शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दोन मित्रांचा कुंडलिका नदीत बुडून मृत्यू, घरातील कर्ते गेल्याने दोघांचे कुटुंब उघड्यावर

By दिपक ढोले  | Updated: August 26, 2023 17:17 IST

दोघेही बिगारी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.

जालना : शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या दोन तरुणांचे शनिवारी दुपारी कुंडलिका नदीतील एका खड्ड्यात पाण्यात तरंगताना मृतदेह आढळून आल्याची घटना जालना शहरातील गांधीनगर परिसरात घडली. त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आकाश सुनील पाटोळे (२४), मुकेश देविदास पाखरे (२८ दोघे रा. गांधीनगर) अशी मयतांची नावे आहेत. 

आकाश पाटोळे आणि मुकेश पाखरे हे दोघे मित्र आहेत. ते बिगारी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. या दोघांचेही लग्न झालेले आहेत. त्यातील मुकेश यांना चार मुले आहेत. ते दररोज सकाळी कामासाठी घरातून बाहेर पडतात. शुक्रवारी सकाळीही बिगारी कामासाठी चाललो, असे सांगून दोघेही घरातून निघून गेले. सायंकाळपर्यंत ते आलेच नाही. नातेवाइकांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ते मिळून आले नाहीत. शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास दोघांचेही मृतदेह कुंडलिका नदीपात्रात असलेल्या एका खड्ड्यात आढळून आले. याची माहिती सदर बाजार पोलिसांना देण्यात आली.

सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नातेवाइकांच्या मदतीने दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दोघांचे मृतदेह रुग्णवाहिकेने जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेJalanaजालनाDeathमृत्यू