शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या मुद्यावर जिंकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 00:35 IST

भोकरदन : भोकरदन विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षाच्या काळात केलेल्या विकास कामाच्या माध्यमातून आम्ही मतदाराकडे जाणार आहोत. त्या आधारेच ...

ठळक मुद्देरावसाहेब दानवे : धाक दाखवून कोणालाही पक्षात घेतले नाही, भोकरदनमध्ये सभा

भोकरदन : भोकरदन विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षाच्या काळात केलेल्या विकास कामाच्या माध्यमातून आम्ही मतदाराकडे जाणार आहोत. त्या आधारेच संतोष दानवे हे पुन्हा निवडून येणार आहेत, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री खा. रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. तसेच कोणत्याही पदाधिकारी, नेत्याला धाक दाखवून भाजपात घेतले नसल्याचेही ते म्हणाले.भाजपाचे उमेदवार आ. संतोष दानवे यांनी शुक्रवारी रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री खा. रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, निर्मला दानवे, रेणू दानवे, रमेश गव्हाड यांची उपस्थिती होती.दानवे म्हणाले, विरोधी पक्षाच्या उमेदवाराने बारा वर्ष सत्ताधारी आमदार असताना काय विकास केला व पुढे काय करणार आहे हे न सांगता केवळ वैयक्तिक टिका व आरोप करण्याचे काम केले आहे. आम्ही त्याकडे लक्ष देणार नाही.मात्र गेल्या पाच वर्षामध्ये जालना लोकसभा मतदार संघात विकासात्मक किती मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. या भागाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षात कोणी राहण्यास तयार नाही. तुम्हाला कार्यकर्ते संभाळता आले नाहीत, त्याचा आम्हाला कशासाठी दोष देता ? असा प्रश्न उपस्थित करीत तुम्ही सुध्दा भाजपामध्येच होता. मग तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये जाण्यासाठी कोणी धाक दाखविला होता हे सांगा ? असा सवालही दानवे यांनी विरोधकांसमोर उपस्थित केला. यावेळी लोकजागरचे अध्यक्ष केशव जंजाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन समर्थकांसह भाजपात प्रवेश केला.यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनीही आ. संतोष दानवे यांनी केलेल्या कामांचे कौतुक करीत त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे, भास्कर दानवे, राजेंद्र देशमुख, विलास अडगावकर, कौतीक जगताप, आशा पांडे, विजयसिंह परिहार, ब्रम्हानंद चव्हाण, रमेश गव्हाड, केशव जंजाळ, सिध्दार्थ मुळे, नवनाथ दौड, मनिष श्रीवास्त्व, साहेबराव कानडजे, ओमप्रकाश चितळकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.दानवे : विरोधकांकडे बोलण्यासाठी काही नाहीआमदार म्हणून निवडून आल्यापासून आजवर आपण केंद्र, राज्य शासनाच्या माध्यमातून एक ना अनेक विकास कामे केली आहेत. केवळ सभागृहे बांधून विकास होत नाही. शेतकऱ्यांची उन्नती होण्यासाठी जलसंधारणाची कामे आवश्यक आहेत. त्यादृष्टीने केळना, जुई, धामणा, गिरजा, जिवरेखा, रायघोळ, या नद्यांवर सिमेंट बंधारे, कोल्हापुरी बंधारे बांधून सिंचन क्षमता वाढविली. या पाच धरणाची कामे केली. शिवाय ३३ केव्हीचे १० स्टेशन, रोहीत्र व मागेल त्याला शेततळे या योजनेतून राज्यात सर्वाधिक शेततळे या भागात देण्यात आल्याचे सांगत केलेल्या विकास कामांचा उहापोह केला.

टॅग्स :JalanaजालनाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Raosaheb Danweरावसाहेब दानवेArjun Khotkarअर्जुन खोतकरSantosh Danweyसंतोष दानवे