शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

बेताची परिस्थिती पाहून तरुणाने शेतात काम सुरु केलं; पण गव्हाला पाणी देताना शॉक लागून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2023 16:08 IST

पिकाला पाणी देत असताना विजेच्या तुटलेल्या वायरला अचानक धक्का लागला.

राजूर ( जालना) : गव्हाला पाणी देताना तुटलेल्या वायरचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भोकरदन तालुक्यातील चांधई एक्को येथे गुरुवारी घडली. सतीश मधुकर टोम्पे (२१) असे मयताचे नाव आहे. 

मधुकर टोम्पे यांना जेमतेम शेती आहे. त्यांना दोन मुले असून, एक मुलगा राजूर येथील एका खासगी बँकेत काम करतो. तर दुसरा सतीश हा पोलीस भरतीची तयारी करीत होता. परंतु, त्याला यश मिळत नव्हते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने वडिलांना तो शेतीकामात मदत करीत होता. गुरुवारी दुपारी शेतातील गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी तो गेला होता. पिकाला पाणी देत असताना विजेच्या तुटलेल्या वायरला अचानक धक्का लागला. पिकात फेकल्या गेल्यामुळे बराच वेळ त्याच्याकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. एका महिलेने त्याला पाहताच, आरडाओरड सुरू केली. आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेऊन सतीशला राजूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सतीशच्या जाण्याने टोम्पे कुटुंबीयावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलीस बनण्याचे स्वप्न अपूर्णच राहिलेसतीश हा मनमिळावू स्वभावाचा होता. तो घरच्या परिस्थितीची जाण ठेवून वागत होता. त्याला लहानपणापासून पोलीस व्हायचे होते. त्यानुसार त्याने अभ्यासही केला. परंतु, त्यात त्याला यश मिळाले नाही. शेवटी तो वडिलांना शेतीकामात मदत करीत होता. परंतु, त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी राजूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीJalanaजालनाagricultureशेती