शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

तीन रोहित्रे जळून खाक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:31 IST

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रोहित्र जळण्याचा सिलसिला शनिवारीही कायम राहिला.

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रोहित्र जळण्याचा सिलसिला शनिवारीही कायम राहिला. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच गावात तीन रोहित्रे बसविण्यात आली होती. मात्र, वीजचोरांच्या आकड्यांमुळे भार वाढल्याने शनिवारी एक -दोन नव्हे, तीन रोहित्र जळून खाक झाली.दोन महिन्यांपूर्वी कुंभार पिंपळगाव येथील बकरी बाजार परिसरातील दोन व ग्रामपंचायत परिसरातील दोन रोहित्रे जळाली होती. मात्र, त्याची वेळेत दुरूस्ती झाली नाही. वीजचोरांचे आकडे वाढल्याने नंतर जायकवाडी वसाहत आणि बीएसएनएल कार्यालय परिसरातील रोहित्र जळून खाक झाले. सहा रोहित्रे बंद असल्याने वीज ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ग्रामस्थांच्या पाठपुराव्यानंतर दोन दिवसांपूर्वीच तीन नवीन रोहित्रे गावात आली होती. मात्र, दोन रोहित्रे नादुरूस्त होती. ती बदलून आणल्यानंतर गावातील विविध भागांत लावण्यात आली. तीन रोहित्र बसतात न बसतात तोच वीजचोरांच्या आकड्यांचा भार वाढल्याने शनिवारी गावातील बसस्थानक परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर व तिरूपती कॉम्प्लेक्स परिसरातील तीन रोहित्रे जळून खाक झाली आहेत. लागलेली आग इतकी भीषण होती की रोहित्राचा स्फोट होतो की काय, अशी भीती व्यक्त केली जात होती. आग लागल्यानंतर महावितरण कंपनीचे कर्मचारी फिरकले नाहीत. गावातील सहा डीपी बंद असल्याने संपूर्ण गाव अंधारात आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज