शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
4
सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
6
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
7
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
8
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
9
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
10
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
11
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
12
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
14
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
15
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
16
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
17
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
18
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
19
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
20
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?

पोलिसांनी तातडीने तक्रार न घेतल्यास कारवाई करू - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:32 IST

जालना : मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरी झाल्याच्या तक्रारी पोलीस कर्मचारी लवकर घेत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दुचाकीच ...

जालना : मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरी झाल्याच्या तक्रारी पोलीस कर्मचारी लवकर घेत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दुचाकीच नाही तर इतर कोणतीही तक्रार लवकर न घेतल्यास संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी दिली. ते सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

जालना शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकीसह इतर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच पोलीस दुचाकी चोरीच्या तक्रार घेण्यास उशीर करतात. त्यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागतो. याबाबत पोलीस अधीक्षकांकडे ही तक्रारी देखील झाल्या आहेत. याबाबत सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक विनायक देशमुख म्हणाले की, दुचाकीची तक्रार न घेतल्याच्या काही तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. त्यावर लवकरच निर्णय घेऊ. जे पोलीस अधिकारी व कर्मचारी दुचाकीसह इतर तक्रारी लवकर घेणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही एटीएम चोरट्यांच्या मागावर असून, त्यांना लवकरच जेरबंद करू. सध्या जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे जमाव बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. जमाव बंदी आदेशाचे उल्लघंन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, पो.नि. सुभाष भुजंग यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.