शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

निम्न दुधनाच्या डाव्या, उजव्या कालव्याला सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:20 IST

परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या- उजव्या कालव्यातून मंगळवारी पाणी सोडण्यात आले आहे. फोटो क्रमांक - १२ जेएनपीएच ०१ ...

परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या- उजव्या कालव्यातून मंगळवारी पाणी सोडण्यात आले आहे.

फोटो क्रमांक - १२ जेएनपीएच ०१

शेतकरी समाधानी; रबीच्या पिकांना होणार फायदा

परतूर (जि. जालना): तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याला मंगळवारी दुपारी पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा रबी पिकांना फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.

यंदा जूनच्या सुरुवातीपासून जोरदार पाऊस झाला. सततच्या पावसाने नदी-नाले तुडुंब वाहिले. पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असले तरी तालुक्यातील सर्वांत मोठा असलेला यंदा निम्न दुधना प्रकल्प १०० टक्के भरला. आता सध्या धरणात ९० टक्के जिवंत पाणीसाठा आहे.

यंदा मुबलक पाणीसाठ्यामुळे शेतकऱ्यांनी रबीच्या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. गहू, हरभरा व ऊस ही पिके जोमात आली आहेत. सध्या पिकांना पाण्याची गरज आहे. त्यामुळे निम्न दुधनाच्या डाव्या व उजव्या कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन पाटबंधारे विभागाने मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास दोन्ही कालव्यांना पाणी सोडले आहेत. डाव्या कालव्यातून १०० क्युसेक तर उजव्या कालव्यातून ७५ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. निम्न दुधना प्रकल्पात सध्या २४२.२०० दलघमी म्हणजेच ९३.४२ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. धरणात एवढा मोठा पाणीसाठा असल्याने सिंचनासह पाण्याचा प्रश्नही मिटला आहे.

बॅक वॉटरमध्ये घट

परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून मंगळवारी पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे बॅक वॉटरमध्येही मोठी घट होत आहे. बॅक वॉटरवर अनेक गावांचे पाणी पुरवठा व सिंचन क्षेत्र अवलंबून आहे. यामुळे येथील ग्रामस्थांसह शेतकरी चिंतेत आहे.