शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

तंबाखूसेवन ठरतेय कर्करोगाला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:53 IST

तंबाखू सेवनामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांना समोरे जाण्याची वेळ अनेकांवर येत आहे. जिल्हा आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत साडेसहा लाख नागरिकांपैकी तब्बल २४०० जणांना तंबाखू सेवनामुळे मौखिक आजार जडल्याचे समोर आले आहेत.

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तंबाखू सेवनामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांना समोरे जाण्याची वेळ अनेकांवर येत आहे. जिल्हा आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत साडेसहा लाख नागरिकांपैकी तब्बल २४०० जणांना तंबाखू सेवनामुळे मौखिक आजार जडल्याचे समोर आले आहेत. यातील नऊ नागरिकांना कर्करोग झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.जागतिक आरोग्य संघटनेने ३१ मे हा दिवस तंबाखू सेवन विरोधी दिन जाहीर केला आहे. तंबाखू न सेवन करण्याबाबत जनजागृती करणे हा या मागील उद्देश आहे. मात्र, जिल्ह्यात तंबाखू, गुटखा आणि सिगारेटचे सेवन आणि विक्रीचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढले आहे. तसेच व्यसनमुक्तीसाठी गुटखा आणि खुल्या सिगारेटच्या विक्रीवर बंदी असूनही जिल्ह्यात सर्रास विक्री होताना दिसून येते. तंबाखू सेवनाने फुफ्फुस, अन्न नलिका, किडनी, लहान आतडे, यकृत सारख्या मुख्य अवयवांवर वाईट परिणाम होणारे रोग जडत आहे. या पदार्थांचे धोके लक्षात घेऊन सर्वानीच त्यापासून दूर राहण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. राज्यात विविध सर्वेक्षणांच्या आकडेवारीनुसार यात दरवर्षी वाढ होताना आढळून येते. सर्वेक्षणात जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांमध्ये तंबाखू सेवनाचे व्यसन असल्याचे आढळून आले. शहरात गुटखाजन्य पदार्थाची विक्री होत असल्यास या दुकानदारांचे परवाने रद्द करण्याचे आदेश अन्न सुरक्षा आयुक्त पल्लवी दराडे यांनी दिले होते.मात्र, त्याची अंमलजबावणी कागदावरच आहे.५० टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांना व्यसनराज्यात तंबाखू सेवनाचे प्रमाण सर्वाधिक आहे. विविध सर्वेक्षणांच्या आकडेवारीनुसार यात दरवर्षी वाढ होताना आढळून येते. २०१२-२०१३ मध्ये एका सर्वेक्षणात राज्यात ५० टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांमध्ये तंबाखू सेवनाचे व्यसन आढळून आले आहे. दरवर्षी जगात तब्बल ६० लाख नागरिकांचा तंबाखू सेवनामुळे मृत्यू होतो. २०३० पर्यंत हा मृत्यूचा आकडा ८० लाखांपेक्षा अधिक होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या व्यवसानापासून दूर राहणे गरजेचे आहे.

टॅग्स :anti gutka campaignगुटखाविरोधी मोहीमcancerकर्करोग