शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 17:28 IST

गजानन जोरले व कैलास खरात हे दोघे सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पीर पिंपळगाव शिवारातील शेतकरी रवी कावळे यांच्या शेतात पोहण्यासाठी गेले होते.

जालना - शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरूणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना जालना तालुक्यातील पीरपिंपळगाव शिवारातील एका शेतात सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. गजानन रामलाल जोरले (३२ रा. पाणीवेस, जालना) व कैलास आसाराम खरात (३० रा. सोनलनगर) अशी मयतांची नावे आहेत.

गजानन जोरले व कैलास खरात हे दोघे सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पीर पिंपळगाव शिवारातील शेतकरी रवी कावळे यांच्या शेतात पोहण्यासाठी गेले होते. चार वाजण्याच्या सुमारास जनावरे घेऊन आलेल्या एका व्यक्तीस दोघे जण शेततळ्यात बुडाल्याचे समजले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक शिवाजी पोहार यांनी तातडीने घटनास्थळ गाठून नागरिकांच्या मदतीने शेततळ्यातून दोघांना अत्यवस्थ स्थितीत बाहेर काढण्यात आले. त्यांना पोलिसांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. गजानन जोडले यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील असा मोठा परिवार आहे. तसेच कैलास खरात यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :Deathमृत्यूJalanaजालना