शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकात समस्यांना नाही तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 01:16 IST

बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम वर्षभरापासून रखडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम वर्षभरापासून रखडले आहे. जुनी आसन व्यवस्था तोडल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. बसस्थानकाची ही दुरवस्था जबाबदार अधिकाऱ्यांना दिसत नाही का, असा सवाल संतप्त प्रवाशांमधून केला जात आहे.जालना बसस्थानकाच्या तूतनीकरणासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. वर्षभरापूर्वी सुरू झालेले नूतनीकरणाचे काम सुरुवातीपासूनच संथ गतीने सुरू आहे. नूतनीकरणाच्या कामासाठी जुने बांधकाम पूर्णत: तोडण्यात आले. मात्र, त्या ठिकाणी वर्ष उलटूनही नवीन कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे बसस्थानकात सर्वत्र धूळ उडत आहे. बसायलाच जागा नसल्याने प्रवाशांना नाईलाजास्तव वाळूवर बसावे लागते आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच भिंतींनाही तडे गेले आहेत. येथील रस्त्यांची चाळणी झाल्यामुळे बस आगारात आल्यावर सर्व धूळ प्रवाशांच्या अंगावर उडत आहे. योग्य सुविधा नसल्याने प्रवाशी बसस्थानक परिसरात उघड्यावरच प्रवाशी लघुशंका करत आहेत. चौकशी कक्ष नावालाच आहे. हिरकणी कक्षाला टाळे लागले आहे. तर पोलीस चौकी बेवारस आहे. रात्रीच्या वेळी स्थानकातील हायमॉस्ट बंद असतो. त्यामुळे मागील बाजूस सर्वत्र अंधार असतो. अंधाराचा फायदा घेत स्थानक परिसरात भामट्यांचा वावर वाढला आहे. बसमध्ये चढताना महिला प्रवाशांचे दागिने व पर्स चोरी जाण्याचे प्रकार वाढले आहे. तर वाहक-चालकांसाठीच्या विश्राम कक्षात अस्वच्छतेमुळे उभे राहणे कठीण होत आहे. मात्र, नाईलाजास्तव वाहक-चालकांना येथे मुक्कामी थांबावे लागत आहे. एकंदरीत बसस्थानकाचा उकिरडा होत असताना अधिका-यांचे याकडे लक्ष जात नाही का, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळTravelप्रवास