शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

प्रकल्प तुडूंब तरीही ग्रामस्थांना करावी लागतेय पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:56 IST

राजूर : भोकरदन तालुक्यातील चांधई एक्को व बाणेगाव मध्यम प्रकल्प तुडूंब भरलेले असतांना अपुरा वीजपुरवठा होत असल्याने राजूरसह पंधरा ...

राजूर : भोकरदन तालुक्यातील चांधई एक्को व बाणेगाव मध्यम प्रकल्प तुडूंब भरलेले असतांना अपुरा वीजपुरवठा होत असल्याने राजूरसह पंधरा गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी राजूर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक अभियंत्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

यावर्षी समाधानकारक पावसामुळे बाणेगाव व चांधई एक्को मध्यम प्रकल्प तुडूंब भरलेले आहेत. दोन्ही प्रकल्पातून राजूरसह चांधई एक्को, राजुरेश्वर मंदिर, चांधई टेपली, बाणेगाव, खामखेडा, चांधई ठोंबरी, जावळेवाडी, लोणगाव, चिंचोली निपाणी आदी पंधरा गावांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु, महावितरण कंपनीकडून एक दिवसाआड आठ तास वीजपुरवठा सुरू ठेवल्या जात असल्याने मुबलक पाणी मिळत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दोन्ही प्रकल्पापासून सदर गावे सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे आठ तासात होणारा पाणीपुरवठा कमी पडत आहे. मुबलक पाणी असतांनाही महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. येत्या सोमवारपासून राजुरेश्वर जन्मोत्सव सोहळा सुरू होणार असल्याने भाविकांच्या गर्दीत वाढ होणार आहे. त्यामुळे भाविकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याची शक्यता आहे.

बारा तास सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी

महावितरण कंपनीने चांधई ठोंबरी फिडरमधून दररोज किमान बारा तास सुरळीत वीजपुरवठा केल्यास पाणी समस्येची तीव्रता कमी होऊ शकते. त्यासाठी बारा तास सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर सरपंच भाऊसाहेब भुजंग, ग्रामविकास अधिकारी जगन खैरे, माजी सरपंच मुसा सौदागर, विनोद डवले, रामेश्वर सोनवणे, आप्पासाहेब पुंगळे, निवृत्ती पुंगळे, राहुल दरक, संतोष मगरे, शिवाजी जगताप, दादाराव मगरे, बबन मगरे, विष्णू राज्यकर, कृष्णा जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.