शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

दहा सुट्यांमुळे कामकाज ढेपाळले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:31 IST

या एका महिन्यात दहा सुट्यांमुळे प्रशासकीय कामकजावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास ही एक प्रचलित म्हण आहे, त्याचा अनुभव सध्या सर्व जनता अनुभवत आहे. आता तुम्ही म्हणाल, संस्कृतीने घालून दिलेले सणवारही साजरे करू नयेत का ? तर तो मुद्दा निराळा आहे. या एका महिन्यात दहा सुट्यांमुळे प्रशासकीय कामकजावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे.जालना जिल्ह्यातील जवळपास सर्वच शासकीय कार्यालये ही रेल्वे वेळापत्रकानुसार चालात. जालन्यातील नागरी सुविधांचा बोलबाला, मनोरंजनाच्या साधनाचा अभाव शैक्षणिक मागासलेपण यामुळे जालन्यात अधिकारी आणि कर्मचारी वर्ग थांबण्यास तयार नसतो. जालना जिल्ह्यातील बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी एक तर औरंगाबाद किंवा परभणी येथून अप-डाऊन करतात. त्याचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर होत आहे. कुठल्याही कार्यालयात गेल्यास चार वाजेनंतर कर्मचाऱ्यांना रेल्वेचे वेध लागतात. हे कर्मचारी सकाळी किमान ११.३० वाजेच्या सुमारास कार्यालयात येतात. आणि लगेचच रेल्वेचे लोकेशन मोबाईलवर तपासून त्यानुसार कामकाजाच्या वेळा ठरतात.पंधरा दिवसांपूर्वी तर ज्या रेल्वेने सर्व कर्मचारी येतात ती रेल्वे मुळातच औरंगाााद रेल्वे स्थानकावर चक्क दहा वाजता आणि नंतर दीड तास म्हणजे ही रेल्वे जालना रेल्वेस्थानकात पावणे बाराच्या सुमारास आली होती. त्यावरून शासकीय कार्यालयात हे कर्मचारी कधी पोहोचले असतील याचा विचार न केलेलाच बरा. गेल्या काही दिवसांमध्ये अप-डाऊनचे फॅड वाढले आहे. याला कारण हे कर्मचारी मुंबईत तर यापेक्षाही जास्त दूर अप-डाऊन करावे लागते असे देतात. मात्र तेथील अधिकारी, कर्मचारी ही कार्यालयाची वेळ पाळतात हे विसरून चालणार नाही.एकूणच जिल्ह्यातील जवळपास ४० पेक्षा अधिक विभागातून अधिकारी, कर्मचारीे अप-डाऊन करत असल्याचे दिसून येते.जालना : अनेक शिक्षण संस्थांची तीच गतयेथील शासकीय तंत्र निकेतनसह अन्य शासकीय संस्थामध्ये तर एकाच कारमध्ये सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी वर्ग येतात. लागणारे भाडे हे ज्याची कार असेल त्यांना ते विभागून देतात. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे वास्तव आहे. मात्र याकडे कधी ना शिक्षणधिका-याने ना कधी कोणत्या लोकप्रतिनिधीने लक्ष दिल्याचे दिसून येत नाही.नोव्हेंबरमध्ये चार रविवार तसेच दुसरा आणि चौथा श्निवारसह दिवाळी, पाडवा आणि भाऊबीज तसेच गुरूनानक जयंती, ईद आदी सुट्यांमुळे या महिन्यात दहा सुट्या लागून आल्याने कामाकजावर परिणाम झाला आहे. यामुळे पाणी टंचाई तसेच टँकर सुरू करण्यासह बोंडअळीचे अनुदान मिळावे म्हणून लोकांची कामे खोळंबली आहेत.बायोमेट्रिक नावालाविविध शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा बसवली आहे. मात्र ती केवळ नावालाच आहे. पूर्वी या बायोमेट्रिकवर थंब केल्यानुसारच कर्मचाºयांचे वेतन होत असत. मात्र आता याची माहिती ना लेखा विभागाला असते ना. नियोजन त्यामुळे शासकीय कर्मचा-यांसाठी कार्यालय म्हणजे आओ-जाओ घर तुम्हारा अशी अवस्था झाली आहे.

टॅग्स :GovernmentसरकारEducationशिक्षण