शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
3
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
4
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
5
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
6
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
7
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
8
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
9
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
10
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
11
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
12
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
13
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
14
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
15
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
16
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
17
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
18
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!

ढगाळ वातावरणासह वाऱ्यामुळे ज्वारी आडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:14 IST

राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर परिसरात मागील आठ दिवसांपासून ढगाळ वातावरणासह वादळी वारे आहे. यात रबी हंगामातील ज्वारी व ...

राजूर : भोकरदन तालुक्यातील राजूर परिसरात मागील आठ दिवसांपासून ढगाळ वातावरणासह वादळी वारे आहे. यात रबी हंगामातील ज्वारी व गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

गतवर्षी झालेल्या परतीच्या पावसामुळे विहिरींमध्ये मुबलक जलसाठा झाला असल्याने राजूर परिसरातील रबी हंगामाच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, हिवाळी मका, हरभरा पिकाची लागवड केली आहे. परंतु, मागील आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, सोसाट्याचा वारा वाहत आहे. याचा फटका पिकांना बसत आहे. सध्या ज्वारीच्या कणसात दाणे भरण्याची क्रिया सुरू आहे. अशातच वातावरण बदलाचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. अगोदरच सततच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट आल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. मुबलक पाण्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बीच्या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करून खरीपातील नुकसान भरपाई भरून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, अगोदरच शेतकरी आर्थिक संकटात असतांना निसर्गाच्या लहरीपणामुळे रबी हंगामातील पिकांना फटका बसत आहे.

बानेगाव, चांदई ठोंबरे, पळसखेडा ठोंबरी, थिगळखेडा, देऊळगाव ताड, तोंडोळी आदी गाव परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याचे प्रमाण अधिक आहे. थिगळखेडा येथील शेतकरी तुकाराम गाडेकर यांच्या शेतातील ज्वारीचे पीक आडवे झाले आहे. याचा शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

फोटो ओळ : बाणेगाव परिसरात वादळी वाऱ्यामुळे ज्वारी पिकाचे झालेले नुकसान.