शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

३५ हजार कुटुंबांना शौचालयाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:13 IST

बेसलाईन मधून सुटलेल्या ३५ हजार कुटुंबियांकडे अद्यापही शौचालय नसल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन कडून जिल्ह्यात शौचालय उभारण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा पाणंदमुक्त झाल्याचा प्रशासनाकडून डांगोरा पिटला जात आहे, असे असताना बेसलाईन मधून सुटलेल्या ३५ हजार कुटुंबियांकडे अद्यापही शौचालय नसल्याचे समोर आले आहे.मागील काही वर्षापासून जिल्हा पाणंदमुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यामातून प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्हाभरातील सुमारे २ लाख ६२ हजार ५४७ कुटुंबांकडे शौचालय आहे. बेसलाईन सर्व्हेनंतर तब्बल १ लाख ७४ हजार ८१५ कुटुंबांनी शौचालयाचे काम पूर्ण केले आहे. परंतु, पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्या ३७ हजार ३३७ कुटुंबांना यावर्षी ३१ मार्च अखेरपर्यंत शौचालय देण्याचे उद्दिष्टे स्वच्छ भारत मिशन विभागाला होते. परंतु, आतापर्यंत केवळ २ हजार २२९ शौचालयाची कामे पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे ३५ हजार १०८ कुटुंब अद्यापही शौचालयाच्या प्रतीक्षेत आहेत. स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कुटुंबनिहाय शौचालयाचा बेसलाईन सर्व्हे करण्यात आला होता. त्यानुसार सुमारे १ लाख ७४ हजार ८१५ कुटुंबाकडे शौचालय नसल्याचे समोर आले होते. हेच उद्दिष्ट डोळ््यासमोर ठेवून स्वच्छ भारत मिशन काम सुरु केले. मात्र सुरुवातीच्या काही दिवस या कामाला मरगळ आली होती. परंतु, लाभार्थ्यांची निवड होऊनही अनेकांना वेळेवर अनुदान आदी अडचणीमुळे अनेकांना शौचालयापासून वंचित राहावे लागले. अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी गावोगावी जाऊन जनजागृती करुन शौचालय बांधकामासाठी ग्रामस्थांना प्रवृत्त करीत असत. एवढे करुनही ग्रामस्थांनी शौचालय बांधकामाकडे दुर्लक्ष केले. त्यांच्याविरुध्द गुडमॉर्निग पथकाच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. त्यामुळे शौचालयाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. बेसलाईन सर्व्हेनुसार शौचालय नसणाऱ्या १ लाख ७४ हजार ८१५ कुटुंबांनी शौचालयाचे काम पूर्ण केले आहे. परंतु, पायाभूत सर्वेक्षणातूनही जिल्ह्यातील ३७ हजार ३७७ कुटुंबे सुटली होती. सर्वेक्षणातून सुटलेल्या कुटुंबांना याचा लाभ देण्याचे उद्दिष्ट केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत मिशन विभागाला देण्यात आले होते. यासाठी ३१ मार्चची मुदत देण्यात आली आहे.बेसलाईन सर्व्हेनुसार उभारली शौचालयेस्वच्छ भारत मिशनच्या माध्यामातून करण्यात आलेल्या बेसलाईन सर्व्हेनुसार स्वच्छतागृहांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. २०१४ पासून जिल्हा परिषदेच्यावतीने अंबड तालुक्यातील २६५०६, भोकरदन ३०७०२, घनसावंगी २९२२०, बदनापूर १३५५९, परतूर १५८५४, जालना २६८२९, मंठा १७५३७, जाफराबाद तालुक्यात १४६०८ शौचालये बांधण्यात आली आहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाJalna z pजालना जिल्हा परिषद