शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
3
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
4
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
5
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
6
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
7
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
8
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
9
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
10
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
11
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
12
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
13
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
14
Katrina Kaif-Vicky Kaushal Baby: गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
15
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
16
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
17
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
18
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
19
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
20
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात

राज्यात वज्रमूठ, युती; बाजार समिती निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर निर्णय!

By विजय मुंडे  | Updated: April 3, 2023 19:26 IST

पाच बाजार समित्यांमध्ये ५३८ जणांचे अर्ज दाखल; पॅनलबाबत चर्चेचे गुऱ्हाळ

जालना : जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांमधील ९० जागांसाठी ५३८ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी युती-महाविकास आघाडीचा पुरस्कृत पॅनलबाबतचा निर्णय अंतिम झालेला नाही. त्यामुळे राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी, युती असली तरी बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये मात्र स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जाणार असल्याचे दिसत आहे.

राज्यातील सत्तांतराचे परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावरही झाले आहेत. एकीकडे राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, शिवसेना (शिंदे गट) अशी स्थिती आहे. सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर टीका करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते वज्रमूठ बांधून सभा घेत आहेत. या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या निवडणुकांची रेलचेल सुरू आहे. पक्षपुरस्कृत पॅनल या निवडणुकीत उतरत असल्याने राजकीय दृष्ट्या या निवडणुकांनाही महत्त्व आले आहे. परंतु, राज्यात महाविकास आघाडी- युती असली तरी स्थानिक पातळीवर काही नेत्यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाचही बाजार समिती निवडणुकांसाठी महाविकास आघाडी, युतीसाठी चर्चा होत असल्या तरी स्थानिक पातळीवरील पक्षीय मैत्रीनुसारच पॅनल उभे राहण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी पाच बाजार समित्यांच्या ९० जागांसाठी तब्बल ५३८ अर्ज दाखल झाले आहेत.

आरक्षणनिहाय अर्जसहकारी संस्थांचा मतदारसंघातून सर्वसाधारणच्या ३५ जागांसाठी १८८, महिला राखीवच्या १० जागांसाठी ५८, इतर मागासवर्ग राखीवच्या पाच जागांसाठी ३०, विमुक्त जाती, जमाती राखीवच्या पाच जागांसाठी ३३ अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामपंचायतींच्या मतदारसंघातून सर्वसाधारणच्या १० जागांसाठी ७८, अनुसचूचित जाती, जमाती राखीवच्या पाच जागांसाठी ३८, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या पाच जागांसाठी ३१ अर्ज दाखल झाले आहेत. व्यापारी, अडते मतदारसंघाच्या १० जागांसाठी ५० अर्ज, तर हमाल, मापारी मतदारसंघाच्या पाच जागांसाठी ३२ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

२० तारखेनंतर होणार चित्र स्पष्टदाखल अर्जांची छाननी ५ एप्रिल रोजी होणार आहे, तर ६ एप्रिल रोजी याद्यांची प्रसिद्धी केली जाणार आहे. २० एप्रिलपर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख आहे. या तारखेला निवडणूक रिंगणातून कितीजण माघार घेतात यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

अर्जांची छाननीबाजार समिती दाखल अर्जअंबड- १०२घनसावंगी- १०६परतूर- ६६आष्टी- ७८मंठा- १७७

टॅग्स :JalanaजालनाElectionनिवडणूक