शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

देशसेवेला वाहिलेले गाव-अकोला देव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:39 IST

ग्रामीण भागातील अनेक गावांनी आपली एक वेगळी विशेषत: जपली आहे. टेंभुर्णीपासून अवघ्या ३ कि. मी. अंतरावर असणाऱ्या अकोला देव या गावाने मातृभूमीच्या रक्षणासाठी जवान देऊन आपली असीम राष्ट्रभक्ती जपली आहे

नसीम शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : ग्रामीण भागातील अनेक गावांनी आपली एक वेगळी विशेषत: जपली आहे. टेंभुर्णीपासून अवघ्या ३ कि. मी. अंतरावर असणाऱ्या अकोला देव या गावाने मातृभूमीच्या रक्षणासाठी जवान देऊन आपली असीम राष्ट्रभक्ती जपली आहे. परिसरात देशसेवेसाठी जवान देणारे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या या छोट्याशा गावाने आतापर्यंत ४० च्या वर जवान देशकार्यासाठी दिले आहे. एकीकडे संपूर्ण देशभर स्वातंत्र्य दिनाचा उत्साह सुरू असताना अकोलादेव या तीन ते चार हजार लोकसंख्येच्या गावाचे हे ओतपोत देशप्रेम नजरेआड करुन चालणार नाही. अकोलादेव हे गाव आज हजारो युवकांची सैन्य भरतीची प्रेरणा बनू पाहत आहे.येथील दशरथ जाधव हे गावातील पहिले सैनिक. ते १९६८ मध्ये सैन्यात भरती झाले. माजी सैनिक दशरथ जाधव यांची प्रेरणा घेऊन दरवर्षी एक - दोन युवक सैन्यात भरती होऊ लागले. आतापर्यंत जवळपास ६० जणांनी हा देशसेवेचा वसा स्वीकारला आहे. त्यापैकी आठ सैनिक निवृत्त होऊन गावाकडे परत आले आहे. गावातील सर्व माजी सैनिक हे नवयुवकांना सैनिकी जीवनातील अनुभव सांगून त्यांना सैनिकी नोकरीची प्रेरणा देत आहे.आतापर्यंत दशरथ सवडे, विष्णू सवडे, भास्कर सवडे, कौतिक सवडे, राजीव छडीदार, बद्री सवडे, डिगांबर सवडे हे देशसेवा बजावून सेवानिवृत्त झाले आहे. तर लक्ष्मण सवडे, अंकुश सवडे, विठ्ठल दरेकर, मोहन जाधव, संदीप सवडे, योगेश सवडे, भरत भारती, नारायण कदम, संतोष माळी, कृष्णा सवडे, विठ्ठल सवडे, मोहन सवडे, अमोल सवडे, स्वप्नील सवडे, दत्तात्रय सवडे, ईश्वर सवडे, नीलेश सवडे, राजेंद्र शेळके, सोमीनाथ आटपळे, नितेश सवडे आदी अनेक सेवा बजावत आहेत. स्वातंत्र्य दिन असो की प्रजासत्ताक दिन अकोलादेव या सैनिकी गावात आबालवृद्धांमध्ये राष्ट्रप्रेम उफाळत असते. देशासाठी वीर जवान देणारे हे छोटेसे गाव आज जाफराबाद तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जालना जिल्ह्यात ज्वलंत देशभक्तीचा एक स्त्रोत बनले आहे.पळसखेड्यातून देशसेवेसाठी १८ जवानजालना : भोकरदन तालुक्यातील पळसखेडा येथील १८ युवक हे भारतीय सैन्य दलात देशाच्या विविध भागांत सेवा बजावत आहेत. या गावाची लोकसंख्या ही केवळ ८८९ आहे. मात्र देशप्रेमाची आवड असलेले गावातील अनेक तरुण सैनभरतीची तयारी करतात.ग्रामस्थांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.गावात विविध सुविधांचा अभाव असताना गावकºयांचे देशप्रेम वाखाणण्याजोगे आहे. गावातील दोन तरुण सैन्यात होते. त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आत्तापर्यत १८ सैनिक देशसेवा बजावत आहेत. यात पंडित खरात, विष्णू रगडे, लिंबाजी खरात, विजय खरात, सतीश खरात, किशोर खरात, योगेश खरात, मनोज खरात, रामेश्वर खरात, विनोद खरात, समाधान खरात, ईश्वर खरात, प्रल्हाद खरात, आजिनाथ खरात, प्रमोद खरात, सुनील खरात असे १८ जवान देशसेवेत आहे. यातील दोन जवान देशसेवा पूर्ण करुन सेवानिवृत्त झाले आहेत.यांचा आदर्श इतरांनी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागIndependence Dayस्वातंत्र्य दिवस