शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

जालना जिल्ह्यात ६३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 01:15 IST

६३५ टँकर जिल्ह्यात सध्या सुरू आहेत. २०१२ नंतर पहिल्यांदाच जिल्ह्याला भयावह दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा दुष्काळात होरपळत आहे. ५२३ गावे आणि ११९ वाड्यात पिण्याचे पाणी शिल्लक नाही. टँकरविना पिण्याच्या पाण्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. ११ लाख नागरिकांना पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागत आहे. ६३५ टँकर जिल्ह्यात सध्या सुरू आहेत. २०१२ नंतर पहिल्यांदाच जिल्ह्याला भयावह दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.गती वर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात शासनाने दुष्काळ सदृश परिस्थितीही घोषित केली. अपुऱ्या पावसामुळे यावर्षी पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस टँकरच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यातील जालना, भोकरदन, जाफराबाद आणि अंबड तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरू आहेत. जायकवाडी धरण मृतसाठ्यात आहे, तर मध्यम प्रकल्पांत पाणी शिल्लक राहिले नाही. बंधारे, नदीपात्र कोरडे पडल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.जिल्ह्यातील १४ हजाराहुन अधिक जनावरे चारा छावण्यांमध्ये आहेत. जालना तालुक्यात १०२, बदनापूर तालुक्यात ८०, भोकरदनमध्ये ११६, जाफराबाद ७४, परतूरमध्ये २६, मंठा ५८, अबंड १०२, घनसावंगी तालुक्यात ७७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील ६९३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. २२१ विहिरी टँकर व्यतिरिक्त आहेत. टँकरसाठी ४७२ विहिरींचे अधिग्रहण शासनाने केले आहे. जालना तालुक्यातील १ लाख ८१ हजार ५५६ नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. बदनापूर तालुक्यातील दीड लाख, भोकरदन दोन लाख, जाफराबाद १ लाख, परतूर ५२ हजार, मंठा ८३ हजार, अंबड दीड लाख, घनसावंगी तालुक्यातील दीड लाख नागरिकांना पिण्याचे पाणी टँकरने द्यावे लागत आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकdroughtदुष्काळGovernmentसरकार