शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

७२ तासांनंतरही पंचनामे नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:40 IST

गारपिटीमुळे नुकसानीचे ४८ तासांत पंचनामे करण्याची घोषणा सरकारने केली. प्रत्यक्षात ७२ तास उलटूनही पंचनाम्यास अद्याप सुरुवातही नाही. सरकारने शेतक-यांचा अंत पाहू नये, असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला. 

जालना : शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत रविवारी झालेल्या गारपिटीमुळे नुकसानीचे ४८ तासांत पंचनामे करण्याची घोषणा सरकारने केली. प्रत्यक्षात ७२ तास उलटूनही पंचनाम्यास अद्याप सुरुवातही नाही. सरकारने शेतक-यांचा अंत पाहू नये, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी दिला. रविवारी झालेल्या गारपीट आणि वादळी वा-याने राज्यातील मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधील शेती पिकांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, जालना जिल्ह्यातील जालना व मंठा तालुके गारपिटीमुळे सर्वात जास्त नुकसानग्रस्त झाले आहेत. या तालुक्याचा बुधवारी धनंजय मुंडे यांनी दौरा करून पाहणी केली.अनेक शेतीपिकांचे, फळबागांच्या नुकसानीची माहिती त्यांनी शेतक-यांशी संवाद साधून जाणून घेतली. सरकारने ४८ तासांत पंचनामे करण्याचे जाहीर केले असले तरी ७२ तासा नंतरही पंचनाम्याला सुरूवात झाली नसल्याची तक्रार अनेक शेतक-यांनी मुंडेंशी बोलताना केली. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी १० मिनिटांचा धावता दौरा करताना आमच्या शेतांची साधी पाहणीही न करता पळ काढल्याबद्दलही अनेक शेतक-यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.मुंडे म्हणाले की, आपण शेतक-यांच्या पाठीशी असून, शेतकºयांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी सरकारशी संघर्ष करू. निसर्गाने शेतक-यांवर आस्मानी तर सरकारने सुलतानी संकट आणले आहे. शेतक-यांचा अंत पाहू नका. आज पिके उद्ध्वस्त झाली आहेत. शेतक-यांना आधार न दिल्यास ते उद्ध्वस्त होतील, अशी भीती व्यक्त केली. किती क्षेत्रावर कोणते नुकसान झाले आहे. याचे आकडे सरकारकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे पंचनामे, बैठका आणि आढावा यांचा फार्स न करता सरसकट मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्यासमवेत पंकज बोराडे, निसार देशमुख, बबलू चौधरी, बळीराम कडपे, अ‍ॅड.संजय काळबांडे आदी उपस्थित होते.