शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

जालना जिल्ह्यात ६३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 01:15 IST

६३५ टँकर जिल्ह्यात सध्या सुरू आहेत. २०१२ नंतर पहिल्यांदाच जिल्ह्याला भयावह दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा दुष्काळात होरपळत आहे. ५२३ गावे आणि ११९ वाड्यात पिण्याचे पाणी शिल्लक नाही. टँकरविना पिण्याच्या पाण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. ११ लाख नागरिकांना पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागत आहे. ६३५ टँकर जिल्ह्यात सध्या सुरू आहेत. २०१२ नंतर पहिल्यांदाच जिल्ह्याला भयावह दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.गती वर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात शासनाने दुष्काळ सदृश परिस्थितीही घोषित केली. अपुऱ्या पावसामुळे यावर्षी पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस टँकरच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यातील जालना, भोकरदन, जाफराबाद आणि अंबड तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरू आहेत. जायकवाडी धरण मृतसाठ्यात आहे, तर मध्यम प्रकल्पांत पाणी शिल्लक राहिले नाही. बंधारे, नदीपात्र कोरडे पडल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.जिल्ह्यातील १४ हजाराहुन अधिक जनावरे चारा छावण्यांमध्ये आहेत. जालना तालुक्यात १०२, बदनापूर तालुक्यात ८०, भोकरदनमध्ये ११६, जाफराबाद ७४, परतूरमध्ये २६, मंठा ५८, अबंड १०२, घनसावंगी तालुक्यात ७७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील ६९३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. २२१ विहिरी टँकर व्यतिरिक्त आहेत. टँकरसाठी ४७२ विहिरींचे अधिग्रहण शासनाने केले आहे. जालना तालुक्यातील १ लाख ८१ हजार ५५६ नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. बदनापूर तालुक्यातील दीड लाख, भोकरदन दोन लाख, जाफराबाद १ लाख, परतूर ५२ हजार, मंठा ८३ हजार, अंबड दीड लाख, घनसावंगी तालुक्यातील दीड लाख नागरिकांना पिण्याचे पाणी टँकरने द्यावे लागत आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकdroughtदुष्काळGovernmentसरकार