शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
2
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
3
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
4
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
5
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
6
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
7
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
8
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
9
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
10
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
11
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
12
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
13
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
14
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
15
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
16
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
17
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
18
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
19
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
20
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...

जालन्यात काँग्रेस, शिवसेना, वंचित आघाडीतच खरी चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 01:28 IST

जालना विधानसभेत नेहमीच कधी काँग्रस तर कधी शिवसेनेला मतदारांनी प्राधान्य दिले आहे

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना विधानसभेत नेहमीच कधी काँग्रस तर कधी शिवसेनेला मतदारांनी प्राधान्य दिले आहे. या मतदारसंघात जालना शहरतील मतदान महत्त्वाची भूमिका निभावतात. साधारपणे १९९९ पासूनचा इतिहास बघितल्यास युतीच्या काळात राज्यमंत्री असतानाही शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांचा काँग्रेसचे त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी कैलास गोरंट्याल यांनी बाजी मारली होती. २००४ मध्ये पुन्हा मतदारांनी खोतकरांना संधी तर २००९ मध्ये पुन्हा गोरंट्याल आणि २०१४ मध्ये पुन्हा खोतकर हे केवळ २९६ मतांनी विजयी झाले होते. खऱ्या अर्थाने वंचित आघाडीचा प्रयोग हा जालन्यात २०१४ मध्येच झाला होता. बसपाकडून अब्दुल रशीद यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसची मते त्यांनी हिसकावल्याने गोरंट्याल यांना पराभव स्विकारावा लागला होता.जालना विधानसभा मतदार संघात जालन्यासह ७८ गावांचा समावेश आहे. जालना विधानसभा मतदारसंघ हा २००९ मध्ये घनसावंगी मतदारसंघात विभागला गेला. जालना तालुक्यातील जवळपास ४२ गावे हे घनसावंगी मतदारसंघात गेले आहेत. ग्रमीण मतदान घसरल्याचा मोठा फटका हा शिवसेनेला बसला आहे. २००९ मध्ये शिवसेनेचे परंपरागत उमेदवार अर्जुन खोतकर यांनी घनसावंगी मतदारसंघातून राजेश टोपे यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तेथे त्यांना ८३ हजारापेक्षा अधिक मते मिळाली होती. परंतु विजय हा राजेश टोपेंचाच झाला होता. त्यावेळी जालन्यातील शिवसेनेकडून जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांना संधी मिळाली होती. त्यांची थेट लढत ही काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांच्या सोबत झाली होती.अर्जुन खोतकर यांनी पुन्हा २०१४ मध्ये घनसावंगी एैवजी जालना विधासभेतून निवडणूक लढवली. ही निवडणुक अत्यंत चुरशीची झाली. भाजप-शिवसेनची युती ऐन निवडणुकीच्या तोंडावर तुटली. त्याचा मोठा लाभा अर्जुन खोतकरांना झाला. त्यावेळी भाजपकडून बदनापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. अरविंद चव्हाण यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करून जालना विधानसभेतून मोठी टक्कर दिली. मतविभाजनाचा मोठा फटका हा काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांना सहन करावा लागला. या निवडणुकीत अर्जुन खोतकर आणि अरविंद चव्हाण हे दोन्ही मराठा समााजाचे मोठे प्रस्थ होते. चव्हाण हे जालन्याचे माली पाटील तर अर्जुन खोतकर यांचे शिवसेनेमुळे तगडा संपर्क आहे. यांच्या दोघांमध्ये मराठा समाजाचे मतदान विभागले गेले.तसेच भाजपची लाटही गोरंट्याल यांच्या पराभवास कारणीभूत ठरली. जालन्यातील विधानसभेची निवडणुक ही त्यावेळी कुठल्या एका विकास मुद्यावर लढली गेली नाही. विशेष म्हणजे कैलास गोरंट्याल यांनी भगिरथ प्रयत्न करून जालना शहरासाठी २५० कोटी रूपये खर्चाची पैठण ते जालना ही पाणीपुरवठा आणल्याने त्यांची मोठी जमेची बाजू होती. त्यामुळे त्यांना जलसम्राट ही पदवी देखील नागरिकांनी दिली. एवढी मोठी योजना आणून जालन्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी केलेला संघर्ष मतदार विसरणार नाहीत, असा विश्वास गोरंट्याल यांना होता. मात्र, ऐन वेळी शिवसेना -भाजपची युती तुटल्याने त्यांचा हिरमोड झाला.बसपाकडून अब्दुल रशीद पहेलवान यांना निवडणूक रिंगणात उतरवण्या मागे पडद्या आडून अर्जुन खोतकर हेच होते. रशीद यांना उभे केल्याने काँग्रेसची परंपरागत मुस्लिम आणि दलित व्होट बँक खिळखिळी झाली. आणि हेच खोतकरांच्या विजयाच्या पथ्यावर पडले. त्यामुळे खºया अर्थाने वंचित आघाडी जरी आता अस्तित्वात आली असली तरी हा प्रयोग जालन्यात खोतकरांनी मोठ्या खुबीने २१०४ मध्ये केला होता. यावेळी तर वंचित आघाडीच मैदानात उतरणार असल्याने मतदार संघातील समिकरणे कशी बदलतील याकडे लक्ष लागून आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण