शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

देशसेवेला वाहिलेले गाव-अकोला देव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:39 IST

ग्रामीण भागातील अनेक गावांनी आपली एक वेगळी विशेषत: जपली आहे. टेंभुर्णीपासून अवघ्या ३ कि. मी. अंतरावर असणाऱ्या अकोला देव या गावाने मातृभूमीच्या रक्षणासाठी जवान देऊन आपली असीम राष्ट्रभक्ती जपली आहे

नसीम शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : ग्रामीण भागातील अनेक गावांनी आपली एक वेगळी विशेषत: जपली आहे. टेंभुर्णीपासून अवघ्या ३ कि. मी. अंतरावर असणाऱ्या अकोला देव या गावाने मातृभूमीच्या रक्षणासाठी जवान देऊन आपली असीम राष्ट्रभक्ती जपली आहे. परिसरात देशसेवेसाठी जवान देणारे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या या छोट्याशा गावाने आतापर्यंत ४० च्या वर जवान देशकार्यासाठी दिले आहे. एकीकडे संपूर्ण देशभर स्वातंत्र्य दिनाचा उत्साह सुरू असताना अकोलादेव या तीन ते चार हजार लोकसंख्येच्या गावाचे हे ओतपोत देशप्रेम नजरेआड करुन चालणार नाही. अकोलादेव हे गाव आज हजारो युवकांची सैन्य भरतीची प्रेरणा बनू पाहत आहे.येथील दशरथ जाधव हे गावातील पहिले सैनिक. ते १९६८ मध्ये सैन्यात भरती झाले. माजी सैनिक दशरथ जाधव यांची प्रेरणा घेऊन दरवर्षी एक - दोन युवक सैन्यात भरती होऊ लागले. आतापर्यंत जवळपास ६० जणांनी हा देशसेवेचा वसा स्वीकारला आहे. त्यापैकी आठ सैनिक निवृत्त होऊन गावाकडे परत आले आहे. गावातील सर्व माजी सैनिक हे नवयुवकांना सैनिकी जीवनातील अनुभव सांगून त्यांना सैनिकी नोकरीची प्रेरणा देत आहे.आतापर्यंत दशरथ सवडे, विष्णू सवडे, भास्कर सवडे, कौतिक सवडे, राजीव छडीदार, बद्री सवडे, डिगांबर सवडे हे देशसेवा बजावून सेवानिवृत्त झाले आहे. तर लक्ष्मण सवडे, अंकुश सवडे, विठ्ठल दरेकर, मोहन जाधव, संदीप सवडे, योगेश सवडे, भरत भारती, नारायण कदम, संतोष माळी, कृष्णा सवडे, विठ्ठल सवडे, मोहन सवडे, अमोल सवडे, स्वप्नील सवडे, दत्तात्रय सवडे, ईश्वर सवडे, नीलेश सवडे, राजेंद्र शेळके, सोमीनाथ आटपळे, नितेश सवडे आदी अनेक सेवा बजावत आहेत. स्वातंत्र्य दिन असो की प्रजासत्ताक दिन अकोलादेव या सैनिकी गावात आबालवृद्धांमध्ये राष्ट्रप्रेम उफाळत असते. देशासाठी वीर जवान देणारे हे छोटेसे गाव आज जाफराबाद तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जालना जिल्ह्यात ज्वलंत देशभक्तीचा एक स्त्रोत बनले आहे.पळसखेड्यातून देशसेवेसाठी १८ जवानजालना : भोकरदन तालुक्यातील पळसखेडा येथील १८ युवक हे भारतीय सैन्य दलात देशाच्या विविध भागांत सेवा बजावत आहेत. या गावाची लोकसंख्या ही केवळ ८८९ आहे. मात्र देशप्रेमाची आवड असलेले गावातील अनेक तरुण सैनभरतीची तयारी करतात.ग्रामस्थांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.गावात विविध सुविधांचा अभाव असताना गावकºयांचे देशप्रेम वाखाणण्याजोगे आहे. गावातील दोन तरुण सैन्यात होते. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आत्तापर्यत १८ सैनिक देशसेवा बजावत आहेत. यात पंडित खरात, विष्णू रगडे, लिंबाजी खरात, विजय खरात, सतीश खरात, किशोर खरात, योगेश खरात, मनोज खरात, रामेश्वर खरात, विनोद खरात, समाधान खरात, ईश्वर खरात, प्रल्हाद खरात, आजिनाथ खरात, प्रमोद खरात, सुनील खरात असे १८ जवान देशसेवेत आहे. यातील दोन जवान देशसेवा पूर्ण करुन सेवानिवृत्त झाले आहेत.यांचा आदर्श इतरांनी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागIndependence Dayस्वातंत्र्य दिवस