शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

७२ तासांनंतरही पंचनामे नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:40 IST

गारपिटीमुळे नुकसानीचे ४८ तासांत पंचनामे करण्याची घोषणा सरकारने केली. प्रत्यक्षात ७२ तास उलटूनही पंचनाम्यास अद्याप सुरुवातही नाही. सरकारने शेतक-यांचा अंत पाहू नये, असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला. 

जालना : शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत रविवारी झालेल्या गारपिटीमुळे नुकसानीचे ४८ तासांत पंचनामे करण्याची घोषणा सरकारने केली. प्रत्यक्षात ७२ तास उलटूनही पंचनाम्यास अद्याप सुरुवातही नाही. सरकारने शेतक-यांचा अंत पाहू नये, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी दिला. रविवारी झालेल्या गारपीट आणि वादळी वा-याने राज्यातील मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधील शेती पिकांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, जालना जिल्ह्यातील जालना व मंठा तालुके गारपिटीमुळे सर्वात जास्त नुकसानग्रस्त झाले आहेत. या तालुक्याचा बुधवारी धनंजय मुंडे यांनी दौरा करून पाहणी केली.अनेक शेतीपिकांचे, फळबागांच्या नुकसानीची माहिती त्यांनी शेतक-यांशी संवाद साधून जाणून घेतली. सरकारने ४८ तासांत पंचनामे करण्याचे जाहीर केले असले तरी ७२ तासा नंतरही पंचनाम्याला सुरूवात झाली नसल्याची तक्रार अनेक शेतक-यांनी मुंडेंशी बोलताना केली. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी १० मिनिटांचा धावता दौरा करताना आमच्या शेतांची साधी पाहणीही न करता पळ काढल्याबद्दलही अनेक शेतक-यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.मुंडे म्हणाले की, आपण शेतक-यांच्या पाठीशी असून, शेतकºयांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी सरकारशी संघर्ष करू. निसर्गाने शेतक-यांवर आस्मानी तर सरकारने सुलतानी संकट आणले आहे. शेतक-यांचा अंत पाहू नका. आज पिके उद्ध्वस्त झाली आहेत. शेतक-यांना आधार न दिल्यास ते उद्ध्वस्त होतील, अशी भीती व्यक्त केली. किती क्षेत्रावर कोणते नुकसान झाले आहे. याचे आकडे सरकारकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे पंचनामे, बैठका आणि आढावा यांचा फार्स न करता सरसकट मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्यासमवेत पंकज बोराडे, निसार देशमुख, बबलू चौधरी, बळीराम कडपे, अ‍ॅड.संजय काळबांडे आदी उपस्थित होते.