शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

वरूड ग्रामस्थांची भरपावसाळ्यात पाण्यासाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:34 IST

पाच हजार लोकसंख्येच्या वरूड (बु.) गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी दानापूर येथील जुई प्रकल्पात विहीर खोदण्यात आली आहे. गत पंधरा वर्षापासून ...

पाच हजार लोकसंख्येच्या वरूड (बु.) गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी दानापूर येथील जुई प्रकल्पात विहीर खोदण्यात आली आहे. गत पंधरा वर्षापासून या विहिरीतून सार्वजनिक नळाला पाणीपुरवठा केला जातो. परंतु, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे प्रत्येक वर्षी उन्हाळ्याच्या शेवटी, भरपावसाळ्यात गावातील महिला, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अनेकांना आडातील पाणी जीव धोक्यात घालून शेंदावे लागते. अशीच परिस्थिती मागील पंधरा दिवसांपासून गावात निर्माण झाली आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत सध्या मुबलक प्रमाणात पाणी आहे. धरणातील विहिरीवरून गावातील सार्वजनिक आडात पाणी सोडण्यात येते. परंतु, हे पाणी नळाला सोडले जात नाही. सार्वजनिक नळाला पाणी येत नसल्याने ग्रामस्थांना हातातील कामे सोडून पाण्यासाठी हांडे व बादल्या घेऊन आडावर पाणी शेंदण्यासाठी जावे लागत आहे. त्यामुळे आडावर एकाच वेळी पाणी भरण्यासाठी गर्दी होत आहे. एखाद्याचा तोल जाऊन किंवा धक्का जाऊन कोणी विहिरीत पडले, तर दुर्दैवी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने सार्वजनिक नळांना सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी हाेत आहे.

कोट

पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी ग्रामपंचायतीकडून नळजोडणी घेतली आहे. परंतु, नळाला पाणी येत नसल्याने जीव धोक्यात घालून आडातून पाणी शेंदून आणावे लागत आहे. आडावर गर्दी होत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देऊन नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा करावा.

प्रकाश धनराज, ग्रामस्थ

कोट

नळाला तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठा होत नसेल, या प्रकाराची चौकशी केली जाईल. बंद असलेला पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रयत्न केले जातील.

एस.टी. शिंदे, ग्रामसेवक वरुड (बु.)

फोटो