शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

बेताची परिस्थिती पाहून तरुणाने शेतात काम सुरु केलं; पण गव्हाला पाणी देताना शॉक लागून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2023 16:08 IST

पिकाला पाणी देत असताना विजेच्या तुटलेल्या वायरला अचानक धक्का लागला.

राजूर ( जालना) : गव्हाला पाणी देताना तुटलेल्या वायरचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भोकरदन तालुक्यातील चांधई एक्को येथे गुरुवारी घडली. सतीश मधुकर टोम्पे (२१) असे मयताचे नाव आहे. 

मधुकर टोम्पे यांना जेमतेम शेती आहे. त्यांना दोन मुले असून, एक मुलगा राजूर येथील एका खासगी बँकेत काम करतो. तर दुसरा सतीश हा पोलीस भरतीची तयारी करीत होता. परंतु, त्याला यश मिळत नव्हते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने वडिलांना तो शेतीकामात मदत करीत होता. गुरुवारी दुपारी शेतातील गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी तो गेला होता. पिकाला पाणी देत असताना विजेच्या तुटलेल्या वायरला अचानक धक्का लागला. पिकात फेकल्या गेल्यामुळे बराच वेळ त्याच्याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. एका महिलेने त्याला पाहताच, आरडाओरड सुरू केली. आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेऊन सतीशला राजूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सतीशच्या जाण्याने टोम्पे कुटुंबीयावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलीस बनण्याचे स्वप्न अपूर्णच राहिलेसतीश हा मनमिळावू स्वभावाचा होता. तो घरच्या परिस्थितीची जाण ठेवून वागत होता. त्याला लहानपणापासून पोलीस व्हायचे होते. त्यानुसार त्याने अभ्यासही केला. परंतु, त्यात त्याला यश मिळाले नाही. शेवटी तो वडिलांना शेतीकामात मदत करीत होता. परंतु, त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी राजूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीJalanaजालनाagricultureशेती