शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

‘युती’चे वर्चस्व की आघाडी देणार धक्का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 23:48 IST

जालना जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदार संघ आहेत. पैकी गेल्या निवडणुकीत तीन मतदार संघावर शिवसेना-भाजपचे वर्चस्व राहिले आहे

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदार संघ आहेत. पैकी गेल्या निवडणुकीत तीन मतदार संघावर शिवसेना-भाजपचे वर्चस्व राहिले आहे. गेल्या निवडणुकीत ऐनवेळी युती तुटल्याने भाजपा- शिवसेना युतीच्या उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली होती. यंदा वंचित आघाडी जिल्ह्यात कुठली जादू चालविते ? यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप-सेना युतीचे भवितव्य ठरणार आहे.जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात सत्ताधारी आणि विरोधकांनी गेल्या सहा महिन्यांपासून निवडणुकीची मोर्चेबांधणी केली आहे. त्यात युतीकडे सत्ता असल्याने त्यांच्याकडे केलेली विकास कामे सांगण्यासाठीचे अनेक मुद्दे आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच वंचित आघाडी सत्ताधाऱ्यांना कसे आणि कोणत्या मुद्द्यावर जेरीस आणणार, हे पाहणे लक्षणीय ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये ज्या काही नागरी समस्या आहेत त्या थोड्याबहुत प्रमाणात सुटल्या आहेत. परंतु वाढती लोकसंख्या आणि मिळणारा निधी यांचे समिकरण जुळविताना प्रशासनाच्या नाकी नऊ येत आहेत. लोकप्रतिनिधी घोषणा करून मोकळे होतात. परंतु नंतर केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करताना यंत्रणेची परीक्षा असते. गेल्या काही वर्षांमध्ये जालना जिल्ह्याला हजारो कोटी रूपयांचा विकास निधी मिळाला आहे. परंतु, या निधीतून सुरू असलेल्या कामांच्या दर्जाकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले जात नसल्याचे वास्तव आहे.जिल्ह्याच्या राजकारणात आजघडीला शिवसेना-भाजप युतीची चलती आहे. या युतीच्या घौडदौडीला लगाम घालण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुठला दारूगोळा वापरतात याकडेही मतदारांचे लक्ष लागून राहिल. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रशासनही कामाला लागले असून, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची तातडीची बैठक शनिवारी दुपारी बोलावून सूचना दिल्या आहेत. निवडणुका जाहीर होण्याची औपचारिकता आता पूर्ण झाली आहे.पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणालापरतूर मतदार संघातून भाजपच्या तिकिटावर दुस-यांदा निवडून आलेल्या बबनराव लोणीकर यांना दुसºया मंत्रीमंडळ विस्तारात थेट कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागली. जालना जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही त्यांच्याकडे चालून आले. स्वच्छता आणि पाणीपुरवठा खाते त्यांच्याकडे असल्याने त्यांच्याकडून राज्यासह जिल्ह्याला मोठ्या अपेक्षा होत्या. स्वच्छता अभियान, गावोगाव शौचालयांची उभारणी, वॉटर ग्रीड प्रकल्प यासह अन्य योजना त्यांनी घोषित करून काही योजना अंमलातही आणल्या. जिल्ह्यातील विकासाबाबतही ते अनुकूल असले तरी आता त्यांची परीक्षा आहे. परतूर मतदार संघातून त्यांचे परंपरागत प्रतीस्पर्धी सुरेशकुमार जेथलिया यांनाच उमेदवारी मिळेल, यात शंका नाही. परंतु, सध्या तरी नाव जाहीर नाही.अर्जुन खोतकर, कैलास गोरंट्याल यांचीही कसोटीशिवसेनेचे नेते तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची या निवडणुकीत पुन्हा एकदा कसोटी लागणार आहे. मंत्रीपदाच्या काळात केलेली कामे ही त्यांची जमेची बाजू आहे. यंदा देखील त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी माजी आमदार कैलास गोरंट्याल या दोघांमध्ये थेट लढत होणार आहे. त्यामुळे जालन्याच्या लढतीकडे जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागून आहे. कृषी प्रदर्शन, कुस्ती स्पर्धा, भीम महोत्सव आदींच्या माध्यमातून खोतकरांनी मोर्चेबांधणी केली आहे. तर गोरंट्याल यांच्या ताब्यात जालना पालिकेची सत्ता आहे. त्यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल या नगराध्यक्षा आहेत.नशिबी अन कमनशिबीजालना विधानसभा मतदार संघात गेल्या निवडणुकीत अत्यंत चुरशीची लढत झाली. मतमोजणीच्या वेळी कधी पारडे हे अर्जुन खोतकरांकडे तर कधी कैलास गोरंट्याल यांच्याकडे झुकत होते. शेवटी २९६ मतांनी अर्जुन खोतकर हे विजयी झाल्याने त्यांना विजयाचा गुलाल उधळण्याची संधी मिळाली.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण