शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

Women's Day Special : बाईंच्या कष्टाला ‘कृषिभूषण’ लगडलं ! : छायाबाई दत्तात्रय मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 12:10 IST

महिलांना संधी दिली तर शेतीतूनही प्रगती शक्य

- संजय देशमुखजालना : माहेरी शेती असतानाही कधी काम केले नाही. पण, सासरी आल्यावर कुटुंबाला हातभार लावला पाहिजे, या विचाराने त्या शेतीत उतरल्या. संघर्ष हा शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेला असतो. हे कळलेल्या ‘बाई’ने शेतीत झोकून दिले. कष्टाचे चीज झाले म्हणतात, पण जालना तालुक्यातील गोलापांगरी येथील छायाबाई दत्तात्रय मोरे यांच्या कष्टाला ‘कृषिभूषण’ पुरस्काराचे फळ लगडले!

१९८४ पासून शेतीत रमलेल्या कृषिभूषण छायाबाई मोरे म्हणाल्या, शेती ही एकच इंडस्ट्री अशी आहे ज्यात मूठभर टाकले की, पोते भरून मिळते. शेतीतून प्रगती साधायची असेल, तर महिलांना संधी आणि हक्क दिले पाहिजेत. शेती करताना मजूर मिळणे अवघड झाले आहे. कधी शेतात गडी आला नाही, तर महिला पदर खोचून कामाला लागतात. माहेरी असेपर्यंत मी कधी शेतात गेले नाही. लग्नानंतर मात्र कुटुंबाच्या भल्यासाठी शेतात काम करायला सुरुवात केली. पती दत्तात्रय मोरे यांनी वेळोवेळी भक्कम पाठिंबा दिला. त्यामुळेच शेतीतून प्रगती साधता आली. आज मजूर मिळत नसल्याने यांत्रिकीकरणावर भर देते. फवारणी करताना अडचण नको म्हणून कपाशीची लागवड केली. त्यातून मिनी ट्रॅक्टर जाईल अशा पद्धतीनेच ही लागवड केली. पाण्याचे महत्त्व ओळखून अन्य पिके असो की, फळबागा दोन्ही ठिबक पद्धतीनेच केली जातात, असे शेतीतील यशस्वीतेचे गणित छायाबाई सांगत होत्या. आता छायाबार्इंकडे बघून त्यांची नात अंकितादेखील शेतीत रमली आहे. तिलाही शेतीतच करिअर करायचे आहे. आपल्या शेतीचे हे फलित असल्याचे छायाबाई अभिमानाने सांगतात.

...तर शेती फायद्याची ठरेलमहिलांच्या हाती शेतीचे व्यवहार द्यायला हवे. त्यामुळे शेती निश्चितच फायद्याची ठरेल. हे पटवून देण्यासाठी छायाबार्इंनी महिला बचत गटाचे उदाहरण दिले. त्या म्हणाल्या, महिलांनी छोट्या-छोट्या उद्योगांसाठी घेतलेले कर्ज फेडण्याची टक्केवारी ही पुरुषांनी घेतलेल्या कर्जफेडीच्या कितीतरी पट जास्त आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचार मनात आणायलाच नको. संघर्षातून पुढे जाणाराच हिंमतवाण असतो, असे छायाबाई म्हणाल्या.

अन् मोदींनीच पतीला बोलावून घेतलेगुजरातमधील गांधीनगर येथे दोन वर्षापूर्वी एका समारंभात माझा पंतप्रधान नरेंद्र मोेदी यांच्या हस्ते सत्कार होणार होता. पुरस्काराच्या वेळी पोलिसांनी मला एकटीलाच व्यासपीठावर सोडले. त्यामुळे मी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. मोदींनी याचे कारण विचारले. माझ्या हाती शेतीचे व्यवहार देणाऱ्या माझ्या पतीला हा पुरस्कार घेण्यासाठी बोलवावे, अशी विनंती मी केली. मोदींनी स्वत: पतीला बोलावले. तो क्षण कायमचा मनावर कोरला गेलाय, असे त्या सांगतात.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनWomenमहिलाJalanaजालना