शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

जालना जिल्ह्यात ६३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 01:15 IST

६३५ टँकर जिल्ह्यात सध्या सुरू आहेत. २०१२ नंतर पहिल्यांदाच जिल्ह्याला भयावह दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा दुष्काळात होरपळत आहे. ५२३ गावे आणि ११९ वाड्यात पिण्याचे पाणी शिल्लक नाही. टँकरविना पिण्याच्या पाण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. ११ लाख नागरिकांना पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागत आहे. ६३५ टँकर जिल्ह्यात सध्या सुरू आहेत. २०१२ नंतर पहिल्यांदाच जिल्ह्याला भयावह दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.गती वर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात शासनाने दुष्काळ सदृश परिस्थितीही घोषित केली. अपुऱ्या पावसामुळे यावर्षी पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस टँकरच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यातील जालना, भोकरदन, जाफराबाद आणि अंबड तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरू आहेत. जायकवाडी धरण मृतसाठ्यात आहे, तर मध्यम प्रकल्पांत पाणी शिल्लक राहिले नाही. बंधारे, नदीपात्र कोरडे पडल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.जिल्ह्यातील १४ हजाराहुन अधिक जनावरे चारा छावण्यांमध्ये आहेत. जालना तालुक्यात १०२, बदनापूर तालुक्यात ८०, भोकरदनमध्ये ११६, जाफराबाद ७४, परतूरमध्ये २६, मंठा ५८, अबंड १०२, घनसावंगी तालुक्यात ७७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील ६९३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. २२१ विहिरी टँकर व्यतिरिक्त आहेत. टँकरसाठी ४७२ विहिरींचे अधिग्रहण शासनाने केले आहे. जालना तालुक्यातील १ लाख ८१ हजार ५५६ नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. बदनापूर तालुक्यातील दीड लाख, भोकरदन दोन लाख, जाफराबाद १ लाख, परतूर ५२ हजार, मंठा ८३ हजार, अंबड दीड लाख, घनसावंगी तालुक्यातील दीड लाख नागरिकांना पिण्याचे पाणी टँकरने द्यावे लागत आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकdroughtदुष्काळGovernmentसरकार