शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

जामखेड गावामध्ये पाण्याची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:35 IST

जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड गावातील वॉर्ड क्रमांक एक, दोन, पाच व सहामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. ...

जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड गावातील वॉर्ड क्रमांक एक, दोन, पाच व सहामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीने उभ्या केलेल्या जलकुंभाची क्षमता गरजेपेक्षा कमी आहे. परिणामी या भागात पाणी टंचाई सतत निर्माण होत असून, नवीन जलकुंभ उभा करण्याची गरज आहे.

ग्रामपंचायतीने विजेचा प्रश्न पाहता चौदाव्या वित्त आयोगातून पाणीपुरवठा करणाऱ्या तीन विहिरीवर तब्बल २४ लक्ष रूपये खर्च करून सौर ऊर्जा पंप बसविले आहेत. परंतु, इतका खर्च करूनही गावातील नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. गावामधील ज्या वार्डामध्ये सार्वजनिक पाईपलाईन नव्हती तेथे पाणी पोहचावे म्हणून कार्यालयाने पुन्हा चौदा वित्तच्या माध्यमातून दहा लक्ष खर्च करून अंतर्गत पाईपलाईन केली. ही कामे करूनही पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे सौर ऊर्जा पंप बसवून सहा महिनेच झाले. परंतु, सदरील पंपाद्वारे अजूनही विहिरीतील पाणी जलकुंभामध्ये पडले नाही. परिणामी गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देऊन पाणी प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे.

कोट

पाणी पुरवठ्याबाबत मासिक बैठकीत सौर ऊर्जा पंपाबाबत सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्यांशी चर्चा केली. परंतु, उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आहेत. झालेली कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. ग्रामपंचायतीने पाणी प्रश्न तातडीने सोडवावा.

सौमित्रा नारायण म्हस्के

ग्रामपंचायत सदस्य, जामखेड

गावातील वार्ड क्रमांक एक, दोन, पाच व सहा मधील नागरिकांना गत वीस दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. निर्माण झालेल्या पाणी प्रश्नामुळे ग्रामपंचायतीने केलेला लाखो रूपयांचा खर्च करून उपयोग काय ? असा प्रश्न आहे. या कामाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी.

नवनाथ मुळे

ग्रामपंचायत सदस्य, जामखेड

जलकुंभाचा आराखडा पाठविला

गावाची लोकसंख्या पाहता साडेसहा लक्ष साठवण क्षमता असलेल्या जलकुंभाची गरज आहे. परंतु सध्या अडीच लक्ष क्षमता असलेला जलकुंभ आहे. नवीन जलकुंभासाठी वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीचे प्रयत्न सुरू आहेत.

के. के. कल्याणकर

ग्रामविकास अधिकारी, जामखेड