शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

संकटसमयी एकाकी सोडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:42 IST

शेतक-यांनो धीर सोडू नका, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केले. जाफ्राबाद तालुक्यातील सातेफळ परिसराचा बुधवारी गारपीटग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर ते शेतक-यांशी संवाद साधत होते.

टेंभुर्णी: अचानक उदभवलेल्या या नैसर्गिक संकट समयी गारपीट ग्रस्ताना एकाकी सोडणार नाही. शासन खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहे. शेतक-यांनो धीर सोडू नका, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केले. जाफ्राबाद तालुक्यातील सातेफळ परिसराचा बुधवारी गारपीटग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर ते शेतक-यांशी संवाद साधत होते.यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे, उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी, तहसीलदार जे. डी. वळवी, गटविकास अधिकारी रमेश काळे, सभापती साहेबराव कानडजे, गोविंद पंडित, विजय परिहार, संतोष लोखंडे उपस्थित होते.प्रथम निवडुंगा येथील गारपिटीने मयत झालेले वृद्ध आसाराम जगताप यांच्या घरी भेट देऊन खा. दानवे यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी शासनातर्फे चार लाख तर भाजपा प्रदेश महाराष्ट्र तर्फे एक लाख अशी एकूण पाच लाखांची आर्थिक मदत खा. दानवे यांच्या हस्ते मृताच्या पत्नीला देण्यात आली. या भेटीत दानवे यांनी सातेफळ, निवडुंगा, पोखरी या भागातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतक-यांना त्वरित शासन स्तरावरून आर्थिक सहाय्य देण्याचे आश्वासन दिले.