शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

चूल पेटली; पण जेवण जाईना, सरकार लवकर निर्णय घ्या...; ग्रामस्थ आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 12:01 IST

‘व्हीआयपीं’च्या गर्दीने दमछाक

- पवनराजे पवार वडीगोद्री (जि. जालना) : मंत्री येताहेत, खासदार येताहेत अधिकारीही येताहेत. ‘व्हीआयपीं’च्या गर्दीने ग्रामस्थांचीच नव्हे प्रशासनाचीही दमछाक होतेय. उपोषणकर्त्यांच्या आरोग्याची काळजी वेगळीच आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांच्या आरोग्याची काळजी वाटतेय. गावातील चूल पेटली आहे; पण जेवण जाईना, सरकार काही लवकर निर्णय घेईना, अशा हताश प्रतिक्रिया अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथील उपोषणकर्ते, ग्रामस्थांनी व्यक्त केली.

अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सहाव्या दिवशीही आमरण उपोषण सुरू आहे. शुक्रवारी झालेल्या लाठी हल्ल्यानंतर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात या घटनेचे पडसाद उमटले आहेत. लाठीहल्ल्याच्या घटनेनंतर तिसऱ्या दिवशी रविवारी सकाळपासूनच अंतरवाली सराटी गावात विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी येत होते. जरांगे यांच्यासह जखमी झालेले नागरिक, महिलांशी संवाद साधून घटनेची माहिती घेतली जात होती. दिवसभर मंत्री, नेतेमंडळी, विरोधी पक्षाचे नेते, प्रशासकीय अधिकाऱ्यांची गावात हजेरी सुरू होती. त्यामुळे गावाला छावणीचे स्वरूप आले होते. गावात भीतीचे वातावरण  लाठीहल्ला, वाढलेले व्हीआयपींचे दौरे आणि त्यांच्यासोबत असणारा पोलिसांचा फौजफाटा यांमुळे ग्रामस्थांमध्ये आजही भीतीचे वातावरण आहे. 

आज अतिरिक्त पोलिस महासंचालक चौकशीसाठी येणारलाठीचार्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना हे सोमवारी जालना शहरात येणार आहे. अंतरवाली सराटी गावाला भेट देऊन ते सर्व बाजूंची चौकशी करून अहवाल मुख्यमंत्र्यांकडे देणार आहेत. चौकशीसाठी आमच्याकडून पूर्णपणे मदत केली जाईल, अशी माहिती प्रभारी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.

कोटगावात आज शांतता आहे. आम्हाला आरक्षणाचा फायदा होईल माहिती नाही; परंतु, आमच्या पुढील पिढीला नक्की होईल. शासनाने योग्य निर्णय दोन दिवसांत घ्यावा. - नंदकुमार तारख, ज्येष्ठ नागरिक 

आरक्षण शांततेत सुरू असताना पोलिसांनी अचानक लाठीहल्ला, गोळीबार केला आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत असून, जखमींवर उपचार सुरू आहेत. माझी सून, मुलगा गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आम्ही आमच्या हक्कांसाठी लढत आहोत. - अलकनंदा तारख,  ज्येष्ठ महिला 

आमच्या बांधवांवरील गुन्हे मागे घ्यावेत. पोलिसांनी आमच्यावर जो लाठीचार्ज व गोळीबार केला, यात अनेकजण जखमी झाले आहेत. ग्रामस्थांना मारहाण करणाऱ्यांना बडतर्फ करावे आणि तातडीने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात.- आनंद तारख, तरुण

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाJalanaजालना