शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

गहू आडवा; टरबूज फुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:19 IST

तालुक्यातील काही गावच्या शिवारात गारपिटीने शेत पिकांचे मोठे नुकसान झाले असून, काढणीस आलेली पिके हातची गेली आहेत. सोमवारी थेट शेतात जाऊन महसूलच्या पथकाने पंचनामे सुरु केले आहेत.

शेषराव वायाळ/ परतूर : तालुक्यातील काही गावच्या शिवारात गारपिटीने शेत पिकांचे मोठे नुकसान झाले असून, काढणीस आलेली पिके हातची गेली आहेत. सोमवारी थेट शेतात जाऊन महसूलच्या पथकाने पंचनामे सुरु केले आहेत.तालुक्यात रविवारी दिवसभरात काही गावांत मोठी गारपिट झाली. ही गारपीट अचानक झल्याने शेतकरी गोंधळून गेले. माव, पाटोदा, काºहाळा, लिंगसा, वाहेगाव श्रीष्टी, हनवडी, गणेशपूर, सालगाव, मापेगाव, उस्मानपूर, टाकळी रंगोपंत, तोरणा आदी गावात गारपिटीने शेतक-यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. माव शिवारातील टरबुजाचे नुकसान होऊन, गहू, ज्वारी पूर्ण आडवे झाले. इतर गावांतही केळी, मोसंबी, गहु, हरभरा, ज्वारी, आंबा, द्राक्ष आदी पिकांसह फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.अगोदरच यावर्षी शेतकºयांच्या कोणत्याच शेती मालाला भाव नाही. कर्जाच्या खाईत सापडलेला शेतकरी आता सुलतानी संकटाबरोबरच आस्मानी संकटाचाही बळी ठरला आहे. शासनाने आता तात्काळ आर्थिक मदत देवून शेतक-यांना उभे राहण्यासाठी आधार द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत...............पंचनामे सुरूपरतूर तालुक्यात झालेल्या गारपिटीने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाच्या पथकाने पंचनामे सुरू केले आहेत. या पथकात तहसीलदार डी. डी. फुफाटे, कृषी अधिकारी आनंद कांबळे यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांचा समावेश आहे............आकडेवारी नंतर कळेल -फुपाटेयासंदर्भात तहसीलदार डी. डी. फुफाटे म्हणाले की, आम्ही तातडीने पंचनामे सुरू केले आहेत. शेतक-यांचे नुकसान बरेच झाले आहे. या पंचनाम्यातून नुकसानीचा आकडा बाहेर येईल. नुकसानग्रस्त शेतक-यांतून कोणी वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे, असेही तहसीलदार फुपाटे यांनी सांगितले.............