शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

विकासाच्या मुद्यावर जिंकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 00:35 IST

भोकरदन : भोकरदन विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षाच्या काळात केलेल्या विकास कामाच्या माध्यमातून आम्ही मतदाराकडे जाणार आहोत. त्या आधारेच ...

ठळक मुद्देरावसाहेब दानवे : धाक दाखवून कोणालाही पक्षात घेतले नाही, भोकरदनमध्ये सभा

भोकरदन : भोकरदन विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षाच्या काळात केलेल्या विकास कामाच्या माध्यमातून आम्ही मतदाराकडे जाणार आहोत. त्या आधारेच संतोष दानवे हे पुन्हा निवडून येणार आहेत, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री खा. रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. तसेच कोणत्याही पदाधिकारी, नेत्याला धाक दाखवून भाजपात घेतले नसल्याचेही ते म्हणाले.भाजपाचे उमेदवार आ. संतोष दानवे यांनी शुक्रवारी रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री खा. रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, निर्मला दानवे, रेणू दानवे, रमेश गव्हाड यांची उपस्थिती होती.दानवे म्हणाले, विरोधी पक्षाच्या उमेदवाराने बारा वर्ष सत्ताधारी आमदार असताना काय विकास केला व पुढे काय करणार आहे हे न सांगता केवळ वैयक्तिक टिका व आरोप करण्याचे काम केले आहे. आम्ही त्याकडे लक्ष देणार नाही.मात्र गेल्या पाच वर्षामध्ये जालना लोकसभा मतदार संघात विकासात्मक किती मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. या भागाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षात कोणी राहण्यास तयार नाही. तुम्हाला कार्यकर्ते संभाळता आले नाहीत, त्याचा आम्हाला कशासाठी दोष देता ? असा प्रश्न उपस्थित करीत तुम्ही सुध्दा भाजपामध्येच होता. मग तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये जाण्यासाठी कोणी धाक दाखविला होता हे सांगा ? असा सवालही दानवे यांनी विरोधकांसमोर उपस्थित केला. यावेळी लोकजागरचे अध्यक्ष केशव जंजाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन समर्थकांसह भाजपात प्रवेश केला.यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनीही आ. संतोष दानवे यांनी केलेल्या कामांचे कौतुक करीत त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, भास्कर दानवे, राजेंद्र देशमुख, विलास अडगावकर, कौतीक जगताप, आशा पांडे, विजयसिंह परिहार, ब्रम्हानंद चव्हाण, रमेश गव्हाड, केशव जंजाळ, सिध्दार्थ मुळे, नवनाथ दौड, मनिष श्रीवास्त्व, साहेबराव कानडजे, ओमप्रकाश चितळकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.दानवे : विरोधकांकडे बोलण्यासाठी काही नाहीआमदार म्हणून निवडून आल्यापासून आजवर आपण केंद्र, राज्य शासनाच्या माध्यमातून एक ना अनेक विकास कामे केली आहेत. केवळ सभागृहे बांधून विकास होत नाही. शेतकऱ्यांची उन्नती होण्यासाठी जलसंधारणाची कामे आवश्यक आहेत. त्यादृष्टीने केळना, जुई, धामणा, गिरजा, जिवरेखा, रायघोळ, या नद्यांवर सिमेंट बंधारे, कोल्हापुरी बंधारे बांधून सिंचन क्षमता वाढविली. या पाच धरणाची कामे केली. शिवाय ३३ केव्हीचे १० स्टेशन, रोहीत्र व मागेल त्याला शेततळे या योजनेतून राज्यात सर्वाधिक शेततळे या भागात देण्यात आल्याचे सांगत केलेल्या विकास कामांचा उहापोह केला.

टॅग्स :JalanaजालनाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Raosaheb Danweरावसाहेब दानवेArjun Khotkarअर्जुन खोतकरSantosh Danweyसंतोष दानवे