शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

ट्रॅव्हल्सचे चाक पुन्हा पंक्चर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST

जालना : जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे एसटी महामंडळासोबतच खासगी ट्रॅव्हल्सलाही मोठा फटका बसला आहे. यामध्ये डिझेलचा खर्च आणि कर्मचाऱ्यांचे ...

जालना : जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे एसटी महामंडळासोबतच खासगी ट्रॅव्हल्सलाही मोठा फटका बसला आहे. यामध्ये डिझेलचा खर्च आणि कर्मचाऱ्यांचे वेतन निघणे अवघड झाले आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून हा व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. मध्यंतरी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने व्यवसायाला गती आली होती. परंतु, आज जिल्ह्यात गेल्या २० दिवसांमध्ये सरासरी ४०० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक बंधने घातली आहेत. याचा मोठा फटका आमच्या व्यवसायाला बसल्याची प्रतिक्रिया ट्रॅव्हल्स चालकांनी व्यक्त केली.

सोबतच डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने तो खर्चही वाढला आहे. जालना जिल्ह्यात विशेष करून जालना शहरात एकूण नऊ ट्रॅव्हल्स कंपन्या बस चालवितात. दररोज साधारणपणे ६० ते ७० बसेस या मुंबई ते नागपूर, जालना ते पुणे, जालना ते मुंबई, जालना ते नाशिक, जालना ते नागपूर अशा धावतात. परंतु, कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने या बसच्या फेऱ्या ५० टक्क्यांपेक्षा कमी झाल्या आहेत. यामुळे ट्रॅव्हल्स चालकांसमोर मोठा पेच आहे.

गाडी रुळावर येत होती पण...

जालना जिल्ह्यात डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात होती. परंतु, मार्च लागताच गेल्या वर्षीप्रमाणे रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. याचा परिणाम ट्रॅव्हल्सवर झाला आहे. मध्यंतरी बऱ्यापैकी प्रवासी आकर्षित झाले होते. ती संख्या आता घटली आहे.

मध्यंतरी रुळावर आलेली ट्रॅव्हल्सची गाडी पुन्हा पंक्चर झाली आहे. त्यामुळे हा व्यवसाय आता तोट्यात गेला आहे. प्रवाशांची काळजी घेताना आम्ही बस पूर्णपणे सॅनिटाईज करतो. तसेच प्रत्येकाला मास्क बंधनकारक केलेला आहे. हे सर्व नियम पाळत असलो तरी प्रवासी पूर्वीप्रमाणे आकर्षित होत नाहीत. त्यामुळे आर्थिक अडचणीत भर पडली आहे.

-गणेश घुगे, व्यवस्थापक

गेल्या वर्ष दोन वर्षांमध्ये हरिव्दार, रामेश्वरम् या चारही धामला जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय होती. ती आता कोरोनामुळे मंदावल्याने ट्रॅव्हल्सच्या बस उभ्या आहेत. त्यांची निगा राखतानाच आमच्या नाकीनऊ येत असून तो एक प्रकारचा पांढरा हत्ती पोसण्यासारखे झाले आहे. ही परिस्थिती केव्हा निवळेल याची आम्ही चातक पक्ष्याप्रमाणे वाट पाहत आहोत.

-कल्याण आचार्य, संचालक

जालना शहरातील सर्व ट्रॅव्हल्स कंपन्या अडचणीत सापडल्या आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी अन्य उद्योग, व्यवसायांप्रमाणेच शासनाने थोडीबहुत नुकसान भरपाई देऊन आम्हाला संकटाच्या काळात मदत करावी, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे तसा पाठपुरावा देखील करणार आहोत.

-राजेश राऊत, अध्यक्ष ट्रॅव्हल्स असोसिएशन