शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

दारूबंदीसाठी महिलांनी जागून काढली रात्र, आंदोलनाला चोवीस तास; आता आरपारची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 14:09 IST

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील महिला बचत गटाच्या महिला दारूबंदीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरुवारी दारू दुकानासमोर सुरू केलेले आंदोलन शुक्रवारी चोवीस तास उलटूनही सुरूच आहे

पारध (जालना) :  भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील महिला बचत गटाच्या महिला दारूबंदीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरुवारी दारू दुकानासमोर सुरू केलेले आंदोलन शुक्रवारी चोवीस तास उलटूनही सुरूच आहे. जोपर्यंत दारू विक्रीचे दुकान कायमचे बंद होत नाही तोपर्यंत माघार न घेण्याचा पवित्रा या रणरागिनींना घेतल्याने पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांना  महिलांना दारू दुकान बंद करण्याची कायदेशीर प्रक्रिया सांगण्याची वेळ आली आहे.

पिंपळगाव रेणुकाई येथे दोन देशी तर दोन विदेशी दारुची दुकाने असून येथे मुबलक प्रमाणात दारू मिळत असल्याने अनेकजण  दिवसभर दारूच्या व्यसनात बुडालेले असतात. गावातील अनेक तरुण देखील व्यसनाच्या विळख्यात ओढल्या जात आहेत. त्यामुळे गावात सतत भांडण तंटे होत आहेत. पती-पत्नी यांच्यात दारूमुळे वाद होण्याचे प्रकार वाढले असून, अनेकांचे संसार मोडले आहेत. तर काही मोडण्याच्या मार्गावर आहेत.  गावात दारूबंदी करण्यासाठी महिलांनी ग्रामपंचायत, पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी यांना निवेदने दिली. मात्र, त्याचा काहीच परिणाम झाला नाही. या उलट हे प्रकार आणखीच वाढत गेले. अखेर गुरुवारी सकाळी शेकडो महिलांनी एकत्र येत एकत्र जमल्या. गावातील दोन्ही दारू दुकानांसमोर ठिय्या मांडून या दुकानांची शटर बंद करून घेत दारू विक्री बंद पडली. त्यामुळे दारू विक्रेत्यांनी पोलिसांना पाचारण केले. परंतु महिलांनी पोलिसांना न जुमानले नाही.  दारू दुकानात कंटनेरमध्ये विक्रीसाठी आलेली दारूचे खोके स्वत: कंटनेरमध्ये चढून फेकून दिले. सायंकाळी शेतातून कामाहून आलेल्या काही महिलांनी या आंदोलनात सहभागी झाल्या. त्यामुळे महिलांची ताकद आणखी वाढली . रात्री देखील महिलांचा मुक्काम दारू दुकानासमोर होता. विशेष म्हणजे रात्रीच्या जेवणाचे डबे देखील या महिलांनी अंदोलन स्थळीच मागवले. शुक्रवारी दहा वाजता चोवीस तास उलटूनही महिला दुकांनासमोर ठाण मांडून आहेत.  उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक प्रवीण ठाकूर यांनी आंदोलकर्त्या महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही निष्फळ ठरला. या संदर्भात पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम भागवत म्हणाले, की  आम्हाला वरिष्ठांनी आदेश दिल्यास आम्ही दारूबंदीबाबत योग्य कार्यवाही करू.

आम्ही दिवसभर शेतात राबराब राबतो. मात्र घरीची माणसे गावात दारू पितात.  त्यामुळे संसार गाडा चालवायचा कसा. दारुची दुकाने बंद झाले की हे प्रश्न सुटू शकेल. म्हणून आम्ही आंदोलनाचा मार्ग निवडला.- निर्मला चव्हाण, पिंपळगावरेणुकाई

 घरची माणसे दारू पीत असल्यामुळे त्यांचे घराकडे अजिबात लक्ष नाही. सर्व कुटुंब कायम तणावग्रस्त असते. म्हणून दारूबंदी होणे महत्वाचे आहे. जो पर्यंत येथील दारू कायम बंद होत नाही तो पर्यंत आम्ही अंदोलन माघे घेणार नाही.- निर्मला चव्हाण,  पिंपळगावरेणुकाई

या महिलांचे अंदोलन करणे हे रास्त आहे. कारण संसार हा पती पत्नी दोघांचा आहे. पती जर दारू पिऊन कामधंदा करत नसेल तर या माऊल्यांनी काय करावे प्रशासनाने त्यांची हाक ऐकून त्यांना प्रतिसाद द्यावा. - ह.भ.प.ज्ञानेश्वर शेलूदकर-व्यसनमुक्ती पुरस्कर्ते