शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

देशसेवेला वाहिलेले गाव-अकोला देव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:39 IST

ग्रामीण भागातील अनेक गावांनी आपली एक वेगळी विशेषत: जपली आहे. टेंभुर्णीपासून अवघ्या ३ कि. मी. अंतरावर असणाऱ्या अकोला देव या गावाने मातृभूमीच्या रक्षणासाठी जवान देऊन आपली असीम राष्ट्रभक्ती जपली आहे

नसीम शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : ग्रामीण भागातील अनेक गावांनी आपली एक वेगळी विशेषत: जपली आहे. टेंभुर्णीपासून अवघ्या ३ कि. मी. अंतरावर असणाऱ्या अकोला देव या गावाने मातृभूमीच्या रक्षणासाठी जवान देऊन आपली असीम राष्ट्रभक्ती जपली आहे. परिसरात देशसेवेसाठी जवान देणारे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या या छोट्याशा गावाने आतापर्यंत ४० च्या वर जवान देशकार्यासाठी दिले आहे. एकीकडे संपूर्ण देशभर स्वातंत्र्य दिनाचा उत्साह सुरू असताना अकोलादेव या तीन ते चार हजार लोकसंख्येच्या गावाचे हे ओतपोत देशप्रेम नजरेआड करुन चालणार नाही. अकोलादेव हे गाव आज हजारो युवकांची सैन्य भरतीची प्रेरणा बनू पाहत आहे.येथील दशरथ जाधव हे गावातील पहिले सैनिक. ते १९६८ मध्ये सैन्यात भरती झाले. माजी सैनिक दशरथ जाधव यांची प्रेरणा घेऊन दरवर्षी एक - दोन युवक सैन्यात भरती होऊ लागले. आतापर्यंत जवळपास ६० जणांनी हा देशसेवेचा वसा स्वीकारला आहे. त्यापैकी आठ सैनिक निवृत्त होऊन गावाकडे परत आले आहे. गावातील सर्व माजी सैनिक हे नवयुवकांना सैनिकी जीवनातील अनुभव सांगून त्यांना सैनिकी नोकरीची प्रेरणा देत आहे.आतापर्यंत दशरथ सवडे, विष्णू सवडे, भास्कर सवडे, कौतिक सवडे, राजीव छडीदार, बद्री सवडे, डिगांबर सवडे हे देशसेवा बजावून सेवानिवृत्त झाले आहे. तर लक्ष्मण सवडे, अंकुश सवडे, विठ्ठल दरेकर, मोहन जाधव, संदीप सवडे, योगेश सवडे, भरत भारती, नारायण कदम, संतोष माळी, कृष्णा सवडे, विठ्ठल सवडे, मोहन सवडे, अमोल सवडे, स्वप्नील सवडे, दत्तात्रय सवडे, ईश्वर सवडे, नीलेश सवडे, राजेंद्र शेळके, सोमीनाथ आटपळे, नितेश सवडे आदी अनेक सेवा बजावत आहेत. स्वातंत्र्य दिन असो की प्रजासत्ताक दिन अकोलादेव या सैनिकी गावात आबालवृद्धांमध्ये राष्ट्रप्रेम उफाळत असते. देशासाठी वीर जवान देणारे हे छोटेसे गाव आज जाफराबाद तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जालना जिल्ह्यात ज्वलंत देशभक्तीचा एक स्त्रोत बनले आहे.पळसखेड्यातून देशसेवेसाठी १८ जवानजालना : भोकरदन तालुक्यातील पळसखेडा येथील १८ युवक हे भारतीय सैन्य दलात देशाच्या विविध भागांत सेवा बजावत आहेत. या गावाची लोकसंख्या ही केवळ ८८९ आहे. मात्र देशप्रेमाची आवड असलेले गावातील अनेक तरुण सैनभरतीची तयारी करतात.ग्रामस्थांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.गावात विविध सुविधांचा अभाव असताना गावकºयांचे देशप्रेम वाखाणण्याजोगे आहे. गावातील दोन तरुण सैन्यात होते. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आत्तापर्यत १८ सैनिक देशसेवा बजावत आहेत. यात पंडित खरात, विष्णू रगडे, लिंबाजी खरात, विजय खरात, सतीश खरात, किशोर खरात, योगेश खरात, मनोज खरात, रामेश्वर खरात, विनोद खरात, समाधान खरात, ईश्वर खरात, प्रल्हाद खरात, आजिनाथ खरात, प्रमोद खरात, सुनील खरात असे १८ जवान देशसेवेत आहे. यातील दोन जवान देशसेवा पूर्ण करुन सेवानिवृत्त झाले आहेत.यांचा आदर्श इतरांनी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागIndependence Dayस्वातंत्र्य दिवस