शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

ढगाळ वातावरणासह वाऱ्यामुळे ज्वारी आडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:14 IST

राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर परिसरात मागील आठ दिवसांपासून ढगाळ वातावरणासह वादळी वारे आहे. यात रबी हंगामातील ज्वारी व ...

राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर परिसरात मागील आठ दिवसांपासून ढगाळ वातावरणासह वादळी वारे आहे. यात रबी हंगामातील ज्वारी व गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

गतवर्षी झालेल्या परतीच्या पावसामुळे विहिरींमध्ये मुबलक जलसाठा झाला असल्याने राजूर परिसरातील रबी हंगामाच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, हिवाळी मका, हरभरा पिकाची लागवड केली आहे. परंतु, मागील आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, सोसाट्याचा वारा वाहत आहे. याचा फटका पिकांना बसत आहे. सध्या ज्वारीच्या कणसात दाणे भरण्याची क्रिया सुरू आहे. अशातच वातावरण बदलाचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. अगोदरच सततच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट आल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. मुबलक पाण्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीच्या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करून खरीपातील नुकसान भरपाई भरून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, अगोदरच शेतकरी आर्थिक संकटात असतांना निसर्गाच्या लहरीपणामुळे रबी हंगामातील पिकांना फटका बसत आहे.

बानेगाव, चांदई ठोंबरे, पळसखेडा ठोंबरी, थिगळखेडा, देऊळगाव ताड, तोंडोळी आदी गाव परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याचे प्रमाण अधिक आहे. थिगळखेडा येथील शेतकरी तुकाराम गाडेकर यांच्या शेतातील ज्वारीचे पीक आडवे झाले आहे. याचा शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

फोटो ओळ : बाणेगाव परिसरात वादळी वाऱ्यामुळे ज्वारी पिकाचे झालेले नुकसान.