शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
4
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
5
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
6
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
7
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
8
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
9
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
10
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
11
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
12
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
13
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
14
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
15
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण
16
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
17
वाद-प्रतिवाद सुरू असलेल्या भारताला आज स्वीकारमंत्र अंगीकारण्याची गरज -मोरारीबापू
18
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
19
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
20
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख

'रावसाहेब दानवेंसोबतचा हा समेट शेवटचा'; अर्जुन खोतकरांनी शिंदे गटात जाताना केले स्पष्ट

By संजय देशमुख  | Updated: July 30, 2022 12:07 IST

राजकीय समेट झाल्याचे दानवेंकडून सांगितले जात आहे. परंतु, आपण यावेळची लोकसभा मला लढवू द्यावी, ही मागणी दानवे यांच्याकडे केली असल्याचेही खोतकर म्हणाले.

जालना: शिवसेनेचे उपनेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी शनिवारी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्याचे जाहीर केले. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आपण हा निर्णय काळजावर दगड ठेवून घेतला आहे. या संदर्भात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सकाळी फोनवर बोलून परिवारावर असलेल्या संकटाची सविस्तर माहिती दिली. तसेच शिंदे गटात जात असल्याचे सांगितले. ही माहिती देताना अर्जुन खोतकर हे अत्यंत भावनिक झाले होते. तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंसोबतचा हा समेट शेवटचा असल्याचेची  त्यांनी नमूद केले.

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना खोतकर म्हणाले, जालना लोकसभेवरील दावा अद्यापही सोडलेला नाही. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिल्लीत चर्चा झाली. राजकीय समेट झाल्याचे दानवेंकडून सांगितले जात आहे. परंतु, आपण यावेळची लोकसभा मला लढवू द्यावी, ही मागणी दानवे यांच्याकडे केली असल्याचेही ते म्हणाले. एकूणच ईडी या संस्थेविषयी न्यायालयीन प्रकरण सुरू असल्याने आपण जास्त बोलणार नाही. 

जालना सहकारी साखर कारखाना सुरू करण्याबाबत आपण दिवाळी स्नेहमिलनामध्ये घोषणा केली होती. त्यानंतर सर्व घडलेला प्रकार तुमच्यासमोर असल्याचे ते म्हणाले. कारखान्यासह जालना तालुक्यातील हातवन प्रकल्प, जालना शहरातील रस्ते, पाणी या मुद्द्यांवरही त्यांनी लक्ष वेधले. उद्या मुख्यमंत्री सिल्लोडला येत आहेत त्यांच्या सभेला आपण जाणार असल्याची घोषणाही खोतकरांनी केली. लवकरच शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

खा. दानवे यांच्या सोबत राजकीय समेट कितपत टिकू शकेल याबद्दल विचारले असता तो येणारा काळच ठरवेल, असे त्यांनी सांगितले. तसेच आताही दानवेंसोबतचा समेट शेवटचा असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी पी.एन.यादव, माजी जि.प. अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, मोहन अग्रवाल, पंडित भुतेकर, सुधाकर निकाळजे, आत्मानंद भक्त आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरraosaheb danveरावसाहेब दानवेJalanaजालनाEknath Shindeएकनाथ शिंदे