शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

जालना जिल्ह्यात रोहयोच्या ७१४ कामांवर तेरा हजार मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 01:16 IST

जालना जिल्ह्यातील २१३ ग्रामपंचायतीमध्ये आज घडीला ७१४ रोजगार हमी योजनेतून कामे सुरू आहेत. या कामांवर तेरा हजार ५७४ मजूर कार्यरत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील २१३ ग्रामपंचायतीमध्ये आज घडीला ७१४ रोजगार हमी योजनेतून कामे सुरू आहेत. या कामांवर तेरा हजार ५७४ मजूर कार्यरत आहेत.सध्या कडक उन्हामुळे शेतातील कामांची संख्या मंदावली आहे. त्यामुळे अनेकजण हे रोजगाराच्या संधी शोधत आहेत. ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेमुळे हक्काच्या रोजगाराची संधी मिळत असल्याने या कामावर जाण्यासाठी आता मजूरांची संख्या वाढली आहे. सध्या अकुशल कामाच्या माध्यमातून मोठी कामे केली जात आहेत. त्यात कृषी, वनविभाग तसेच गाळ काढण्याच्या कामाला प्राधान्य दिले जात असल्याचे रोजगार हमी विभागाकडून सांगण्यात आले.सद्यस्थितीत या मजूरांना दररोज २०३ रूपये प्रमाणे मोबदला दिला जात आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये रोजगार हमीच्या कामांवर ४२ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला असून, त्यातील मजुरीपोटी जवळपास ९ कोटी ५१ लाख रूपये वाटप करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी रोजगार हमीच्या कामावर ३० पेक्षा जास्त मजूर असतील त्या ठिकाणी पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी एका स्वतंत्र व्यक्तीला नेमण्यात येत आहे. तसेच मजूरांच्या लहान मुलांना सांभाळण्यासाठी देखील एका महिलेला नेमण्यात येऊन त्या महिलेलाही स्वतंत्र रोजगार दिला जात आहे.एकूणच या विभागाकडून मागेल त्याला काम देण्यासाठीची आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. सध्या परतूर, मंठा आणि भोकरदन तालुक्यातून बऱ्यापैकी कामांची मागणी असल्याचे सांगण्यात आले.दिल्लीचे पथक येणारराज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेचे काम नेमके कसे सुरू आहे, याची चाचपणी करण्यासाठी दिल्ली येथून एक स्वतंत्र पथक गुडगव्हर्नस अंतर्गत येणार आहे. त्यात आता ज्या ठिकाणी काम सुरू असेल त्या ठिकाणी कामाचा तपशील असणारा फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यात कामाचा पूर्ण तपशील तसेच येणारा खर्च आणि प्रत्यक्ष कामावर झालेला खर्च याची माहिती द्यायची आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतgovernment schemeसरकारी योजना