शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणासह वाऱ्यामुळे ज्वारी आडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:14 IST

राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर परिसरात मागील आठ दिवसांपासून ढगाळ वातावरणासह वादळी वारे आहे. यात रबी हंगामातील ज्वारी व ...

राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर परिसरात मागील आठ दिवसांपासून ढगाळ वातावरणासह वादळी वारे आहे. यात रबी हंगामातील ज्वारी व गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

गतवर्षी झालेल्या परतीच्या पावसामुळे विहिरींमध्ये मुबलक जलसाठा झाला असल्याने राजूर परिसरातील रबी हंगामाच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, हिवाळी मका, हरभरा पिकाची लागवड केली आहे. परंतु, मागील आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, सोसाट्याचा वारा वाहत आहे. याचा फटका पिकांना बसत आहे. सध्या ज्वारीच्या कणसात दाणे भरण्याची क्रिया सुरू आहे. अशातच वातावरण बदलाचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. अगोदरच सततच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट आल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. मुबलक पाण्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीच्या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करून खरीपातील नुकसान भरपाई भरून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, अगोदरच शेतकरी आर्थिक संकटात असतांना निसर्गाच्या लहरीपणामुळे रबी हंगामातील पिकांना फटका बसत आहे.

बानेगाव, चांदई ठोंबरे, पळसखेडा ठोंबरी, थिगळखेडा, देऊळगाव ताड, तोंडोळी आदी गाव परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याचे प्रमाण अधिक आहे. थिगळखेडा येथील शेतकरी तुकाराम गाडेकर यांच्या शेतातील ज्वारीचे पीक आडवे झाले आहे. याचा शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

फोटो ओळ : बाणेगाव परिसरात वादळी वाऱ्यामुळे ज्वारी पिकाचे झालेले नुकसान.