शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

घनसावंगी तालुक्यात तीन दिवसांपासून बावीस गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 19:22 IST

Jalana News तीन दिवसांपासून कर्मचाऱ्यांना फॉल्ट सापडत नसल्याने सर्व गावातील व्यवहार ठप्प

ठळक मुद्देवादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा फटका

रांजणी : रविवारी सकाळी पोलवर वीज पडल्याने घनसावंगी तालुक्यातील रांजणीसह २२  गावे मागील तीन दिवसांपासून अंधारात आहेत. तीन दिवसांपासून कर्मचाऱ्यांना फॉल्ट सापडत नसल्याने सर्व गावातील व्यवहार ठप्प झाले आहेत. ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. 

रांजणी व परिसरात रविवारी सकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे परतूर-रांजणी वीज वाहिनीवरील पोलवर वीज पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. दुपारी पाऊस कमी झाल्याने महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुरूस्ती करण्यास सुरूवात केली. परंतु, सायंकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने रविवारी वीजपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत केला. परंतु, तीन तासातच पुन्हा बिघाड झाली. अनेकवेळा कर्मचाऱ्यांनी दुरूस्ती केली. मात्र, काहीच फायदा झाला नाही. 

मागील तीन दिवसांपासून रांजणी केंद्रासह बोररांजणी, करडगाव, चित्रवडगाव, माहेरजवळा, कंदारी या उपकेंद्राअंतर्गत येणारी २० ते २२ गावे अंधारात आहेत. विद्युत पुरवठा खंडित असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बँकेचे व्यवहार बंद पडल्याने मोठी गैरसोय होत आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी राजंणी केंद्राचे सहायक अभियंता ए. एम. म्हस्के, वरिष्ठ तंत्रज्ञ ए. एम. जईद, एच. टी. टेंबरे, एल. डी. पठाडे, एस. बी. पाटोळे, व्ही. आर. शिंदे व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. 

तातडीने दुरूस्ती करण्याची मागणीविद्युत पुरवठा खंडित असल्याने पिठाच्या गिरण्या बंद आहेत. तसेच अनेक गावांचा पाणीपुरवठा देखील बंद आहे. भरपावसाळ्यात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. त्यातच मागील तीन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने मोबाईल बंद पडले आहेत. विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहात आहे. याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी दीपक उघडे, लक्ष्मण पाटोळे, अंबादास मोरे आदींनी केली आहे.  

टॅग्स :Jalanaजालनाelectricityवीज