शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

३५ हजार कुटुंबांना शौचालयाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:13 IST

बेसलाईन मधून सुटलेल्या ३५ हजार कुटुंबियांकडे अद्यापही शौचालय नसल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन कडून जिल्ह्यात शौचालय उभारण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा पाणंदमुक्त झाल्याचा प्रशासनाकडून डांगोरा पिटला जात आहे, असे असताना बेसलाईन मधून सुटलेल्या ३५ हजार कुटुंबियांकडे अद्यापही शौचालय नसल्याचे समोर आले आहे.मागील काही वर्षापासून जिल्हा पाणंदमुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यामातून प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्हाभरातील सुमारे २ लाख ६२ हजार ५४७ कुटुंबांकडे शौचालय आहे. बेसलाईन सर्व्हेनंतर तब्बल १ लाख ७४ हजार ८१५ कुटुंबांनी शौचालयाचे काम पूर्ण केले आहे. परंतु, पायाभूत सर्वेक्षणातून सुटलेल्या ३७ हजार ३३७ कुटुंबांना यावर्षी ३१ मार्च अखेरपर्यंत शौचालय देण्याचे उद्दिष्टे स्वच्छ भारत मिशन विभागाला होते. परंतु, आतापर्यंत केवळ २ हजार २२९ शौचालयाची कामे पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे ३५ हजार १०८ कुटुंब अद्यापही शौचालयाच्या प्रतीक्षेत आहेत. स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कुटुंबनिहाय शौचालयाचा बेसलाईन सर्व्हे करण्यात आला होता. त्यानुसार सुमारे १ लाख ७४ हजार ८१५ कुटुंबाकडे शौचालय नसल्याचे समोर आले होते. हेच उद्दिष्ट डोळ््यासमोर ठेवून स्वच्छ भारत मिशन काम सुरु केले. मात्र सुरुवातीच्या काही दिवस या कामाला मरगळ आली होती. परंतु, लाभार्थ्यांची निवड होऊनही अनेकांना वेळेवर अनुदान आदी अडचणीमुळे अनेकांना शौचालयापासून वंचित राहावे लागले. अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी गावोगावी जाऊन जनजागृती करुन शौचालय बांधकामासाठी ग्रामस्थांना प्रवृत्त करीत असत. एवढे करुनही ग्रामस्थांनी शौचालय बांधकामाकडे दुर्लक्ष केले. त्यांच्याविरुध्द गुडमॉर्निग पथकाच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. त्यामुळे शौचालयाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. बेसलाईन सर्व्हेनुसार शौचालय नसणाऱ्या १ लाख ७४ हजार ८१५ कुटुंबांनी शौचालयाचे काम पूर्ण केले आहे. परंतु, पायाभूत सर्वेक्षणातूनही जिल्ह्यातील ३७ हजार ३७७ कुटुंबे सुटली होती. सर्वेक्षणातून सुटलेल्या कुटुंबांना याचा लाभ देण्याचे उद्दिष्ट केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत मिशन विभागाला देण्यात आले होते. यासाठी ३१ मार्चची मुदत देण्यात आली आहे.बेसलाईन सर्व्हेनुसार उभारली शौचालयेस्वच्छ भारत मिशनच्या माध्यामातून करण्यात आलेल्या बेसलाईन सर्व्हेनुसार स्वच्छतागृहांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. २०१४ पासून जिल्हा परिषदेच्यावतीने अंबड तालुक्यातील २६५०६, भोकरदन ३०७०२, घनसावंगी २९२२०, बदनापूर १३५५९, परतूर १५८५४, जालना २६८२९, मंठा १७५३७, जाफराबाद तालुक्यात १४६०८ शौचालये बांधण्यात आली आहेत.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाJalna z pजालना जिल्हा परिषद