाच बरा. गेल्या काही दिवसांमध्ये अप-डाऊनचे फॅड वाढले आहे. याला कारण हे कर्मचारी मुंबईत तर यापेक्षाही जास्त दूर अप-डाऊन करावे लागते असे देतात. मात्र तेथील अधिकारी, कर्मचारी ही कार्यालयाची वेळ पाळतात हे विसरून चालणार नाही.एकूणच जिल्ह्यातील जवळपास ४० पेक्षा अधिक विभागातून अधिकारी, कर्मचारीे अप-डाऊन करत असल्याचे दिसून येते.जालना : अनेक शिक्षण संस्थांची तीच गतयेथील शासकीय तंत्र निकेतनसह अन्य शासकीय संस्थामध्ये तर एकाच कारमध्ये सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी वर्ग येतात. लागणारे भाडे हे ज्याची कार असेल त्यांना ते विभागून देतात. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे वास्तव आहे. मात्र याकडे कधी ना शिक्षणधिका-याने ना कधी कोणत्या लोकप्रतिनिधीने लक्ष दिल्याचे दिसून येत नाही.नोव्हेंबरमध्ये चार रविवार तसेच दुसरा आणि चौथा श्निवारसह दिवाळी, पाडवा आणि भाऊबीज तसेच गुरूनानक जयंती, ईद आदी सुट्यांमुळे या महिन्यात दहा सुट्या लागून आल्याने कामाकजावर परिणाम झाला आहे. यामुळे पाणी टंचाई तसेच टँकर सुरू करण्यासह बोंडअळीचे अनुदान मिळावे म्हणून लोकांची कामे खोळंबली आहेत.बायोमेट्रिक नावालाविविध शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा बसवली आहे. मात्र ती केवळ नावालाच आहे. पूर्वी या बायोमेट्रिकवर थंब केल्यानुसारच कर्मचाºयांचे वेतन होत असत. मात्र आता याची माहिती ना लेखा विभागाला असते ना. नियोजन त्यामुळे शासकीय कर्मचा-यांसाठी कार्यालय म्हणजे आओ-जाओ घर तुम्हारा अशी अवस्था झाली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारEducationशिक्षण