शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

गहू आडवा; टरबूज फुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:19 IST

तालुक्यातील काही गावच्या शिवारात गारपिटीने शेत पिकांचे मोठे नुकसान झाले असून, काढणीस आलेली पिके हातची गेली आहेत. सोमवारी थेट शेतात जाऊन महसूलच्या पथकाने पंचनामे सुरु केले आहेत.

शेषराव वायाळ/ परतूर : तालुक्यातील काही गावच्या शिवारात गारपिटीने शेत पिकांचे मोठे नुकसान झाले असून, काढणीस आलेली पिके हातची गेली आहेत. सोमवारी थेट शेतात जाऊन महसूलच्या पथकाने पंचनामे सुरु केले आहेत.तालुक्यात रविवारी दिवसभरात काही गावांत मोठी गारपिट झाली. ही गारपीट अचानक झल्याने शेतकरी गोंधळून गेले. माव, पाटोदा, काºहाळा, लिंगसा, वाहेगाव श्रीष्टी, हनवडी, गणेशपूर, सालगाव, मापेगाव, उस्मानपूर, टाकळी रंगोपंत, तोरणा आदी गावात गारपिटीने शेतक-यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. माव शिवारातील टरबुजाचे नुकसान होऊन, गहू, ज्वारी पूर्ण आडवे झाले. इतर गावांतही केळी, मोसंबी, गहु, हरभरा, ज्वारी, आंबा, द्राक्ष आदी पिकांसह फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.अगोदरच यावर्षी शेतकºयांच्या कोणत्याच शेती मालाला भाव नाही. कर्जाच्या खाईत सापडलेला शेतकरी आता सुलतानी संकटाबरोबरच आस्मानी संकटाचाही बळी ठरला आहे. शासनाने आता तात्काळ आर्थिक मदत देवून शेतक-यांना उभे राहण्यासाठी आधार द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत...............पंचनामे सुरूपरतूर तालुक्यात झालेल्या गारपिटीने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाच्या पथकाने पंचनामे सुरू केले आहेत. या पथकात तहसीलदार डी. डी. फुफाटे, कृषी अधिकारी आनंद कांबळे यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांचा समावेश आहे............आकडेवारी नंतर कळेल -फुपाटेयासंदर्भात तहसीलदार डी. डी. फुफाटे म्हणाले की, आम्ही तातडीने पंचनामे सुरू केले आहेत. शेतक-यांचे नुकसान बरेच झाले आहे. या पंचनाम्यातून नुकसानीचा आकडा बाहेर येईल. नुकसानग्रस्त शेतक-यांतून कोणी वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे, असेही तहसीलदार फुपाटे यांनी सांगितले.............