शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ढगाळ वातावरणासह वाऱ्यामुळे ज्वारी आडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:14 IST

राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर परिसरात मागील आठ दिवसांपासून ढगाळ वातावरणासह वादळी वारे आहे. यात रबी हंगामातील ज्वारी व ...

राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर परिसरात मागील आठ दिवसांपासून ढगाळ वातावरणासह वादळी वारे आहे. यात रबी हंगामातील ज्वारी व गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

गतवर्षी झालेल्या परतीच्या पावसामुळे विहिरींमध्ये मुबलक जलसाठा झाला असल्याने राजूर परिसरातील रबी हंगामाच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, हिवाळी मका, हरभरा पिकाची लागवड केली आहे. परंतु, मागील आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, सोसाट्याचा वारा वाहत आहे. याचा फटका पिकांना बसत आहे. सध्या ज्वारीच्या कणसात दाणे भरण्याची क्रिया सुरू आहे. अशातच वातावरण बदलाचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. अगोदरच सततच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट आल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. मुबलक पाण्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीच्या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करून खरीपातील नुकसान भरपाई भरून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, अगोदरच शेतकरी आर्थिक संकटात असतांना निसर्गाच्या लहरीपणामुळे रबी हंगामातील पिकांना फटका बसत आहे.

बानेगाव, चांदई ठोंबरे, पळसखेडा ठोंबरी, थिगळखेडा, देऊळगाव ताड, तोंडोळी आदी गाव परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याचे प्रमाण अधिक आहे. थिगळखेडा येथील शेतकरी तुकाराम गाडेकर यांच्या शेतातील ज्वारीचे पीक आडवे झाले आहे. याचा शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

फोटो ओळ : बाणेगाव परिसरात वादळी वाऱ्यामुळे ज्वारी पिकाचे झालेले नुकसान.