शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
4
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
5
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
6
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
7
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
8
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
9
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
10
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
11
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
12
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
13
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
14
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
15
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
16
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
17
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
18
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
19
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
20
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण

आज लोकसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:44 AM

प्रचाराची सांगता रविवारी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना लोकसभा मतदार संघाची निवडणूक तिसऱ्या टप्प्यात होत आहे. गेल्या १५ दिवसांपासून तळपत्या उन्हातही प्रचाराने वेग घेतला होता. काँग्रेस, भाजप आणि वंचित आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांनी मतदार संघात प्रचारसभा घेऊन वातावरण तापवले होते. या प्रचाराची सांगता रविवारी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.जालना लोकसभा मतदार संघात कधी नव्हे एवढी चुरस या निवडणुकीत दिसून आली. सलग पाचव्यांदा खासदारकीची निवडणूक लढविणारे रावसाहेब दानवे यांच्या विरूद्ध काँग्रेसमधून कोणाला उमेदवारी द्यायची यावरूनच गेले तीन महिने गोंधळाचे वातावरण होते. काँग्रेसच्या अनेक दिग्गजांनी दानवेंच्या विरूद्ध दोन हात करण्यास असमर्थता दर्शविली. शेवटी पुन्हा एकदा काँग्रेसने २०१४ साली दानवेंना टक्कर देणाºया विलास औताडे यांनाच रिंगणात उतरविले. २०१४ मध्ये मोदी लाटेतही औताडे यांना ४ लाख ८५ हजार मते मिळाली होती. यावेळी अशी कुठलीच लाट नसल्याने औताडे हे दानवेंना चांगली टक्कर देतील अशी अपेक्षा आहे.वंचित आघाडीचे डॉ. शरदचंद्र वानखेडे यांच्या प्रचारार्थ संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे दोन वेळेस जालन्यात येऊन गेले. आंबेडकरांप्रमाणेच आ. बच्चू कडू, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, भाजपचे प्रवक्ता माधव भंडारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप अल्पसंख्याक समितीचे हाजी अरफाज, केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष इब्राहिम भाईजान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, भाजप महिला मोर्चाच्या माधवी नाईक यांच्यासह अनेक दिग्गजांनी जालना, भोकरदन, पैठण, फुलंब्री, बदनापूर, सिल्लोड येथे या नेत्यांनी हजेरी लावून आपल्याच पक्षाला विजयी करण्याचे आवाहन करून एकमेकांवर टीकेची झोड उठवून उन्हाळ्यात आणखी राजकीय वातावरण तप्त केले होते.दरम्यान, शनिवारी जवळपास सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मतदारांशी वेगवेगळ््या प्रकारे संपर्क साधून निवडून देण्याचे आवाहन केले.निवडणूक यंत्रणा सज्जजालना लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची आवश्यक ती तयारी पूर्ण झाली आहे. इव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन पूर्णपणे सील करण्यात आल्या असून, त्यांचा सांभाळ हा अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत केला जात आहे. या निवडणुकीत जवळपास ८ हजार कर्मचारी लागणार असून, दोन हजारपेक्षा अधिक मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात येत आहे. - राजीव नंदकर

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालना