शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

पावसात सुरू असलेले काम ग्रामस्थांनी रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:42 IST

भरपावसात सुरू असलेले किनगाव चौफुली ते नांदी रस्त्याचे काम रविवारी दुपारी नांदी ग्रामस्थांनी बंद पाडून आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : भरपावसात सुरू असलेले किनगाव चौफुली ते नांदी रस्त्याचे काम रविवारी दुपारी नांदी ग्रामस्थांनी बंद पाडून आंदोलन केले. या कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत अनेक तक्रारी यावेळी ग्रामस्थांनी केल्या.किनगाव चौफुली ते नांदी या ५ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी ग्रामस्थांनी बांधकाम विभागाकडे केल्या होत्या. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले.रविवारी या रस्त्याचे काम भरपावसात करण्यात येत होते. त्यामुळे रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले.यापूर्वीच रस्त्याच्या दर्जाबाबत उपस्थित केलेले प्रश्न आणि भरपावसात सुरू असलेले काम पाहता संतप्त ग्रामस्थांनी रविवारी दुपारी या रस्त्याचे काम थांबवून आंदोलन केले.नियमाचे पालन न करता काम सुरू असून, कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला. नांदी येथील साजीद पटेल, ताहेर पटेल, ज्ञानेश्वर डोंगरे, दीपक सावंत, सय्यद इस्माईल, प्रकाश सावंत, कैसर पटेल, इमरान सय्यद, दिलीप डोंगरे, अब्दुल्ला कुरेशी यांनी काम थांबवून मुकादमाला धारेवर धरले.विभागीय आयुक्तांकडे तक्रार करणारकिनगाव चौफुली ते नांदी रस्त्यासह इतर रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची केली जात आहेत. बांधकाम विभागाचे अधिकारी तक्रारी करूनही दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे आता विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे तक्रार केली जाणार असल्याचे नांदी येथील आंदोलकांनी सांगितले.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागagitationआंदोलनroad safetyरस्ते सुरक्षा