शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

वरूड ग्रामस्थांची भरपावसाळ्यात पाण्यासाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:34 IST

पाच हजार लोकसंख्येच्या वरूड (बु.) गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी दानापूर येथील जुई प्रकल्पात विहीर खोदण्यात आली आहे. गत पंधरा वर्षापासून ...

पाच हजार लोकसंख्येच्या वरूड (बु.) गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी दानापूर येथील जुई प्रकल्पात विहीर खोदण्यात आली आहे. गत पंधरा वर्षापासून या विहिरीतून सार्वजनिक नळाला पाणीपुरवठा केला जातो. परंतु, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे प्रत्येक वर्षी उन्हाळ्याच्या शेवटी, भरपावसाळ्यात गावातील महिला, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अनेकांना आडातील पाणी जीव धोक्यात घालून शेंदावे लागते. अशीच परिस्थिती मागील पंधरा दिवसांपासून गावात निर्माण झाली आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत सध्या मुबलक प्रमाणात पाणी आहे. धरणातील विहिरीवरून गावातील सार्वजनिक आडात पाणी सोडण्यात येते. परंतु, हे पाणी नळाला सोडले जात नाही. सार्वजनिक नळाला पाणी येत नसल्याने ग्रामस्थांना हातातील कामे सोडून पाण्यासाठी हांडे व बादल्या घेऊन आडावर पाणी शेंदण्यासाठी जावे लागत आहे. त्यामुळे आडावर एकाच वेळी पाणी भरण्यासाठी गर्दी होत आहे. एखाद्याचा तोल जाऊन किंवा धक्का जाऊन कोणी विहिरीत पडले, तर दुर्दैवी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने सार्वजनिक नळांना सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी हाेत आहे.

कोट

पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी ग्रामपंचायतीकडून नळजोडणी घेतली आहे. परंतु, नळाला पाणी येत नसल्याने जीव धोक्यात घालून आडातून पाणी शेंदून आणावे लागत आहे. आडावर गर्दी होत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देऊन नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा करावा.

प्रकाश धनराज, ग्रामस्थ

कोट

नळाला तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठा होत नसेल, या प्रकाराची चौकशी केली जाईल. बंद असलेला पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रयत्न केले जातील.

एस.टी. शिंदे, ग्रामसेवक वरुड (बु.)

फोटो